शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मांगवली बौद्धवाडी दोन दिवस अंधारात, कर्मचा-याने पाहणी करुनही महावितरणचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 15:00 IST

वादळी पावसामुळे मांगवली बौद्धवाडीचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. वादळात मोडून पडलेल्या वीज खांबाची वीज वितरण कर्मचा-याने पाहणी करुन २४ तास उलटून गेले तरी मोडलेला विद्युत खांब बदलण्याची तसदी वीज वितरणने घेतलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना घेऊन वीज वितरणाच्या भुईबावडा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्या शारदा कांबळे यांनी दिला आहे.

ठळक मुद्दे मांगवली बौद्धवाडी दोन दिवस अंधारात, वीज कर्मचा-याने पाहणी करुनही महावितरणचे दुर्लक्षशारदा कांबळे यांचा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा

वैभववाडी : वादळी पावसामुळे मांगवली बौद्धवाडीचा विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. वादळात मोडून पडलेल्या वीज खांबाची वीज वितरण कर्मचा-याने पाहणी करुन २४ तास उलटून गेले तरी मोडलेला विद्युत खांब बदलण्याची तसदी वीज वितरणने घेतलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना घेऊन वीज वितरणाच्या भुईबावडा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्या शारदा कांबळे यांनी दिला आहे.याबाबत शारदा कांबळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वादळी पावसामुळे झाड कोसळल्याने वीजेचा खांब मोडून पडल्याची माहिती ग्रामस्थांसह आपणही वीज वितरणला कळविली. त्यामुळे लागलीच वीज वितरणचे कनिष्ठ तंत्रज्ञ घटनास्थळाची पाहणी करुन गेले. परंतु, २४ तास उलटून गेले तरी मोडलेला वीजेचा खांब बदलण्यासाठी वीज वितरणकडून कोणीही वाडीत फिरकलेले नाहीत. दोन दिवस वीज नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला आहे.एक खांब मोडून पडल्याने संपुर्ण बौद्धवाडीचा वीज पुरवठा दोन दिवस बंद असताना महावितरणच्या अधिका-यांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत जिल्हा परिषद सदस्याच्या गावातील नैसर्गिक आपत्तीमुळे खंडीत झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत वीज वितरण कंपनीकडून एवढा बेफिकीरपणा दाखवला जात असेल तर अन्य गावातील स्थिती काय असेल? याची कल्पनाच केलेली बरी, असे शारदा कांबळे यांनी पत्रकात नमूद केले आहे.वीज पुरवठा सायंकाळपर्यंत सुरळीत न झाल्यास ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. याची खबरदारी घेऊन अधिका-यानी तातडीने कार्यवाही न केल्यास महावितरणच्या भुईबावडा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा शारदा कांबळे यांनी दिला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी