शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

Sindhudurg: तिलारी खोऱ्यात टस्कर परतला; शेतकऱ्यांची वाढली चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 11:54 IST

भाताची उडवी फस्त करण्याच्या भीतीने धास्ती

दोडामार्ग : गेल्या दोन महिन्यांपासून अज्ञातवासात गेलेल्या हत्तीच्या कळपातील टस्कर पुन्हा परतल्याने तिलारी खोऱ्यातील शेतकऱ्यांची पाचावर धारण बसली आहे. त्याच्याकडून भाताची उडवी फस्त केली जाण्याच्या भीतीने बळीराजा धास्तावला आहे.हत्तींचा तिलारी खोऱ्यात मागील वीस ते बावीस वर्षांपासून वावर आहे. पावसाळ्यात हे हत्ती या खोऱ्यातून निघून जातात. परिणामी, भयमुक्त झालेले शेतकरी भात, नाचणी पिकांची शेती करतात. पावसाळा संपल्यावर शेतकरी शेतीची कापणी करून त्यांची उडवी लावतो. त्यानंतर शेतात चवळी, मिरची व इतर प्रकारच्या भाज्यांची झाडे लावली जातात.मात्र, पावसाळा संपतो न संपतो तोच गेलेले हत्ती या हंगामात तिलारी खोऱ्यात पुन्हा परततात व शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान करतात, तसेच काही वेळा हे हत्ती थेट अन्नाच्या शोधात लोकवस्तीतही घुसतात. यावेळी मात्र ग्रामस्थांची भीतीने पळता भुई थोडी होते.

शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

यंदादेखील तिलारी खोऱ्यातील हत्ती पावसाळ्यात गेले होते. मात्र, चार दिवसांपूर्वीच घाटीवडे, बांबर्डे परिसरात एका टस्कराचे आगमन झाले. त्यानंतर या टस्कराचे लोकवस्ती जवळ दर्शन झाले. टस्कराने येताच क्षणी केळी उद्ध्वस्त केल्या. त्यामुळे ग्रामस्थ व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हत्तींना वेळीच रोखण्याची शेतकऱ्यांची मागणीतसेच यंदा कापणी केलेल्या भातपिकांची अद्यापपर्यंत मळणी झालेली नसल्याने हे पिक टस्कर फस्त तर करणार नाही ना? या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. सद्य:स्थितीत एकच टस्कर आला असला तरी त्याच्या मागोमाग इतर हत्तींचा कळप येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या हत्तींना वेळीच रोखण्याची मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग