शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: तिलारी धरणाच्या डाव्या कालव्याला भगदाड, गोव्याला पाणीपुरवठा करणारे दोन्ही कालवे बंद

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: January 24, 2025 14:30 IST

४८ तासातील दुसरी घटना 

वैभव साळकरदोडामार्ग : तिलारी धरणाच्या उजव्या कालव्याची जलवाहिनी कोसळून ४८ तास पूर्ण होण्याआधीच शुक्रवारी कुडासे भोमवाडी येथे डाव्या कालव्याला भलेमोठे भगदाड पडले. विशेष म्हणजे कोसळलेल्या जलवाहिनीप्रमाणेच या कालव्याचीही गेल्यावर्षी दुरुस्ती करण्यात आली होती. त्यामुळे दुरुस्तीच्या नावावर खर्ची घातलेला लाखोंचा निधी पाण्यात गेल्याने तिलारी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. शिवाय दोन्ही कालवे फुटल्याने गोव्याचा पाणीपुरवठाही अनिश्चित काळासाठी बंद झाला आहे.तिलारी धरणाला लागलेल्या भ्रष्टाचाराच्या किडीचे नवनवीन किस्से समोर येऊ लागले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून दरवर्षी दुरुस्तीवर खर्च होऊनही तिलारी धरणाच्या कालव्याना गेल्या काही वर्षात लागलेले फुटीचे ग्रहण काही केल्या सुटत नसल्याचे चित्र सध्या आहे. दोन दिवसांपूर्वीच तिलारीच्या उजव्या कालव्याची गतवर्षी दुरुस्ती केलेली जलवाहिनी कोसळल्याने उजव्या कालव्याचा पाणीपुरवठा बंद झाला होता. या घटनेला ४८ तास उलटले नाहीत. त्याआधीच कुडासे भोमवाडी येथे डाव्या कालव्याला भलेमोठे भगदाड पडले.विशेष म्हणजे याच ठिकाणी गतवर्षी कालव्याची दुरुस्ती केली होती. त्याकरिता लाखोंचा निधी खर्ची घातला गेला. पण तरीसुद्धा सहा महिन्याच्या आत कालव्याला पुन्हा भगदाड पडले. त्यामुळे कालव्याचे लाखो लिटर पाणी रस्त्यावर आले. शिवाय शेतकऱ्यांच्या शेतजमिनित घुसल्याने नुकसान झाले. दरम्यान लागोपाठोपाठ घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे तिलारी प्रकल्पाच्या कामांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून अधिकरी व ठेकेदार यांचे साटेलोटे असल्याने असे प्रकार वारंवार होत असल्याचा आरोप होऊ लागला आहे.त्याच - त्याच ठेकेदारांना दिली जाताहेत कामे तिलारी धरणाच्या कालव्यांची कामे करणारे ठेकेदार मोजकेच आहेत. त्याच त्या ठेकेदारांना वारंवार दुरुस्तीची कामे देण्याचे काम अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. विशेष म्हणजे यापूर्वी त्यांनी केलेली कामे निकृष्ट दर्जाची झाल्याचे अनेकदा समोर आले आहे .मात्र तरीसुद्धा त्याच -त्याच ठेकेदारांना कामे देण्याची मेहरबानी अधिकाऱ्यांकडून का ? केली जाते याचे उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे.

अधिकाऱ्यांची चौकशी करा : अंकुश जाधवतिलारी धरण अधिकाऱ्यांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. त्यांचे ठेकेदारांशी असलेल्या साटेलोट्यामुळे निकृष्ट दर्जाची कामे होत असून कालवे फुटत आहेत. त्यामुळे प्रकल्प अधिकाऱ्यांची प्रथम चौकशी व्हावी अशी मागणी आपण पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे करणार असल्याचे माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी सांगितले

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgoaगोवाWaterपाणीTilari damतिलारि धरण