शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

तिलारी कालव्यातील पाण्याची होतेय चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 15:08 IST

तिलारी कालव्यातून विलवडेमार्गे ओटवणेपर्यंत येणाऱ्या पाण्याची अज्ञातांकडून चोरी होत आहे. त्यामुळे कालवा होऊनही ओटवणे गाव तहानलेलेच आहे. हा प्रकार येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उघड केला.

ठळक मुद्देतिलारी कालव्यातील पाण्याची होतेय चोरीमनसे आक्रमक : अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले

सावंतवाडी : तिलारी कालव्यातून विलवडेमार्गे ओटवणेपर्यंत येणाऱ्या पाण्याची अज्ञातांकडून चोरी होत आहे. त्यामुळे कालवा होऊनही ओटवणे गाव तहानलेलेच आहे. हा प्रकार येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उघड केला.

ही चोरी तत्काळ रोखण्यात यावी. तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान, येत्या दोन दिवसांत ही समस्या दूर केली जाईल, असे आश्वासन तिलारीचे अधिकारी संतोष निपाणीकर यांनी दिले.यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, संतोष भैरवरकर, विठ्ठल गावडे आदी उपस्थित होते. याबाबत सुभेदार व भैरवकर यांनी निपाणीकर यांच्याशी चर्चा करून याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, तिलारी धरणाचे पाणी ओटवणेपर्यंत येण्यासाठी कालवा काढण्यात आलेला आहे.परंतु त्या ठिकाणी पाणी येण्यासाठी २२ मार्चला पाणी सोडण्यात आले. परंतु अद्यापपर्यंत हे पाणी ओटवणेपर्यंत पोहोचलेलेच नाही. त्यामुळे ओटवणे गावात कालवा असूनही परिसरात पाणीटंचाई आहे.प्रश्न तत्काळ सोडवूगावातील लोकांना टँकर बोेलविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नेमका प्रकार काय हे पाहण्याचा प्रयत्न केला असता विलवडे परिसरातील काही लोक व्हॉल्व सोडून तसेच थेट नदीच्या पात्रात पंप टाकून पाणी चोरी करीत असल्याचे दिसून आले आहे.

याबाबत अनेकवेळा अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही कोणीच दखल घेतलेली नाही. त्यामुळे आपण प्रसंगी आंदोलन करू, असा इशारा यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान, आपण तुमच्या मागणीची तत्काळ दखल घेऊ तसेच येत्या दोन दिवसांत हा प्रश्न सोडविला जाईल, असे सांगितले.

टॅग्स :Tilari damतिलारि धरणsindhudurgसिंधुदुर्गWaterपाणी