शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
4
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
5
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
6
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
7
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
8
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
9
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
10
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
11
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
12
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
13
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
14
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
15
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
16
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
17
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
18
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
19
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
20
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स

राजापूर तालुक्यातील 'या' गावात  ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणार, राज्य सरकारने केंद्राला दिले संमती पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 17:29 IST

केंद्र सरकार राज्यात राबवत असलेले प्रकल्प येत्या दोन, तीन वर्षात पूर्ण केले जाणार

कणकवली : राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ येथे ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणार आहे. राज्य सरकारने  त्याबाबत संमती दर्शविणारे पत्र केंद्र सरकारला दिले आहे. अशी माहिती भाजपा प्रदेश चिटणीस माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली आहे. कणकवली येथिल भाजप कार्यालयात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कणकवली पंचायत समिती उपसभापती मिलींद मेस्त्री, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा चिटणीस रवींद्र शेट्ये, नगरसेवक शिशिर परुळेकर, कार्यालय प्रमुख समर्थ राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.प्रमोद जठार म्हणाले,  बारसू, गोवळ येथे ग्रीन रिफायनरी प्रकल्प केला जाणार आहे. केंद्र सरकारला राज्य सरकारने तशी संमती दिली आहे. याबाबत आम्ही  केंद्रीय मंत्र्यांची विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत जाऊन लवकरच भेट घेणार आहोत. केंद्र सरकार राज्यात राबवत असलेले प्रकल्प येत्या दोन, तीन वर्षात पूर्ण केले जाणार आहेत. केंद्र सरकार त्यावर काम करत आहे. 

कोकणात जे काम खासदार विनायक राऊत यांनी केले पाहिजे होते ते करू शकले नाहीत. मात्र, भाजपा नेते केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यामुळे कोकणात फार मोठया प्रमाणात विकास कामे होत आहेत. राणेंमुळे कोकणात जसा भाजपा शतप्रतिशत झाला तसा विकासही शतप्रतिशत होणार आहे. मोदी सरकारच्या कामाचा भाजपने पाठपुरावा केला आणि मुंबई ही आर्थिक राजधानी व गोवा ही पर्यटन राजधानी अशी मोठी शहरे महामार्गाने जोडली. देवगड आनंदवाडी प्रकल्पाचे काम सुरू आहे. कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे प्रकल्प उभारून विजयदुर्ग बंदर रेल्वेने जोडले जाईल. त्याचा पाठपुरावा यापुढे आम्ही करणार आहोत असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गGreen Planetग्रीन प्लॅनेट