शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
5
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
6
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
7
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
8
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
9
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
10
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
11
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
12
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
13
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
14
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
15
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
16
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
17
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
18
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
19
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
20
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

दाभिल धरणाच्या कामाला स्थगिती

By admin | Updated: September 17, 2014 22:23 IST

हाय कोर्टाचा निर्णय : पर्यावरण मंत्रालय, वनविभागावर ओढले ताशेरे

सावंतवाडी : पर्यावरणाला धोका पोहोचेल तसेच वन्यजीवन धोक्यात येतील, अशारीतीने सुरूअसणाऱ्या सरमळे येथील दाभिल धरणाच्या कामाला आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. धरणाच्या कामाला परवानगी देणाऱ्या पर्यावरण मंत्रालय व वनविभागाच्या कारभारावरही न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. याबाबत वर्षभरापूर्वी स्टॅलिन दयानंद, वनशक्ती मुंबई यांच्यासह दाभिल ग्रामस्थ आबा गवस यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेकरिता तांत्रिक माहिती तसेच कागदोपत्री पुरावे जमा करण्याचे काम असनिये येथील संदीप सावंत यांनी केले. धरणासाठी कोनशी, दाभिल व सरमळे गावांतील ३८० हेक्टर जमिनीचा समावेश आहे; मात्र, केवळ सरमळे येथील १७० हेक्टर क्षेत्रासह कोनशी येथील काही जमीन संपादित केल्यानंतर धरणाच्या कामाला २००६ मध्ये प्रारंभ झाला. या धरणामुळे दाभिल गाव बुडीत क्षेत्रात जाणार असल्याने गावकऱ्यांचा त्यास विरोध होता. तरीही धरणाचे काम सुरू होते. ग्रामस्थांचा विरोध, निधीची कमतरता यामुळे २००७ मध्ये धरणाचे काम बंद पडले आहे.दरम्यान, वर्षभरापूर्वी दाखल करण्यात आलेल्या याचिकेत दाभिलच्या या धरणामुळे जंगल परिसर धोक्यात येणार असल्याने पर्यावरणाची हानी होणार आहे. तसेच या परिसरातील वन्यजिवांचे जीवनही धोक्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. यावर पर्यावरण मंत्रालय व वनविभागाला न्यायालयाने प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते; (पान ८ वर)आतापर्यंत १८५ कोटी रुपये खर्च धरणासाठी आतापर्यंत १८५ कोटी रुपये खर्च केला असून, त्याचा लाभ सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्यांतील तेरा गावांना होणार आहे. ६१९० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली तर २.५ मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे.धरणाची क्षमता २.०४५ टीएमसी असणार आहे. या प्रकल्पात ४० टक्के क्षेत्र हे वनखात्याच्या मालकीचे तसेच या धरणाचे आतापर्यंत केवळ वीस टक्केच काम पूर्णत्वास गेले आहे.