शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली-निमेवाडी येथील रेल्वे ट्रॅकवर आढळलेला मृतदेह असलदेतील रिक्षाचालकाचा

By सुधीर राणे | Updated: February 24, 2024 16:10 IST

कणकवली: कणकवली निमेवाडी येथील रेल्वे ट्रॅकवर शुक्रवारी सायंकाळी जनशताब्दी एक्स्प्रेसची धडक बसल्याने अनोळखी युवकाचा मृत्यू झाला होता. हा मृतदेह ...

कणकवली: कणकवली निमेवाडी येथील रेल्वे ट्रॅकवर शुक्रवारी सायंकाळी जनशताब्दी एक्स्प्रेसची धडक बसल्याने अनोळखी युवकाचा मृत्यू झाला होता. हा मृतदेह रिक्षाचालक अजय उर्फ तातोबा गणपत घाडी (४३, रा. असलदे) यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

कणकवली पोलिस व  रेल्वे सुरक्षा बलाने घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर चौकशी करतानाच रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक तरुण रेल्वे ट्रॅकवरून चालत जाताना दिसला होता. त्याची रिक्षा रेल्वे स्थानक वाहनतळावर पार्क केली होती. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना संपर्क करून माहिती दिली. त्यांनी कणकवली येथे येऊन मृतदेह, कपडे व चप्पल पाहिल्यानंतर त्याला ओळखले. त्यामुळे तो मृतदेह रिक्षाचालक अजय उर्फ तातोबा गणपत घाडी यांचा असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, तातोबा घाडी यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.याबाबत अधिक वृत्त असे की, असलदे येथील अजय  घाडी हे  शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घरामधून रिक्षा घेवून  नेहमीप्रमाणे नांदगाव रिक्षा स्टँड येथे गेले होते. मात्र, सायंकाळी ६ वाजले तरी ते घरी परतले नव्हते. त्यांच्या शेजारच्या आजारी असलेल्या एका मुलाला दवाखान्यात उपचारासाठी नेण्यासाठी रिक्षा हवी असल्याने त्यांना कुटुंबीयांनी फोन लावला तर तो बंद होता.दरम्यानच्या काळात कणकवली रेल्वे स्थानक परिसरात त्यांची रिक्षा उभी असल्याचे ग्रामस्थ व पोलिसांनी घाडी यांच्या कुटुंबियाना कळवले. त्यानंतर त्यांचे भाऊ व नातेवाईक कणकवली येथे आले. भाऊ मारुती घाडी यांना पहिल्यांदा पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी  उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहात नेले. त्यानंतर तातोबा घाडी याचाच तो मृतदेह असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांना सांगितले.तातोबा घाडी यांनी कणकवली रेल्वे स्थानक वाहन तळावर आपली रिक्षा उभी केली होती. त्या ठिकाणी पोलिसांना मोबाईल, रिक्षेची चावी, ओळखपत्र, रोख रक्कम आढळली आहे.  पोलिसांनी याप्रकरणी मारुती घाडी यांचे जबाब नोंदविले आहेत. तसेच सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. अजय घाडी हे प्रामाणिक रिक्षाचालक म्हणून परिचित होते. नांदगाव तिठा येथे ते रिक्षा व्यवसाय करीत असत. तेथील सन्मित्र रिक्षा संघटनेने शनिवारी रिक्षा बंद ठेवत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा,मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बापू खरात, हवालदार विनोद सुपल,चंद्रकांत झोरे करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस