शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

दोन राज्यमंत्री आमने-सामने

By admin | Updated: November 13, 2016 23:32 IST

सावंतवाडी नगरपालिका निवडणूक : केसरकर, चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला

अनंत जाधव ल्ल सावंतवाडी राज्याच्या मंत्रिमंडळातील महायुतीतीलच दोन राज्यमंत्री सध्या सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने ऐकामेकांसमोर उभे ठाकले आहेत. यात शिवसेनेचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, तर भाजपचे बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा समावेश आहे. सावंतवाडी हा मंत्री केसरकरांचा बालेकिल्ला असल्याने भाजपने नगरपालिका निवडणूक प्रतिष्ठेची बनवली असून, राज्याचे लक्ष सावंतवाडीवर लागून राहिले आहे. केंद्रात व राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण व देवगड येथे नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना- भाजपमध्ये युती झाली. पण सावंतवाडी व वेंगुर्ले नगरपालिकेत युती झाली नसून, काही ठिकाणी आघाडीमध्ये कुरबुरी असल्याने तिरंगी व चौरंगी लढती होत आहेत. निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्यात शिवसेना-भाजपचे स्थानिक नेते युतीवरून आमने-सामने आले होते. मात्र, शेवटच्या टप्प्यात युती तुटल्याने दोन्ही पक्ष ऐकामेकांच्या विरोधात लढणार आहेत. यापूर्वी दीपक केसरकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना शिवसेना तसेच भाजपबरोबर महायुती करून निवडणूक लढवित होते व एकहाती सत्ता आणत होते. त्यावेळी त्यांचा प्रतिस्पर्धी पक्ष एकमेव काँग्रेस होता. मात्र, दोन वर्षांपूर्वी दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केल्याने सावंतवाडी शहरात शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. सावंतवाडीतील केसरकर समर्थक १७ पैकी १६ नगसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यामुळे शहरात शिवसेनेचे संख्याबळ चांगल्यापैकी वाढले आहे. त्यामुळे युतीच्या बोलणीत संख्याबळात शिवसेनेने भाजपला अवघ्या दोन ते तीन जागा देण्याचे निश्चित केले होते. पण, भाजपने शिवसेनेची आॅफर नाकारत स्वबळाचा नारा दिल्याने पालिका निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे. त्यातच भाजपने संपूर्ण कोकणची जबाबदारी ही बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावर दिली असून, ते गेले आठवडाभर सावंतवाडीतच तळ ठोकून बसले आहेत. त्यांनी भाजप शहरात अल्प आहे, हा कार्यकर्त्यांच्या मनातील न्यूनगंड काढून टाकत पहिल्या टप्प्यातच नगराध्यक्षासह नगरसेवकपदासाठी उमेदवार उभे करीत शिवसेनेला जोरदार धक्का दिला आहे. त्यामुळे सावंतवाडीत गेली अनेक वर्षे होणारी दुरंगी लढत आता तिरंगी लढत झाली असून, त्यात अनेकांना लॉटरी लागू शकते. तर काहींचा पत्ता कटही होऊ शकतो. तरीही युतीचे नेते आम्ही मैत्रिपूर्ण लढत लढणार, असे सांगत आहेत. पालिकेत शिवसेना सत्ताधारी असल्याने भाजपने शिवसेनेच्या विरोधातच जोरदार आघाडी उघडल्याने मैत्रिपूर्ण लढत शेवटच्या काही दिवसांत विरोधकांमध्ये परावर्तीत होण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे दोन्हीकडच्या नेत्यांना आतापासूनच सबुरीने घ्यावे लागणार आहे. कल्याण-डोंबिवलीचा अनुभव गाठीशी भाजपने सावंतवाडीची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर दिली आहे, ते बंदर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपला ६ वरून ४४ जुदाई आकडा गाठून दिल्याने त्यांचे राज्यात वजन वाढले आहे. भाजपला सावंतवाडीचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यातून घेऊन दिल्यास चव्हाण हेच किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. त्यांना माजी आमदार राजन तेली, युवा नेते संदेश पारकर यांचीही साथ लाभत आहे.