शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्ग पूर्णत्वाची सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी दिली डेडलाईन, रिफायनरी प्रकल्पाबाबत म्हणाले..

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 27, 2022 19:02 IST

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी विकासाची गती कशी असेल हे सर्वानाच दाखवून दिले आहे.

कुडाळ (सिंधुदुर्ग) : मुंबईगोवामहामार्गाचे ‍सिंधुदुर्गातील काम ९५ टक्के पूर्ण झाले असून रस्ता पूर्णत्वाकडे जात आहे. तर रायगड, रत्नागिरीचे काम प्रगतीपथावर आहे. तरीही यातील अडचणी दूर करुन युध्दपातळीवर काम करु. या महामार्ग पूर्णत्वाची डेडलाईन २३ डिसेबर २०२३ ची असेल. पनवेल पासून बांद्यापर्यंत हा महामार्ग पूर्ण करून तो खुला होईल अशी हमी शनिवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत दिली.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रमोद जठार, दत्ता सामंत, अतुल काळसेकर, ॲड. अजित गोगटे, प्रभाकर सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली.मुंबईगोवा महार्गाच्या रखडलेले काम आपण गांर्भीयाने घेतले आहे. अधिवेशनात लक्षवेधी आल्यानंतर आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आज प्रत्यक्ष पहाणी केली आहे. महामार्गाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करुन ते काम दुसऱ्या यंत्रणेमार्फत पूर्ण करुन घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करायचे असेल तर लोकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे. महामार्गाचे रखडलेले काम असो किंवा जिल्ह्यातील घाट रस्तांचा प्रश्न असो सद्या भाजपचे गतीमान सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देशाचे नेते आहेत. त्यांनी या महामार्गाला मंजूरी व निधी दिला आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी विकासाची गती कशी असेल हे सर्वानाच दाखवून दिले आहे. त्यामुळे महामार्ग पुर्णत्वाकडे मेण्यासाठी जी डेडलाईन आता दिली आहे त्या काळातच हा महामार्ग पूर्ण होईल अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.रिफायनरी प्रकल्प पूर्ण होणारचनाणार येथील रिफायनरी प्रकल्प हा भारतीय जनता पक्षाने आणलेला प्रकल्प आहे तो पूर्ण होणारच आहे. राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी अनेक प्रश्नांसंदर्भात आज आपली भेट घेतली. या दौऱ्यात अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भेट घेतली. त्यात शिवसेनेचे कुडाळचे आमदार वैभव नाईक यांचाही समावेश होता. विकासकामांवर ही भेट असल्याचे स्पष्ट केले.

अर्धवट कामे तातडीने पूर्ण होतीलमुंबई गोवा महामार्गावर ५६ बेकायदेशीर मिडल कट असून  यामुळे अनेक अपघात झाले आहे याबाबतही पत्रकारांनी त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले महामार्गावरील वाहतूक सुकर व्हावी  वाहनचालक व पादचाऱ्यांना त्रास कमी व्हावा या दृष्टीने ज्या अडचणी आहेत व जी कामे अर्धवट आहेत ती तातडीने पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही रवींद्र चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgoaगोवाMumbaiमुंबईhighwayमहामार्ग