शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:45 IST

Coronavirus, statetransport, vaibhavnaik, kankavli, sindhudurgnews जिल्ह्यातील विद्यार्थी , नागरीकांची गैरसोय होणार नाही .याची एसटी प्रशासनाने काळजी घ्यावी . अशी सूचना करतानाच एसटी कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवालही तातडीने देण्याबाबतची व्यवस्था करण्यात येईल . असे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देजिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या!वैभव नाईक यांची सूचना; एसटी विभाग नियंत्रकांची घेतली भेट

कणकवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या सर्व फेऱ्या सुरू नसल्याने काही चालक, वाहकांना मुंबई येथे पाठविण्यात आले आहे . असे असताना काहीजण यात राजकारण करुन कर्मचाऱ्यांच्या भावना भडकविण्याचे काम करत आहेत . यापुढे जिल्ह्यातील विद्यार्थी , नागरीकांची गैरसोय होणार नाही .याची एसटी प्रशासनाने काळजी घ्यावी . अशी सूचना करतानाच एसटी कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवालही तातडीने देण्याबाबतची व्यवस्था करण्यात येईल . असे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.सिंधुदुर्ग जिल्हयातील एसटी वाहतूकीच्या पार्श्वभूमीवर आमदार नाईक यांनी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांची विभागीय कार्यालयात मंगळवारी भेट घेतली. यावेळी कुडाळचे आगार व्यवस्थापक सुजित डोंगरे , मालवणचे नरेंद्र बोधे , प्रकाश नेरूरकर , एस . एस . नाडकर्णी आदी अधिकारी उपस्थित होते . यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.यावेळी कोरोनाच्या संकटापूर्वी सिंधुदुर्ग विभागात एसटीच्या ४०० शेड्युल व १८०० फेऱ्या सुरू होत्या. त्यापैकी २७५ शेड्युल व १३१७ बसफेऱ्या आता सुरु झाल्या आहेत . १ डिसेंबरपासून शालेय विद्यार्थ्यांना पास देणे चालू करण्यात आले आहे . मुंबई , ठाणे येथे नैमित्तीक करारावर पाठविलेल्या बसेस व चालक , वाहक हे स्थानिक पातळीवर गैरसोय करुन पाठविलेले नाहीत , अशी माहिती विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली .त्यावर जिल्हयातून प्रत्येक आगारातून सध्या सुरु असलेल्या फेऱ्यांबाबतची माहिती वृत्तपत्रात द्या. तसेच बसस्थानकांवर दर्शनी भागात त्यांची माहिती लावण्याच्या सूचना नाईक यांनी दिल्या . तसेच प्रत्येक आगाराचा संपर्क नंबरही तिथे देण्यात यावा , असे स्पष्ट केले . यावेळी झालेल्या चर्चेत एसटी वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आल्यानंतर आतापर्यंत जवळपास ६० टक्केहून अधिक फेऱ्या सुरु झाल्या असल्याचे रसाळ यांनी सांगितले .जिल्हयातील विद्यार्थ्यांसाठी १ डिसेंबरपासून प्रत्येक आगारात पास देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे . आयटीआयच्या विद्यार्थ्यांना पास देण्यात आलेले आहेत . ज्या शाळा सुरू झालेल्या आहेत , त्या १०० टक्के विद्यार्थ्यांना एसटीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे . तसेच प्रवासी उपलब्धतेनुसार इतर बसफेऱ्याही सोडण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे यावेळी रसाळ यांनी सांगितले.कोणीही राजकारण करू नये !मुंबई , ठाणेहून आलेल्या चालक , वाहकांची कोरोना टेस्ट करण्यास विलंब होऊ नये , तसेच त्यांचे अहवालही तातडीने मिळण्याच्यादृष्टीने ओरोस येथे चर्चा करुन नियोजन करण्यात आले आहे . त्यामुळे यात राजकारण करण्याचा कुणी प्रयत्न करु नये . एसटीचे उत्पन्न वाढीसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे वैभव नाईक यावेळी म्हणाले . 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीVaibhav Naikवैभव नाईक Kankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग