शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

...तर आमदारकी सोडून वैभव नाईक नगरपंचायत निवडणूक लढवतील!; समीर नलावडे, बंडू हर्णे यांचा पलटवार 

By सुधीर राणे | Updated: May 5, 2023 16:39 IST

कणकवली : कणकवली येथील जुन्या भाजी मार्केट जवळील सुलभ शौचालयाची नवीन इमारत बांधकामासाठी आवश्यक असलेल्या अंदाजपत्रकानुसारच बनवण्यात येत आहे. ...

कणकवली: कणकवली येथील जुन्या भाजी मार्केट जवळील सुलभ शौचालयाची नवीन इमारत बांधकामासाठी आवश्यक असलेल्या अंदाजपत्रकानुसारच बनवण्यात येत आहे. त्या ठिकाणी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याने  खर्च वाढला आहे. मात्र, कणकवलीत चांगली विकासकामे आम्ही केल्यामुळेच विरोधकांना आता पोटशूळ उठला असल्याचे  प्रत्युत्तर माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिले आहे. तसेच विकासकामात एवढे पैसे मिळत असतील तर आमदारकी सोडून वैभव नाईक कणकवलीत नगरपंचायत निवडणूक लढतील,असा टोलाही समीर नलावडे यांनी यावेळी लगावला. कणकवली खरेदी विक्री संघाच्या सभागृहात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक संजय कामतेकर, विराज भोसले, अभिजीत मुसळे, अजय गांगण आदी उपस्थित होते.बंडू हर्णे म्हणाले, कणकवली नगरपंचायतच्या कामांवर विरोधकांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. कणकवलीत सुलभ शौचालय बांधण्याचे काम केले जात आहे.त्याबाबत जनतेला वस्तुस्थिती समजली पाहिजे.म्हणूनच आम्ही त्याबाबतची माहिती देत आहोत. गेली पाच वर्ष सुशांत नाईक,कन्हैया पारकर  विरोधी पक्ष म्हणून काम करत आहेत.राज्यात त्यांची  सत्ता असताना ते काहीही बोलू शकलेले नाहीत.आमच्या कामाची दखल घेवून राज्यात कणकवली नगरपंचायतला एक नंबर देण्यात आला आहे.त्याबद्दल विरोधकांना पोटशूळ उटल्याने ,ते जनतेची दिशाभूल करण्यासाठी बेताल आरोप करत असल्याचे बंडू हर्णे यावेळी म्हणाले. सुलभ शौचालय बांधकामाचा जीएसटी व अन्य कर वगळता अंदाजपत्रक ६९ लाख ९३ हजार आहे.संपूर्ण बांधकाम ८०२ स्क्वेअर फूटचे आहे. वरचा मजला ५७५ स्क्वेअर फूट असून त्यात पत्रा शेड आणि किचन आहे. तळमजल्यावर पुरुष, स्त्रियांसाठी वेगवेगळी स्वछता गृहे, मोठी आरसीसी वॉटर प्रुप सेफ्टी टॅंक, सेफ्टी वॉल यासारखी कामे होतील. त्यामुळे तळ मजल्याचे सिव्हील वर्क मध्ये ३६८३ रुपये दराप्रमाणे काम होणार आहे. स्वच्छता गृह तसेच अपंगांसाठी वेगळी व्यवस्था आहे. या शौचालयाचे काम अत्यंत अद्ययावत पद्धतीने केले जाणार आहे असे बंडू हर्णे म्हणाले.समीर नलावडे म्हणाले, शिवसेनेचे खासदार आणि आमदार कार्यरत आहेत, जर ते चुकीचे काम असेल तर खरोखर चौकशी लावावी. आम्ही तयार आहोत. जनतेसमोर खोटे बोलायचे, मात्र, रेटून बोलायचे अशी सवय सुशांत नाईक आणि कन्हैया पारकर यांची आहे. देवाकडे प्रार्थना करूनही ते सत्तेवर येणार नसल्याने आरोप करून आमची बदनामी करण्याचा हा विरोधकांचा खटाटोप आहे.विरोधी पक्ष म्हणून आरोप करण्याची त्यांची जबाबदारी होती. ती ते पार पाडत आहेत. आता ५ वर्ष झाल्याने सर्व विरोधी पक्ष एकत्र झाले आहेत. कणकवली नगरपंचायतमध्ये एवढे पैसे जर मिळत असतील तर वैभव नाईक आमदारकी सोडून कणकवलीत निवडणुकीला उभे राहतील. यापुर्वी शिवसेने(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या खासदार आणि आमदारानी रेल्वे स्टेशनजवळ उद्यान करणार असा शब्द दिला होता.पारकर आणि नाईक यांनी एस टी स्टँड विकसित करून भाजीवाल्याना गाळे देणार असे जाहीर केले होते. त्याचे काय झाले? छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या स्थलांतरणावेळी वैभव नाईक, पारकर यांनी विरोध केला होता. आमच्या ताकदीवर त्याचे स्थलांतरण आम्ही करुन दाखवले. आता ते मोर्चाची भाषा करत आहेत. त्यांनी यावे आम्ही तयार आहोत.सनराईज टॉवर मध्ये जागेसाठी सुशांत नाईक यांच्याकडे अनेकानी लाखो रुपये गुंतवले आहेत. त्या गाळ्यांची 'ओसी' होत नाही. त्या विरोधात मी लवकरच आंदोलन छेडणार आहे.नाईक यांनी लोकांची फसवणूक केली आहे, असा आरोप समीर नलावडे यांनी यावेळी केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीVaibhav Naikवैभव नाईक