शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

सावंतवाडीत पाणी कपात नाही : बबन साळगावकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 11:28 IST

पाळणेकोंड धरण क्षेत्रात पुरेसा पाणीसाठा शिल्लक असून, पाऊस उशिरा असला तरी पुढील ४५ दिवस शहरवासीयांना कोणतीही भीती नाही, तसेच पाणी कपात होणार नसल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले.

ठळक मुद्दे४५ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा, मात्र नासाडी न करण्याचे आवाहनसावंतवाडीत पाणी कपात नाही : बबन साळगावकर

सावंतवाडी : पाळणेकोंड धरण क्षेत्रात पुरेसा पाणीसाठा शिल्लक असून, पाऊस उशिरा असला तरी पुढील ४५ दिवस शहरवासीयांना कोणतीही भीती नाही, तसेच पाणी कपात होणार नसल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सांगितले.

पाळणेकोंड धरणातून शहराला पाणी पुरवठा केला जातोच तसेच आजूबाजूच्या तीन गावांना ही नगरपालिका पाणी पुरवठा करत असते. ते पाणी पालिका कपात करणार नसल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे.सावंतवाडी शहर पाण्याने स्वयंपूर्ण आहे. शहराला पाळणे कोंड धरण तसेच केसरी येथील नळपाणी योजनेतून पाणी पुरवठा होत असतो. दरवर्षो पाणीसाठा कमी असायचा पण यावेळी पुरेसा पाणी साठा असल्याने शहरावर पाणी कपातीचे कोणतेही संकट येणार नाही. पाळणेकोंड धरणा त पुढील ४५ दिवस पुरेल एवढा पाणी सध्या शिल्लक आहे.पाउस लांबणीवर पडल्याने शहरावर पाणी संकट येईल का?यांची उत्सुकता सगळ्याना होती पण तसे कोण ते ही संकट येणार नाही.सावंतवाडी शहराला दरदिवशी १० लाख लीटर एवढे पाणी लागते तर सावंतवाडी नगरपालिका कोलगावला दरदिवशी २ लाख लीटर माजगावला ५० हजार लीटर तर चराठा ६२ हजार लीटर आणि कुणकेरी गावाला १ लाख १४ हजार लिटरचा पाणी पुरवठा करत असते. मात्र गेले काही वर्षे पाऊस लांबला म्हणून पाणी कपात करणे पालिकेला भाग पडले.पण यावर्षी पाऊस लांबणार असे वाटत असतानाही पालिकेने कोणती पाणी कपात करणार नसल्याचे जाहीर केले आहे.

शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळेल यात कोणतीही शंका नाही. मात्र पाणी मिळते म्हणून जास्त पाण्याचा वापर करू नका. गरज असेल तेवढेच पाणी वापरा, असे आवाहनही नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केले आहे.सावंतवाडी शहरातील २५ घरे ही उंचावर असल्याने तेथे पाणी चढत नाही. पण या घरासाठीही भविष्यात योजना आणणार असून उंचावर टाक्या बसवणार आहे.नवीन नळपाणी योजनेचा आराखडा ही तयार करण्यात आल्याचे नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी स्पष्ट केले. यावेळी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, नगरसेवक आनंद नेवगी, बाबू कुडतरकर, सुरेंद्र बांदेकर नगरसेविका अनारोजीन लोबो, शुभागी सुकी आदी उपस्थित होते.

टॅग्स :Waterपाणीsindhudurgसिंधुदुर्ग