शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

Sindhudurg: तिलारी खोऱ्यात टस्कर परतला; शेतकऱ्यांची वाढली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 11:54 IST

भाताची उडवी फस्त करण्याच्या भीतीने धास्ती

दोडामार्ग : गेल्या दोन महिन्यांपासून अज्ञातवासात गेलेल्या हत्तीच्या कळपातील टस्कर पुन्हा परतल्याने तिलारी खोऱ्यातील शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. त्याच्याकडून भाताची उडवी फस्त केली जाण्याच्या भीतीने बळीराजा धास्तावला आहे.हत्तींचा तिलारी खोऱ्यात मागील वीस ते बावीस वर्षांपासून वावर आहे. पावसाळ्यात हे हत्ती या खोऱ्यातून निघून जातात. परिणामी, भयमुक्त झालेले शेतकरी भात, नाचणी पिकांची शेती करतात. पावसाळा संपल्यावर शेतकरी शेतीची कापणी करून त्यांची उडवी लावतो. त्यानंतर शेतात चवळी, मिरची व इतर प्रकारच्या भाज्यांची झाडे लावली जातात.मात्र, पावसाळा संपतो न संपतो तोच गेलेले हत्ती या हंगामात तिलारी खोऱ्यात पुन्हा परततात व शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान करतात, तसेच काही वेळा हे हत्ती थेट अन्नाच्या शोधात लोकवस्तीतही घुसतात. यावेळी मात्र ग्रामस्थांची भीतीने पळता भुई थोडी होते.

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

यंदादेखील तिलारी खोऱ्यातील हत्ती पावसाळ्यात गेले होते. मात्र, चार दिवसांपूर्वीच घाटीवडे, बांबर्डे परिसरात एका टस्कराचे आगमन झाले. त्यानंतर या टस्कराचे लोकवस्ती जवळ दर्शन झाले. टस्कराने येताच क्षणी केळी उद्ध्वस्त केल्या. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हत्तींना वेळीच रोखण्याची शेतकऱ्यांची मागणीतसेच यंदा कापणी केलेल्या भातपिकांची अद्यापपर्यंत मळणी झालेली नसल्याने हे पिक टस्कर फस्त तर करणार नाही ना? या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. सद्य:स्थितीत एकच टस्कर आला असला तरी त्याच्या मागोमाग इतर हत्तींचा कळप येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या हत्तींना वेळीच रोखण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग