शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

Sindhudurg News: सावंतवाडीकरांसमोर नवं संकट, अनेक विहिरींचे पाणी कमी होऊ लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 16:16 IST

नगरपालिका दुहेरी संकटात

सावंतवाडी : मोती तलावातील गाळ काढताना संरक्षक कठड्याला धोका पोचल्याने तो कठडा भरपावसात कोसळला त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले खरे; पण आता सावंतवाडीकरांसमोर वेगळेच संकट उभे ठाकण्याची शक्यता आहे.अनेकांच्या मते ऐन जानेवारीच्या तोंडावर तलावातील पाणी सोडून देण्यात आल्याने तलावाच्या आजूबाजूच्या परिसरातील विहिरी आटण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून काही विहिरीचे पाणी ही कमी होऊ लागले आहे.सावंतवाडी मोती तलावातील गाळ गेल्या वर्षी काढण्यात आला  हा गाळ काढत असताना गाळ काढण्यासाठी आणलेल्या पोकलॅड मशीन तलावाच्या फुटपाथवर ठेवण्यात आले होते. त्यावेळी या फुटपाथला धोका निर्माण झाला आणि ऐन पावसाळ्यात हा फुटपाथ तसेच संरक्षक कठडा कोसळला असून जुन्या मुंबई गोवा महामार्गाला ही धोका पोचला आहे. हा धोका वाढत जाणार असे वाटत असल्याने या फुटपाथ तसेच संरक्षक कठड्याचे काम तातडीने व्हावे म्हणून अनेकांनी आंदोलने केली  होतीया आंदोलनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने या साठी प्रयत्न करत 1 कोटी 12 लाख रूपयांचा निधी ही मंजूर करण्यात आला आहे. तसेच त्याचे भूमिपूजन ही अलिकडेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पार पडले.त्यामुळे या कामाची सुरुवात होणार हे आता निश्चित झाले आहे.त्यासाठी तलावातील पाणी ही सोडून देण्यात आले आहे. कारण पाणी सोडले नाही तर कामही करता येणार अशा दुहेरी संकटात नगरपालिका आहे.शहरातील विहिरींना धोकापाणी सोडून देण्यात आल्याने सावंतवाडीकरांसमोर संकट उभे राहण्याची शक्यता नाकारता ही येत नाही कारण जानेवारीच्या सुरुवातीलाच पाणी सोडल्याने अनेक विहिरींचे पाणी आटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तलावातील पाणी हे मे च्या अखेरपर्यंत कमी होत असते त्यावेळी शहरातील अनेक विहिरी या कोरड्या पडतात मात्र आता जानेवारीच्या सुरुवातीलाच पाणी सोडून देण्यात आल्याने शहरातील विहिरीना धोका निर्माण झाला आहे.प्रशासनावर आला दबाव यामुळे शहरात पाणी टंचाई भासण्याची शक्यता जास्त आहे.काहि च्या मते हे काम मे महिन्यात सुरू करणे संयुक्तिक होते.शहर वासियाच्या पाण्याचा प्रश्न मिटला असता आणि काम ही झाले असते पण सर्वपक्षीयाची आंदोलने आणि प्रशासनावर असलेला दबाव यामुळे काम घाईगडबडीत सुरू केले असले तरी ते लवकरात लवकर संपवले नाही.सावंतवाडीवासियाच्या उग्र प्रतिकिया येण्यास वेळ लागणार नाही

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWaterपाणी