शहरं
Join us  
Trending Stories
1
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
2
११ वर्षांच्या यशस्वी मोहिमेनंतर NASA च्या 'MAVEN' मार्स ऑर्बिटरशी अचानक संपर्क तुटला; वैज्ञानिक चिंतेत
3
बँक खाते, पेन्शन, टॅक्स स्लॅब ते GST बदल... २०२५ मध्ये पैशांसंबंधी झाले ७ मोठे बदल; तुम्हाला किती फायदा?
4
Shashi Tharoor: "पत्नीच्या संमतीशिवाय संबंध ठेवणे वैवाहिक बलात्कारच, पतीला सूट का द्यावी?"- शशी थरूर
5
"शिवराज पाटील यांची अलीकडेच भेट झाली होती, ते..." PM नरेंद्र मोदींनी दिला आठवणींना उजाळा
6
Nashik Leopard: बिबट्याची नाशिक पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालय आवारातच एन्ट्री, सीसीटीव्हीमध्ये दिसला
7
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
8
आता परत सलमानवर जोक करणार का? पापाराझीच्या प्रश्नावर प्रणित मोरेने हातच जोडले; म्हणाला...
9
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
10
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
11
U19 Asia Cup 2025 : वैभव सूर्यवंशीचा धमाका! सिक्सर मारत स्टाईलमध्ये साजरी केली फिफ्टी
12
खळबळजनक! ३ वर्षे इंजिनिअरने केले रुग्णांवर उपचार; भावोजींची डिग्री, पण औषधं द्यायचा मेहुणा
13
‘शेतात जाणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत’, पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर हजारो जोडप्यांचे व्हिडीओ बनल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
14
नगराध्यक्ष ते राज्यपाल! कसा होता शिवराज पाटील चाकूरकरांचा प्रवास; तब्बल ७ वेळा बनले खासदार
15
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
16
Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
17
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
18
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
19
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
20
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: तिलारी धरणाला कालवा फुटीचे ग्रहण, नेमका निधी झिरपतो कुठे ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 16:06 IST

दुरुस्तीवर होतोय कोट्यवधींचा चुराडा 

वैभव साळकरदोडामार्ग : गोव्यासाठी संजीवनी ठरलेल्या तिलारी धरणाच्या कालवा दुरुस्तीवर दरवर्षी कोट्यवधींचा चुराडा केला जात असतानाही कालव्यांना लागलेले फुटीचे ग्रहण, मात्र काही केल्या सुटत नाही. दरवर्षी दुरुस्तीच्या नावाखाली कोट्यवधींचा चुराडा केला जातो, मात्र पुढच्याच वर्षी कुठेना कुठे तरी कालवा फुटतोच. त्यामुळे हा खर्ची घातलेला निधी नेमका झिरपतो तरी कुठे ? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. शिवाय या कालवा फुटीच्या घटनांना जबाबदार असणाऱ्या ठेकेदार किंवा अधिकाऱ्यांवर आतापर्यंतच्या कारकिर्दीत कधीच एकही कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही. परिणामी या संपूर्ण कारभाराला पाटबंधारे खात्याची संपूर्ण ‘सिस्टम’च जबाबदार आहे का ? आणि नसेल, तर मग या कालवा फुटीच्या एकामागोमाग एक घडणाऱ्या घटनांची चौकशी करण्याचे औदार्य पाटबंधारे खाते दाखविणार का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.गोवा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेला तिलारी धरण प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून कालवा फुटीच्या घटनांमुळे नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. सुरुवातीला ४५ कोटींचे अंदाजपत्रक असलेला हा प्रकल्प पूर्णत्वास जाईपर्यंत १,६०० कोटींच्या वर जाऊन पोहोचला.मात्र एवढी कोटींच्या कोटी उड्डाणे घेऊनसुद्धा अद्यापही ज्या भागात हा प्रकल्प साकारलाय त्या दोडामार्ग तालुक्यातील काही गावांत आजही तिलारीचे पाणी पोहोचलेले नाही. त्यामुळे या धरणाचा फायदा नेमका कोणाला झाला? हा देखील एक संशोधनाचा विषय बनला आहे. प्रकल्पाने कोटींच्या कोटी उड्डाणे घेतली खरी, मात्र अधिकारी आणि ठेकेदारांची त्यामुळे चांदी झाली, असा जो आरोप सर्वसामान्यांकडून आतापर्यंत होत होता तो खरा होता की काय ? असा संशय वारंवार घडणाऱ्या कालवा फुटीच्या घटनांमुळे व्यक्त केला जाऊ लागला आहे.गेल्या चार वर्षांत एकामागोमाग एक घडलेल्या कालवा फुटीच्या घटना हे त्याचेच द्याेतक असल्याचे म्हटले, तर ते वावगे ठरणार नाही. मागील चार वर्षांत खानयाळे, साटेली-भेडशी, आवाडे, घोटगेवाडी, कुडासे, तिलारी अशा विविध ठिकाणी कालवे फुटले आहेत. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया तर गेलेच, पण शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसानही झाले. शिवाय ज्याठिकाणी कालवे दुरुस्त केले त्याठिकाणीच बऱ्याचदा कालवा फुटण्याच्या घटना घडल्या. परिणामी केलेला खर्च वाया गेला. मग, या सदोष कामाला जबाबदार कोण?, हा दुरुस्तीच्या नावावर केलेला खर्च नेमका कोणाच्या घशात गेला?, त्या कामांची चौकशी का नाही झाली?, असे अनेक प्रश्न सध्यातरी अनुत्तरीत आहेत.आजच्या घडीला कालवा जीर्ण झाला, त्यामुळे तो फुटत असल्याचे सोयीस्कर उत्तर अधिकाऱ्यांकडून देण्यात येत आहे. मग, दुरुस्तीवर जो दरवर्षी खर्च केला जातो, तो नेमका जातो कुठे?, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे

तिलारी धरणावर गब्बर ?तिलारी धरणामुळे तालुक्याचा विकास होणार या हेतूने तिलारी धरणासाठी धरणग्रस्तांनी जमिनी दिल्या. पण, त्यांची अवस्था सध्या ‘भीक नको पण कुत्रा आवर’, अशी झाली आहे. सुविधांच्या नावाने पुनर्वसन गावठाणात बोंबाबोंब आहे, तर याच धरणाच्या जिवावर परप्रांतीय ठेकेदार गब्बर बनल्याची चर्चा आहे. त्यांच्या कामाची पूर्वी कधी साधी चौकशीही झाली नाही किंवा कदाचित जाणून बुजून केलीही नसेल, त्यामुळेच आज कालवे फुटण्याच्या घटना घडत असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे.

गोव्यातील कालवे टिकाऊ कसे ?नजीकच्या गोवा राज्यात कालवे फुटल्याची आजमितीपर्यंत एकही घटना ऐकिवात नाही, मग महाराष्ट्राच्या हद्दीतच कालवे का फुटतात ? दोन्हीकडे टेक्निक तीच मग गोव्याचे कालवे टिकाऊ कसे ? हादेखील संशोधनाचा विषय बनला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTilari damतिलारि धरण