शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

हत्ती हटाव मोहीम पावसाळ्यानंतर राबविणार, वाढीव नुकसान भरपाईसाठी शासन प्रयत्नशील - मंत्री केसरकर

By अनंत खं.जाधव | Updated: September 11, 2023 18:03 IST

सावंतवाडीत विशेष बैठक

सावंतवाडी : हत्ती तसेच अन्य वन्य प्राण्यांनी मोठ्याप्रमाणात शेती बागायतीची नुकसानी केली असून त्याची नुकसान भरपाई वाढीवून देण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे. लवकरच याबाबत शासन निर्णय घेतला जाणार आहे. तसेच हत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पावसाळ्यानंतर विशेष मोहीम राबवण्यात येईल असे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे.दोडामार्ग तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हत्ती व वन्य प्राण्यांकडून शेती बागायतींचे होणारे नुकसान लक्षात घेता मंत्री केसरकर यांनी सोमवारी येथील वनविभागाच्या कार्यालयात हत्ती हटाव समितीचे प्रमुख तसेच शेतकरी बांधवांसोबत वाढीव नुकसान भरपाई संदर्भात बैठक आयोजित केली होती. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी, माजी आमदार राजन तेली, प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर तहसिलदार श्रीधर पाटील  उपस्थित होते.यावेळी झालेल्या चर्चेत शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त फळझाडांना वाढीव नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यात नारळ हे पीक जास्त करून कोकणामध्ये अधिक असल्याने त्यासाठी वेगळा निकष ठेवून जास्त नुकसान भरपाई देण्याचे सुचवले. हत्ती लहान नारळाच्या झाडांचे जास्त नुकसान करतो. त्यामुळे झाडाच्या वयोमानानुसार नुकसान भरपाई नको तर सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. तर ज्याप्रमाणे एखाद्या वेळी वनविभागाच्या हद्दीतील झाडांची तोड झाल्यावर शेतकऱ्याला जी शिक्षा होते, त्याप्रमाणे वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या झाडाचे नुकसान केल्यास त्यानुसार नुकसान भरपाई मिळावी असेही मागणी करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करता मंत्री केसरकर यांनी मोठ्या झाडाला तीस हजार रुपये तर लहान झाडाला पंधरा हजार रुपये नुकसान भरपाई बाबत एकमत केले. तसेच दिवाळी नंतर हत्ती हटाव मोहीम राबविण्यात येईल असेही यावेळी स्पष्ट केले.या बैठकीला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी, दोडामार्ग तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, प्रेमानंद देसाई, राजू निंबाळकर, शैलेश दळवी,जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, हत्तीबाधीत समितीचे सदस्य पंकज गवस, संतोष गवस, विष्णू देसाई, गोपाळ गवस,यांच्यासह हत्ती बाधित गावातील शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforest departmentवनविभागFarmerशेतकरीDeepak Kesarkarदीपक केसरकर