शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
4
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
5
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
6
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
7
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
8
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
9
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
10
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
11
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
12
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
13
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
14
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
15
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
16
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
17
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
18
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
19
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
20
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम

मुंबई-गोवा महामार्ग पूर्णत्वाची सार्वजनिक बांधकाममंत्र्यांनी दिली डेडलाईन, रिफायनरी प्रकल्पाबाबत म्हणाले..

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 27, 2022 19:02 IST

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी विकासाची गती कशी असेल हे सर्वानाच दाखवून दिले आहे.

कुडाळ (सिंधुदुर्ग) : मुंबईगोवामहामार्गाचे ‍सिंधुदुर्गातील काम ९५ टक्के पूर्ण झाले असून रस्ता पूर्णत्वाकडे जात आहे. तर रायगड, रत्नागिरीचे काम प्रगतीपथावर आहे. तरीही यातील अडचणी दूर करुन युध्दपातळीवर काम करु. या महामार्ग पूर्णत्वाची डेडलाईन २३ डिसेबर २०२३ ची असेल. पनवेल पासून बांद्यापर्यंत हा महामार्ग पूर्ण करून तो खुला होईल अशी हमी शनिवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी कुडाळ येथील पत्रकार परिषदेत दिली.यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, प्रमोद जठार, दत्ता सामंत, अतुल काळसेकर, ॲड. अजित गोगटे, प्रभाकर सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली.मुंबईगोवा महार्गाच्या रखडलेले काम आपण गांर्भीयाने घेतले आहे. अधिवेशनात लक्षवेधी आल्यानंतर आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आज प्रत्यक्ष पहाणी केली आहे. महामार्गाच्या कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करुन ते काम दुसऱ्या यंत्रणेमार्फत पूर्ण करुन घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करायचे असेल तर लोकांनीही सहकार्य करणे आवश्यक आहे. महामार्गाचे रखडलेले काम असो किंवा जिल्ह्यातील घाट रस्तांचा प्रश्न असो सद्या भाजपचे गतीमान सरकार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देशाचे नेते आहेत. त्यांनी या महामार्गाला मंजूरी व निधी दिला आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी विकासाची गती कशी असेल हे सर्वानाच दाखवून दिले आहे. त्यामुळे महामार्ग पुर्णत्वाकडे मेण्यासाठी जी डेडलाईन आता दिली आहे त्या काळातच हा महामार्ग पूर्ण होईल अशी ग्वाही चव्हाण यांनी दिली.रिफायनरी प्रकल्प पूर्ण होणारचनाणार येथील रिफायनरी प्रकल्प हा भारतीय जनता पक्षाने आणलेला प्रकल्प आहे तो पूर्ण होणारच आहे. राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी अनेक प्रश्नांसंदर्भात आज आपली भेट घेतली. या दौऱ्यात अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भेट घेतली. त्यात शिवसेनेचे कुडाळचे आमदार वैभव नाईक यांचाही समावेश होता. विकासकामांवर ही भेट असल्याचे स्पष्ट केले.

अर्धवट कामे तातडीने पूर्ण होतीलमुंबई गोवा महामार्गावर ५६ बेकायदेशीर मिडल कट असून  यामुळे अनेक अपघात झाले आहे याबाबतही पत्रकारांनी त्यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले महामार्गावरील वाहतूक सुकर व्हावी  वाहनचालक व पादचाऱ्यांना त्रास कमी व्हावा या दृष्टीने ज्या अडचणी आहेत व जी कामे अर्धवट आहेत ती तातडीने पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही रवींद्र चव्हाण यांनी दिली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गgoaगोवाMumbaiमुंबईhighwayमहामार्ग