शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

पारंपारिक आकाश कंदील , किल्ले बनवा उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 11:42 IST

kankavali, highschool, fort, diwali, sindhududurg कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या चित्रकला विभाग व महाराष्ट्र शासन पर्यावरण सेवा योजना विभागामार्फत नेहमी पर्यावरण पूरक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी विद्यार्थ्यांच्या सहभागातून पारंपारिक आकाशकंदील व किल्ले बनविण्यात आले. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजाला देण्यात आला.

ठळक मुद्देपारंपारिक आकाश कंदील , किल्ले बनवा उपक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश ! विद्यामंदिर हायस्कूलचा उपक्रम ; प्रसाद राणे यांचा पुढाकार

सुधीर राणे

कणकवली : कणकवली येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या चित्रकला विभाग व महाराष्ट्र शासन पर्यावरण सेवा योजना विभागामार्फत नेहमी पर्यावरण पूरक उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी विद्यार्थ्यांच्या सहभागातून पारंपारिक आकाशकंदील व किल्ले बनविण्यात आले. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजाला देण्यात आला.मार्च २०२० पासून कोरोनाच्या महाभयंकर संकटामुळे शाळा बंद आहेत .विद्यार्थी व शिक्षक यांचा प्रत्यक्ष संपर्क तुटलेला आहे .परंतु या काळात शिक्षण बंद नसून ते मोबाईलच्या माध्यमातून सुरूच आहे. आतापर्यंत मुलांना मोबाईल हातात देणे धोकादायक आहे असे अनेक पालक म्हणत होते. मात्र, आता अभ्यासाकरिता मुलांच्या हातात मोबाईल द्यावा लागत आहे. गेले आठ ते नऊ महिने सतत घरात बसून मोबाईलवर शिक्षण घेत असताना प्रत्येक मुलातील बालपण पूर्णपणे हरवून गेले आहे .अशावेळी मुलांनी या मोबाईलच्या जाळ्यातून थोडा वेळ तरी बाजूला होऊन आपले हरवलेले बालपण मुक्तपणे जगावे, आनंद घ्यावा व आपल्यातील कलागुणांना वाव करून द्यावा. त्यातूनच पर्यावरणाचेही संरक्षण करून समाजाला एक प्रेरक संदेश द्यावा या उद्देशाने विद्यामंदिर हायस्कूलच्या चित्रकला विभाग व पर्यावरण सेवा योजनेचे प्रमुख प्रसाद राणे यांनी मुख्याध्यापक बि.डी.सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक आकाशकंदील व किल्ले बनवा उपक्रमाचे आयोजन केले होते .पारंपारिक आकाशकंदिल उपक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीचे ३००विद्यार्थी सहभागी झाले होते तर किल्ले बनवा उपक्रमांमध्ये ४६ गट सहभागी होऊन शहरातील विविध भागात घरोघरी किल्ले बनविले आहेत. आकाश कंदील बनविताना विद्यार्थ्यांनी थर्माकोल व प्लास्टिक न वापरता कागद ,पुठ्ठा ,बांबूच्या काठ्या अशा पर्यावरणपूरक वस्तूंचा उपयोग करून अतिशय आकर्षक आकाशकंदील बनविले. त्याद्वारे ३०० घरांना चायनामेडच्या प्लास्टिकच्या कचऱ्यापासून वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. तर माती, दगड, रान, नैसर्गिक रंग यांचा उपयोग करून अतिशय उत्कृष्ट असे शिवकालीन किल्ले सुद्धा बनविले आहेत .प्रसाद राणे यांनी घरोघरी जाऊन किल्ल्याची पाहणी करत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक केले. तर आकाश कंदील बनविणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सोशल डिस्टंसिंगचा वापर करत शाळेमध्ये बोलावून त्यांनाही प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन त्यांच्या कलाकौशल्याचेही कौतुक केले हा उपक्रम यशस्वी होण्याकरिता प्रशालेचे मुख्याध्यापक बि.डी. सरवदे, पर्यवेक्षक पी.जे.कांबळे, जे.जे. शेळके, व्हि.एच. शिरसाठ इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले. 

टॅग्स :DiwaliदिवाळीFortगडKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग