शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
3
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
4
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
5
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
6
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
7
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."
8
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
9
Video - "मी तुमच्या मुलीवर उपचार करणार नाही..."; डॉक्टरची रुग्णाच्या वडिलांना मारहाण
10
Vastu Shastra: वास्तु शास्त्रानुसार घराच्या 'या' भागात ठेवा मोरपीस, आयुष्यात भरतील नवे रंग!
11
मायक्रोसॉफ्टने नोकियानंतर या कंपनीवर तगडा पैसा लावला; Ai च्या इतिहासातील सर्वात मोठी डील, फळणार का?
12
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
13
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
14
पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठ्ठा राडा !! मोहम्मद रिझवान पाक क्रिकेट बोर्डाला नडला... काय घडलं?
15
किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; सेन्सेक्स ८५,००० अंकांच्या आणि निफ्टी २६,००० अंकांच्या जवळ
16
PPF ला साधं समजू नका! पती-पत्नी मिळून बनवू शकता ₹१.३३ कोटींचा फंड, तोही टॅक्स फ्री
17
'तो' प्रवास ठरला शेवटचा! कुटुंबीयांसमोरच वडील आणि मुलीचा होरपळून मृत्यू; १० जण जखमी
18
ब्राझीलमध्ये रेड कमांडोविरोधात युद्ध सुरु; रिओमध्ये मोठ्या अड्ड्यावर हेलिकॉप्टरद्वारे हल्ला, माफियांकडून ड्रोन हल्ल्याने प्रत्यूत्तर
19
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
20
Ramkesh Murder Case: बदल्याची आग! मोबाईल डेटा, हार्ड ड्राइव्ह, अश्लील...; २० वर्षीय मुलीने का केली पार्टनरची हत्या?

केंद्र अन् राज्य सरकारने जनतेला देशोधडीला लावले, मनसे नेते परशुराम उपरकरांचा हल्लाबोल

By सुधीर राणे | Updated: April 1, 2023 17:07 IST

३ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भिक मांगो आंदोलन छेडणार

कणकवली: केंद्र सरकार जनतेची दिशाभूल आणि फसवणूक करीत आहे. आधार कार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी जनतेची फरफट होत आहे. ज्यांनी ते कार्ड लिंक केलेले नाही त्या लोकांना १ हजार रुपये दंड भरावा लागत आहे. केंद्र आणि राज्य सरकार जनतेला त्रास देत असून त्यांनी जनतेला देशोधडीला लावले असल्याचा आरोप मनसेनेते माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.तसेच ३ एप्रिल रोजी सरकारचा निषेध करीत ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भिक मांगो आंदोलन छेडणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी ते म्हणाले, केंद्र सरकार सातत्याने नवनवीन  उपक्रम आणून सामान्य नागरिकांची फिळवणूक करीत आहे. ज्यांनी करोडो रुपयांची सरकारांची आणि बँकांची फसवणूक केली, त्यांना सुट दिली जात आहे. ज्यांनी त्यावेळी शून्य रकमेचे बँक खाते उघडले, त्यांना आता एक हजार ते बाराशे रुपयांचा दंड केला जाणार आहे. त्यामुळे ३ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भिक मांगो आंदोलन छेडण्यात येणार आहे.आता रेशनकार्ड पुरावा बंद करत आधारकार्ड नोंदणी सरकारने करायला लावली आहे. तसेच जुने आधार कार्ड पुन्हा अपडेट करायला सांगितले आहे. त्याचा भुर्दंड नागरिकांना पडत आहे. बँकेतून पैसे काढणे आणि भरण्यासाठीही आता शुल्क आकारले  जात आहे हे केंद्र सरकारचे पाप असल्याचा टोला उपरकर यांनी लगावला. ..त्यामुळे महिलांच्या डोळ्यात अश्रू महिलांसाठी उज्ज्वला गॅस योजना आणली. धूरामुळे महिलांच्या डोळ्यात पाणी येवू नये हे धोरण सरकारचे होते. आता तो गॅस विकत घ्यावा लागत असल्याने महिलांच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. सर्वसामान्य नागरिकांना आता गॅस १११७ रुपयाने घ्यावा लागतो ही जनतेची फसवणूक आहे. घरगुती गॅसचे अनुदान सुरुवातीला बँक खात्यावर जमा केले आणि आता ती अनुदानाची रक्कम देणे बंद केले आहे. काही महिने धान्य वितरण मोफत केले आणि आता त्याचे पैसे लोकांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत.तेही  केव्हा गायब होतील हे सांगता येणार नाही.ही रेशन धान्य बंद करण्याची व्यूहरचना असल्याचा आरोप उपरकर यांनी केला. जनतेने विचार करण्याची गरज लोकांची सहानूभूती मिळवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. मात्र, मोठ्या प्रमाणात केंद्र शासनाकडून सामान्य जनतेची पिळवणूक सुरू आहे. आता जनतेने विचार करण्याची गरज आहे. ज्या सवलती मिळतात त्या सरकार तुमच्या खिशातील रक्कम काढून तुम्हाला देत असते. हे लक्षात घ्यायला हवे.राज्य सरकार नोकर भरती करणार म्हणून अनेक  बेरोजगार प्रतीक्षेत होते. त्यासाठीही ९ कंपन्या नेमल्या गेल्या आहेत. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे असूनही जिल्ह्यातील ठेकेदारांची १३ कोटी रुपयांची कामाची बिले थकीत आहेत. कोट्यवधी रुपये निधी आल्याची घोषणा केली जात आहे. मात्र प्रत्यक्षात काहीही कामे होत नाहीत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCentral Governmentकेंद्र सरकारInflationमहागाईMNSमनसेParshuram Upkarपरशुराम उपरकर