शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

तिलारी कालव्यातील पाण्याची होतेय चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 15:08 IST

तिलारी कालव्यातून विलवडेमार्गे ओटवणेपर्यंत येणाऱ्या पाण्याची अज्ञातांकडून चोरी होत आहे. त्यामुळे कालवा होऊनही ओटवणे गाव तहानलेलेच आहे. हा प्रकार येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उघड केला.

ठळक मुद्देतिलारी कालव्यातील पाण्याची होतेय चोरीमनसे आक्रमक : अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले

सावंतवाडी : तिलारी कालव्यातून विलवडेमार्गे ओटवणेपर्यंत येणाऱ्या पाण्याची अज्ञातांकडून चोरी होत आहे. त्यामुळे कालवा होऊनही ओटवणे गाव तहानलेलेच आहे. हा प्रकार येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उघड केला.

ही चोरी तत्काळ रोखण्यात यावी. तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान, येत्या दोन दिवसांत ही समस्या दूर केली जाईल, असे आश्वासन तिलारीचे अधिकारी संतोष निपाणीकर यांनी दिले.यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, संतोष भैरवरकर, विठ्ठल गावडे आदी उपस्थित होते. याबाबत सुभेदार व भैरवकर यांनी निपाणीकर यांच्याशी चर्चा करून याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, तिलारी धरणाचे पाणी ओटवणेपर्यंत येण्यासाठी कालवा काढण्यात आलेला आहे.परंतु त्या ठिकाणी पाणी येण्यासाठी २२ मार्चला पाणी सोडण्यात आले. परंतु अद्यापपर्यंत हे पाणी ओटवणेपर्यंत पोहोचलेलेच नाही. त्यामुळे ओटवणे गावात कालवा असूनही परिसरात पाणीटंचाई आहे.प्रश्न तत्काळ सोडवूगावातील लोकांना टँकर बोेलविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नेमका प्रकार काय हे पाहण्याचा प्रयत्न केला असता विलवडे परिसरातील काही लोक व्हॉल्व सोडून तसेच थेट नदीच्या पात्रात पंप टाकून पाणी चोरी करीत असल्याचे दिसून आले आहे.

याबाबत अनेकवेळा अधिकाऱ्यांचे लक्ष वेधूनही कोणीच दखल घेतलेली नाही. त्यामुळे आपण प्रसंगी आंदोलन करू, असा इशारा यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दिला. दरम्यान, आपण तुमच्या मागणीची तत्काळ दखल घेऊ तसेच येत्या दोन दिवसांत हा प्रश्न सोडविला जाईल, असे सांगितले.

टॅग्स :Tilari damतिलारि धरणsindhudurgसिंधुदुर्गWaterपाणी