शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

जिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:45 IST

Coronavirus, statetransport, vaibhavnaik, kankavli, sindhudurgnews जिल्ह्यातील विद्यार्थी , नागरीकांची गैरसोय होणार नाही .याची एसटी प्रशासनाने काळजी घ्यावी . अशी सूचना करतानाच एसटी कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवालही तातडीने देण्याबाबतची व्यवस्था करण्यात येईल . असे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देजिल्ह्यातील नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या!वैभव नाईक यांची सूचना; एसटी विभाग नियंत्रकांची घेतली भेट

कणकवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीच्या सर्व फेऱ्या सुरू नसल्याने काही चालक, वाहकांना मुंबई येथे पाठविण्यात आले आहे . असे असताना काहीजण यात राजकारण करुन कर्मचाऱ्यांच्या भावना भडकविण्याचे काम करत आहेत . यापुढे जिल्ह्यातील विद्यार्थी , नागरीकांची गैरसोय होणार नाही .याची एसटी प्रशासनाने काळजी घ्यावी . अशी सूचना करतानाच एसटी कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवालही तातडीने देण्याबाबतची व्यवस्था करण्यात येईल . असे आमदार वैभव नाईक यांनी स्पष्ट केले.सिंधुदुर्ग जिल्हयातील एसटी वाहतूकीच्या पार्श्वभूमीवर आमदार नाईक यांनी विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांची विभागीय कार्यालयात मंगळवारी भेट घेतली. यावेळी कुडाळचे आगार व्यवस्थापक सुजित डोंगरे , मालवणचे नरेंद्र बोधे , प्रकाश नेरूरकर , एस . एस . नाडकर्णी आदी अधिकारी उपस्थित होते . यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.यावेळी कोरोनाच्या संकटापूर्वी सिंधुदुर्ग विभागात एसटीच्या ४०० शेड्युल व १८०० फेऱ्या सुरू होत्या. त्यापैकी २७५ शेड्युल व १३१७ बसफेऱ्या आता सुरु झाल्या आहेत . १ डिसेंबरपासून शालेय विद्यार्थ्यांना पास देणे चालू करण्यात आले आहे . मुंबई , ठाणे येथे नैमित्तीक करारावर पाठविलेल्या बसेस व चालक , वाहक हे स्थानिक पातळीवर गैरसोय करुन पाठविलेले नाहीत , अशी माहिती विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिली .त्यावर जिल्हयातून प्रत्येक आगारातून सध्या सुरु असलेल्या फेऱ्यांबाबतची माहिती वृत्तपत्रात द्या. तसेच बसस्थानकांवर दर्शनी भागात त्यांची माहिती लावण्याच्या सूचना नाईक यांनी दिल्या . तसेच प्रत्येक आगाराचा संपर्क नंबरही तिथे देण्यात यावा , असे स्पष्ट केले . यावेळी झालेल्या चर्चेत एसटी वाहतूक टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आल्यानंतर आतापर्यंत जवळपास ६० टक्केहून अधिक फेऱ्या सुरु झाल्या असल्याचे रसाळ यांनी सांगितले .जिल्हयातील विद्यार्थ्यांसाठी १ डिसेंबरपासून प्रत्येक आगारात पास देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे . आयटीआयच्या विद्यार्थ्यांना पास देण्यात आलेले आहेत . ज्या शाळा सुरू झालेल्या आहेत , त्या १०० टक्के विद्यार्थ्यांना एसटीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे . तसेच प्रवासी उपलब्धतेनुसार इतर बसफेऱ्याही सोडण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे यावेळी रसाळ यांनी सांगितले.कोणीही राजकारण करू नये !मुंबई , ठाणेहून आलेल्या चालक , वाहकांची कोरोना टेस्ट करण्यास विलंब होऊ नये , तसेच त्यांचे अहवालही तातडीने मिळण्याच्यादृष्टीने ओरोस येथे चर्चा करुन नियोजन करण्यात आले आहे . त्यामुळे यात राजकारण करण्याचा कुणी प्रयत्न करु नये . एसटीचे उत्पन्न वाढीसाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे वैभव नाईक यावेळी म्हणाले . 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याstate transportएसटीVaibhav Naikवैभव नाईक Kankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग