शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

कणकवली-निमेवाडी येथील रेल्वे ट्रॅकवर आढळलेला मृतदेह असलदेतील रिक्षाचालकाचा

By सुधीर राणे | Updated: February 24, 2024 16:10 IST

कणकवली: कणकवली निमेवाडी येथील रेल्वे ट्रॅकवर शुक्रवारी सायंकाळी जनशताब्दी एक्स्प्रेसची धडक बसल्याने अनोळखी युवकाचा मृत्यू झाला होता. हा मृतदेह ...

कणकवली: कणकवली निमेवाडी येथील रेल्वे ट्रॅकवर शुक्रवारी सायंकाळी जनशताब्दी एक्स्प्रेसची धडक बसल्याने अनोळखी युवकाचा मृत्यू झाला होता. हा मृतदेह रिक्षाचालक अजय उर्फ तातोबा गणपत घाडी (४३, रा. असलदे) यांचा असल्याचे स्पष्ट झाले.

कणकवली पोलिस व  रेल्वे सुरक्षा बलाने घटनास्थळी जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. त्यानंतर चौकशी करतानाच रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक तरुण रेल्वे ट्रॅकवरून चालत जाताना दिसला होता. त्याची रिक्षा रेल्वे स्थानक वाहनतळावर पार्क केली होती. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना संपर्क करून माहिती दिली. त्यांनी कणकवली येथे येऊन मृतदेह, कपडे व चप्पल पाहिल्यानंतर त्याला ओळखले. त्यामुळे तो मृतदेह रिक्षाचालक अजय उर्फ तातोबा गणपत घाडी यांचा असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, तातोबा घाडी यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.याबाबत अधिक वृत्त असे की, असलदे येथील अजय  घाडी हे  शुक्रवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घरामधून रिक्षा घेवून  नेहमीप्रमाणे नांदगाव रिक्षा स्टँड येथे गेले होते. मात्र, सायंकाळी ६ वाजले तरी ते घरी परतले नव्हते. त्यांच्या शेजारच्या आजारी असलेल्या एका मुलाला दवाखान्यात उपचारासाठी नेण्यासाठी रिक्षा हवी असल्याने त्यांना कुटुंबीयांनी फोन लावला तर तो बंद होता.दरम्यानच्या काळात कणकवली रेल्वे स्थानक परिसरात त्यांची रिक्षा उभी असल्याचे ग्रामस्थ व पोलिसांनी घाडी यांच्या कुटुंबियाना कळवले. त्यानंतर त्यांचे भाऊ व नातेवाईक कणकवली येथे आले. भाऊ मारुती घाडी यांना पहिल्यांदा पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी  उपजिल्हा रुग्णालयातील शवगृहात नेले. त्यानंतर तातोबा घाडी याचाच तो मृतदेह असल्याचे स्पष्ट झाल्याचे पोलिसांना सांगितले.तातोबा घाडी यांनी कणकवली रेल्वे स्थानक वाहन तळावर आपली रिक्षा उभी केली होती. त्या ठिकाणी पोलिसांना मोबाईल, रिक्षेची चावी, ओळखपत्र, रोख रक्कम आढळली आहे.  पोलिसांनी याप्रकरणी मारुती घाडी यांचे जबाब नोंदविले आहेत. तसेच सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. अजय घाडी हे प्रामाणिक रिक्षाचालक म्हणून परिचित होते. नांदगाव तिठा येथे ते रिक्षा व्यवसाय करीत असत. तेथील सन्मित्र रिक्षा संघटनेने शनिवारी रिक्षा बंद ठेवत त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा,मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बापू खरात, हवालदार विनोद सुपल,चंद्रकांत झोरे करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस