शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

हा तर सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होण्याचा ठाकरेंचा प्रयत्न, प्रवीण दरेकर यांची टीका

By सुधीर राणे | Updated: May 2, 2023 15:27 IST

सभेत नेहमीप्रमाणेच आगपाखड, टोमणे, मत्सर पहायला मिळाला

कणकवली: महाविकास आघाडीची मुंबई येथे झालेली वज्रमूठ सभा म्हणजे भाजपा आणि एकनाथ शिंदे यांचे आव्हान परतवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे. तसेच भावनिक वातावरण तयार करून सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन मते मिळविण्याचा उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न असल्याची टीका विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस मनोज रावराणे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत उपस्थित होते.प्रवीण दरेकर म्हणाले, या सभेत नेहमीप्रमाणेच आगपाखड, टोमणे, मत्सर पहायला मिळाला. या सभेत काही मुद्यांचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला.पण त्याबाबतची वस्तूस्थितीही पाहणे आवश्यक आहे. मुंबई वेगळी करून महाराष्ट्राचा लचका तोडायचा प्रयत्न केला जात आहे असे वक्तव्य करण्यात आले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत सांगितले आहे की, भावनिक वातावरण तयार करून मते मिळविण्याचा हा प्रयत्न आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  यापूर्वीच जाहीर इशारा दिला आहे की, मुंबई  महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची हिंमत कोणाच्याही बापात नाही. तसे कोणी करण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला माफ केले जाणार नाही. पण, काहीही वक्तव्ये करून उद्धव ठाकरे यांचा सहानुभूतीच्या लाटेवर स्वार व्हायचा प्रयत्न आहे. तो यशस्वी होणार नाही. मुंबईतील ठेवी जशा त्यांच्या बापाच्या नाहीत, तशाच त्या आमच्या बापाच्याही नाहीत. त्या मुंबईकरांच्या ठेवी असून त्यांना सुविधा पुरविण्यासाठीच महापालिकेच्या माध्यमातून त्याचा वापर व्हायला हवा. या सभेत उद्धव ठाकरे यांनी शालेय अभ्यासक्रमात श्रीमंत कसे व्हायचे याबाबत अदानींच्या आत्मचरित्राचा धडा असायला हवा, असे सांगितले. मात्र, उद्धव ठाकरे यांचा स्वतःचा काहीही उद्योग नसताना एका मातोश्रीच्या दोन इमारती कशा झाल्या. याबाबत त्यांनी आपल्या वर्तमानपत्रातून लेख प्रसिद्ध करावा. म्हणजे झेंडा नाचवणाऱ्या शिवसैनिकांना श्रीमंत कसे व्हायचे? हे समजेल. सध्याचे राज्यातील सरकार भक्कम आहे. त्याला कोणताही धोका नाही.हे विकासाभिमुख सरकार आहे. मात्र, आदित्य ठाकरे यांना साक्षात्कार झाला आहे ,की हे सरकार पडणार आहे. त्यांचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. राज्य सरकार मध्ये चांगला समन्वय आहे. महाविकास आघाडीत तो नाही. राज्याचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.कोकणचा विकास व्हायचा असेल तर पर्यावरणाची हानी होणार नाही,असे प्रकल्प येथे यायला हवेत.त्यासाठी भाजपचा प्रयत्न असेल.बारसूच्या बाबतीत उद्धव ठाकरे यांची दुटप्पी भूमिका आहे. त्याबाबत त्यानी जनतेसमोर आधी आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी. मुख्यमंत्री असताना कोकणच्या विकासासाठी काय केले?बारसू येथे येणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्री असताना कोकणच्या विकासासाठी काय केले?ते जाहीरपणे जनतेला सांगावे. आपल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी जनतेसमोर मांडावा.असेही प्रवीण दरेकर यावेळी म्हणाले.शरद पवारांना अनेक गोष्टी पचनी पडत नाहीत!शरद पवार हे एक जाणते नेते आहेत. विकासासाठी असलेली त्यांची तळमळ नेहमीच दिसून येते. त्यासाठी ते प्रयत्नशील असतात. समाजातील अनेक गोष्टी त्यांच्या पचनी पडत नाहीत. मात्र, कालांतराने त्यातील एक एक गोष्ट पुढे येतील.असेही प्रवीण दरेकर भाजप-राष्ट्रवादी यांच्या राज्यातील सरकारबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरा दरम्यान म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गpravin darekarप्रवीण दरेकरUddhav Thackerayउद्धव ठाकरे