शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

Sindhudurg: तिलारी खोऱ्यात टस्कर परतला; शेतकऱ्यांची वाढली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 11:54 IST

भाताची उडवी फस्त करण्याच्या भीतीने धास्ती

दोडामार्ग : गेल्या दोन महिन्यांपासून अज्ञातवासात गेलेल्या हत्तीच्या कळपातील टस्कर पुन्हा परतल्याने तिलारी खोऱ्यातील शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. त्याच्याकडून भाताची उडवी फस्त केली जाण्याच्या भीतीने बळीराजा धास्तावला आहे.हत्तींचा तिलारी खोऱ्यात मागील वीस ते बावीस वर्षांपासून वावर आहे. पावसाळ्यात हे हत्ती या खोऱ्यातून निघून जातात. परिणामी, भयमुक्त झालेले शेतकरी भात, नाचणी पिकांची शेती करतात. पावसाळा संपल्यावर शेतकरी शेतीची कापणी करून त्यांची उडवी लावतो. त्यानंतर शेतात चवळी, मिरची व इतर प्रकारच्या भाज्यांची झाडे लावली जातात.मात्र, पावसाळा संपतो न संपतो तोच गेलेले हत्ती या हंगामात तिलारी खोऱ्यात पुन्हा परततात व शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान करतात, तसेच काही वेळा हे हत्ती थेट अन्नाच्या शोधात लोकवस्तीतही घुसतात. यावेळी मात्र ग्रामस्थांची भीतीने पळता भुई थोडी होते.

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

यंदादेखील तिलारी खोऱ्यातील हत्ती पावसाळ्यात गेले होते. मात्र, चार दिवसांपूर्वीच घाटीवडे, बांबर्डे परिसरात एका टस्कराचे आगमन झाले. त्यानंतर या टस्कराचे लोकवस्ती जवळ दर्शन झाले. टस्कराने येताच क्षणी केळी उद्ध्वस्त केल्या. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हत्तींना वेळीच रोखण्याची शेतकऱ्यांची मागणीतसेच यंदा कापणी केलेल्या भातपिकांची अद्यापपर्यंत मळणी झालेली नसल्याने हे पिक टस्कर फस्त तर करणार नाही ना? या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. सद्य:स्थितीत एकच टस्कर आला असला तरी त्याच्या मागोमाग इतर हत्तींचा कळप येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या हत्तींना वेळीच रोखण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग