शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:45 IST

Coronavirus, statetransport, vaibhavnaik, kankavli, sindhudurgnews जिल्ह्यातील विद्यार्थी , नागरीकांची गैरसोय होणार नाही .याची एसटी प्रशासनाने काळजी घ्यावी . अशी सूचना करतानाच एसटी कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवालही तातडीने देण्याबाबतची व्यवस्था करण्यात येईल . असे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देजिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या!वैभव नाईक यांची सूचना; एसटी विभाग नियंत्रकांची घेतली भेट

कणकवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या सर्व फेऱ्या सुरू नसल्याने काही चालक, वाहकांना मुंबई येथे पाठविण्यात आले आहे . असे असताना काहीजण यात राजकारण करुन कर्मचाऱ्यांच्या भावना भडकविण्याचे काम करत आहेत . यापुढे जिल्ह्यातील विद्यार्थी , नागरीकांची गैरसोय होणार नाही .याची एसटी प्रशासनाने काळजी घ्यावी . अशी सूचना करतानाच एसटी कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवालही तातडीने देण्याबाबतची व्यवस्था करण्यात येईल . असे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.सिंधुदुर्ग जिल्हयातील एसटी वाहतूकीच्या पार्श्वभूमीवर आमदार नाईक यांनी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांची विभागीय कार्यालयात मंगळवारी भेट घेतली. यावेळी कुडाळचे आगार व्यवस्थापक सुजित डोंगरे , मालवणचे नरेंद्र बोधे , प्रकाश नेरूरकर , एस . एस . नाडकर्णी आदी अधिकारी उपस्थित होते . यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.यावेळी कोरोनाच्या संकटापूर्वी सिंधुदुर्ग विभागात एसटीच्या ४०० शेड्युल व १८०० फेऱ्या सुरू होत्या. त्यापैकी २७५ शेड्युल व १३१७ बसफेऱ्या आता सुरु झाल्या आहेत . १ डिसेंबरपासून शालेय विद्यार्थ्यांना पास देणे चालू करण्यात आले आहे . मुंबई , ठाणे येथे नैमित्तीक करारावर पाठविलेल्या बसेस व चालक , वाहक हे स्थानिक पातळीवर गैरसोय करुन पाठविलेले नाहीत , अशी माहिती विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली .त्यावर जिल्हयातून प्रत्येक आगारातून सध्या सुरु असलेल्या फेऱ्यांबाबतची माहिती वृत्तपत्रात द्या. तसेच बसस्थानकांवर दर्शनी भागात त्यांची माहिती लावण्याच्या सूचना नाईक यांनी दिल्या . तसेच प्रत्येक आगाराचा संपर्क नंबरही तिथे देण्यात यावा , असे स्पष्ट केले . यावेळी झालेल्या चर्चेत एसटी वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आल्यानंतर आतापर्यंत जवळपास ६० टक्केहून अधिक फेऱ्या सुरु झाल्या असल्याचे रसाळ यांनी सांगितले .जिल्हयातील विद्यार्थ्यांसाठी १ डिसेंबरपासून प्रत्येक आगारात पास देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे . आयटीआयच्या विद्यार्थ्यांना पास देण्यात आलेले आहेत . ज्या शाळा सुरू झालेल्या आहेत , त्या १०० टक्के विद्यार्थ्यांना एसटीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे . तसेच प्रवासी उपलब्धतेनुसार इतर बसफेऱ्याही सोडण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे यावेळी रसाळ यांनी सांगितले.कोणीही राजकारण करू नये !मुंबई , ठाणेहून आलेल्या चालक , वाहकांची कोरोना टेस्ट करण्यास विलंब होऊ नये , तसेच त्यांचे अहवालही तातडीने मिळण्याच्यादृष्टीने ओरोस येथे चर्चा करुन नियोजन करण्यात आले आहे . त्यामुळे यात राजकारण करण्याचा कुणी प्रयत्न करु नये . एसटीचे उत्पन्न वाढीसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे वैभव नाईक यावेळी म्हणाले . 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीVaibhav Naikवैभव नाईक Kankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग