शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

राजापूर तालुक्यातील 'या' गावात  ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणार, राज्य सरकारने केंद्राला दिले संमती पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 17:29 IST

केंद्र सरकार राज्यात राबवत असलेले प्रकल्प येत्या दोन, तीन वर्षात पूर्ण केले जाणार

कणकवली : राजापूर तालुक्यातील बारसू, गोवळ येथे ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणार आहे. राज्य सरकारने  त्याबाबत संमती दर्शविणारे पत्र केंद्र सरकारला दिले आहे. अशी माहिती भाजपा प्रदेश चिटणीस माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिली आहे. कणकवली येथिल भाजप कार्यालयात रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कणकवली पंचायत समिती उपसभापती मिलींद मेस्त्री, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, जिल्हा चिटणीस रवींद्र शेट्ये, नगरसेवक शिशिर परुळेकर, कार्यालय प्रमुख समर्थ राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.प्रमोद जठार म्हणाले,  बारसू, गोवळ येथे ग्रीन रिफायनरी प्रकल्प केला जाणार आहे. केंद्र सरकारला राज्य सरकारने तशी संमती दिली आहे. याबाबत आम्ही  केंद्रीय मंत्र्यांची विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत जाऊन लवकरच भेट घेणार आहोत. केंद्र सरकार राज्यात राबवत असलेले प्रकल्प येत्या दोन, तीन वर्षात पूर्ण केले जाणार आहेत. केंद्र सरकार त्यावर काम करत आहे. 

कोकणात जे काम खासदार विनायक राऊत यांनी केले पाहिजे होते ते करू शकले नाहीत. मात्र, भाजपा नेते केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यामुळे कोकणात फार मोठया प्रमाणात विकास कामे होत आहेत. राणेंमुळे कोकणात जसा भाजपा शतप्रतिशत झाला तसा विकासही शतप्रतिशत होणार आहे. मोदी सरकारच्या कामाचा भाजपने पाठपुरावा केला आणि मुंबई ही आर्थिक राजधानी व गोवा ही पर्यटन राजधानी अशी मोठी शहरे महामार्गाने जोडली. देवगड आनंदवाडी प्रकल्पाचे काम सुरू आहे. कोल्हापूर – वैभववाडी रेल्वे प्रकल्प उभारून विजयदुर्ग बंदर रेल्वेने जोडले जाईल. त्याचा पाठपुरावा यापुढे आम्ही करणार आहोत असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गGreen Planetग्रीन प्लॅनेट