शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

कणकवली परिसरात बंद घरांना चोरटे करताहेत लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 17:29 IST

कणकवली शहर तसेच परिसरात चोऱ्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. त्यात लाखो रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यानी लंपास केला आहे. मात्र, या चोऱ्यांचा छडा लावण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे पोलीस दलातील वरीष्ठांनी ही बाब गंभिरपणे घेतली असून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी नियोजनबद्ध आराखडाच बनविला आहे.

ठळक मुद्देपोलिसांना दिली जबाबदारी चोरट्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचा एक्शन प्लॅन

कणकवली : कणकवली शहर तसेच परिसरात चोऱ्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. त्यात लाखो रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यानी लंपास केला आहे. मात्र, या चोऱ्यांचा छडा लावण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे पोलीस दलातील वरीष्ठांनी ही बाब गंभिरपणे घेतली असून चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी नियोजनबद्ध आराखडाच बनविला आहे.या चोऱ्यांचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांच्यावर कणकवली पोलिसांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आता सोपवण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी कणकवली पोलीस ठाण्यात आता ठाण मांडून बसणार आहेत.कोरोनाचा फटका सर्वच व्यवसायांना बसला आहे. त्यामुळे आधीच हवालदिल झालेल्या नागरिकांना चोरट्यांकडून दणका दिला जात आहे. कणकवली परिसरात अलीकडे मोठ्या चोरीच्या घटना घडल्या आहेत. उद्योग , व्यवसाय बंद असल्याने पोटाची खळगी भरण्यासाठी काही व्यक्तींकडून चोरीचा मार्ग अवलंबला जात आहे का ? या दृष्टीने पोलिसांकडून तपास होणे आवश्यक आहे. दिवसाढवळ्या कणकवली साईनगर, वरचीवाडी येथे रोख रकमेसह दागिणे असा सव्वा तीन लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. तर ही घटना ताजी असतानाच त्याच रात्री चोरट्यांनी शहरातील बंद असलेला एक बंगला, दोन घरे तसेच चार फ्लॅटना लक्ष करत डल्ला मारला. त्यामध्ये रोख रक्कम, चांदीच्या वस्तू असा मुद्देमाल गायब करण्यात आला.शहरात एकाच रात्री सात ठिकाणी चोरीची घटना घडली. तर त्यानंतर आता कलमठ परिसरातही बंद घराना लक्ष करून चोरटे आपला कार्यभाग साधत आहेत. त्यामुळे कणकवली परिसरात चोरट्यांची एखादी टोळी पुन्हा सक्रिय झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये स्थानिक चोरट्यांचा सहभाग आहे का ? याचा शोध घेणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.यापूर्वीही कणकवली शहरात स्थानिक युवकांच्या टोळीने चोरीचा प्रकार केला होता. आपल्या दैनंदिन चैनीसाठी चोऱ्या करून पैसे मिळविण्याचा प्रकार त्यावेळी उघड झाला होता. तसाच प्रकार या चोरीच्या वेळीही घडला आहे का? हे पोलिसांनी तपासणे आता आवश्यक आहे.अतिरीक्त पोलीस अधीक्षकांचे मार्गदर्शनकाही अल्पवयीन मुले दारू, गांजा अशा व्यसनांच्या आहारी गेली आहेत. त्यांच्याकडून चोरीचे प्रकार घडू शकतात. त्यापैकी काही मुलांचा चोरीप्रकरणात सहभाग आहे का ? यादृष्टीने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली तर निश्चितच काही धागेदोरे त्यांच्या हाती लागू शकतील. अन्यथा चोरट्यांना कोणाचा वचक नसल्याने त्यांच्याकडून पुन्हा शहरात व परिसरात मोठ्या चोरीच्या घटना घडू शकतील. त्यामुळे या चोरीच्या तपासात पोलिसांची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे. अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार पाटील यांनी चोरीच्या तपासाबाबत कणकवली पोलीस ठाण्याला भेट देत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यानंतर ऍक्शन प्लॅन बनविण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसsindhudurgसिंधुदुर्ग