शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

'सावंतवाडी विधानसभेवर उद्धवसेनेचाच अधिकार'

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 29, 2024 18:13 IST

'धनशक्तीच्या जिवावर जर कोणी मते घेऊन आमदार होण्याचे स्वप्न पाहत असेल तर ते कधीच पूर्ण होणार नाही'

वैभव साळकरदोडामार्ग : सावंतवाडीविधानसभा मतदारसंघाला संस्थानिक काळाचा वारसा आहे. मात्र आतापर्यंत अनेकांनी या मतदारसंघाचा उपयोग स्वतःच्या फायद्यासाठी केला आहे. आणि त्यांच्या या स्वार्थी राजकारणात इथली जनता चांगलीच भाजून-पोळून निघाली आहे. मात्र आता यापुढे ही परिस्थिती राहणार नाही. कोणीही यावे आणि टपली मारून जावे असा हा मतदारसंघ नसून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेल्या या मतदारसंघात धनशक्तीच्या जिवावर जर कोणी मते घेऊन आमदार होण्याचे स्वप्न पाहत असेल तर ते कधीच पूर्ण होणार नाही. या मतदारसंघातून शेतकऱ्याचाच मुलगा आमदार म्हणून इथली जनता निवडून देईल, असा विश्वास उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी व्यक्त केला.धुरी यांनी याबाबत एक प्रसिद्धीपत्रकच दिले असून, त्यातून निवडणुकीसाठी भाऊगर्दी करणाऱ्या इच्छुकांचे चांगलेच कान टोचले आहेत. त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, सलग दहा वर्षे हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला आहे. त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेचाच अधिकार आहे आणि हा निकष राज्यातील इतर सर्व मतदारसंघामध्ये आहे तसा सावंतवाडी मतदारसंघासाठी देखील आहे.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मित्रपक्षांमध्ये काम करत असताना आपण निवडणूक ही अपक्ष लढवणार अशी भाषा कोणी करत असेल तर ते चुकीचे आहे. सध्या महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय वरिष्ठ घेतील तो आपणास मान्य आहे असे समजून प्रत्येकाने काम करणे गरजेचे आहे, असे म्हणत महाविकास आघाडीतील मित्रपक्षामधील निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्यावरही धुरी यांनी हल्ला चढवला.

सध्या मतदारसंघाची परिस्थिती पाहता अनेक धनाढ्य लोक लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा आपण पैसे देऊन मत विकत घेऊ अशा भ्रमात आहेत व त्याप्रमाणे निवडणुकीची तयारी धनशक्तीच्या माध्यमातून करत आहेत. मात्र इथली जनता सुज्ञ आहे स्थानिक उमेदवारास प्राधान्य देऊन जनता इथला स्थानिक व जनतेची कामे करणारा उमेदवार हा विधानसभेवर पाठवतील याची मला खात्री असल्याचे प्रसिद्धी पत्रकात उद्धव सेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांनी म्हटले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गUddhav Thackerayउद्धव ठाकरेSawantwadiसावंतवाडीvidhan sabhaविधानसभा