शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
2
Pune Crime: संतापजनक!१९ वर्षीय तरुणीवर वारकरी संस्थेत आणून अत्याचार; कीर्तनकार महिलेचाही कटात सहभाग
3
Vishwas Kumar : बोलणं बंद, झोप उडाली, मेंटली डिस्टर्ब... प्लेन क्रॅशमधून वाचलेल्या विश्वासची 'अशी' झालीय अवस्था
4
रीलपायी जीव गमावला! १६ वर्षांचा मुलगा ट्रेनवर चढला, हाय पॉवर केबलला स्पर्श झाला अन्...
5
'पायलटच्या आत्महत्येचा आरोप निराधार...' विमान अपघाताच्या चौकशी पथकात समावेश करण्याची पायलट युनियनची मागणी
6
तुमच्या कुंडलीत आहे पंचमहापुरुष योग? धन-धान्य-वैभव, पैसा कमी पडत नाही; भरघोस भरभराट, शुभ-लाभ!
7
'विराटला १८ वर्षांनंतर जिंकताना पाहून...", आरसीबीच्या विजयावर जिनिलियाची प्रतिक्रिया
8
फक्त निमिषाच नाही, तर जगभरातील तुरुंगात 'इतक्या' भारतीयांना झाली मृत्युदंडाची शिक्षा
9
चीननं केला विश्वासघात, भारताला दिली 'या' देशाने साथ; ५ वर्षाचं टेन्शन मिटलं, शेतकऱ्यांना मोठा फायदा
10
Sneha Debnath : ६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
11
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
12
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
13
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
14
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
15
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
16
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली
17
Anthem Biosciences IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; कधीपर्यंत आणि किती करावी लागेल गुंतवणूक, GMP किती?
18
मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?
19
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
20
अरे देवा! आई वारंवार भेंडीची भाजी बनवायची म्हणून लेक चिडला, १२०० किमी दूर पळून गेला अन्...

दाभिल धरणाच्या कामाला स्थगिती

By admin | Updated: September 17, 2014 22:23 IST

हाय कोर्टाचा निर्णय : पर्यावरण मंत्रालय, वनविभागावर ओढले ताशेरे

सावंतवाडी : पर्यावरणाला धोका पोहोचेल तसेच वन्यजीवन धोक्यात येतील, अशारीतीने सुरूअसणाऱ्या सरमळे येथील दाभिल धरणाच्या कामाला आज, बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. धरणाच्या कामाला परवानगी देणाऱ्या पर्यावरण मंत्रालय व वनविभागाच्या कारभारावरही न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत. याबाबत वर्षभरापूर्वी स्टॅलिन दयानंद, वनशक्ती मुंबई यांच्यासह दाभिल ग्रामस्थ आबा गवस यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेकरिता तांत्रिक माहिती तसेच कागदोपत्री पुरावे जमा करण्याचे काम असनिये येथील संदीप सावंत यांनी केले. धरणासाठी कोनशी, दाभिल व सरमळे गावांतील ३८० हेक्टर जमिनीचा समावेश आहे; मात्र, केवळ सरमळे येथील १७० हेक्टर क्षेत्रासह कोनशी येथील काही जमीन संपादित केल्यानंतर धरणाच्या कामाला २००६ मध्ये प्रारंभ झाला. या धरणामुळे दाभिल गाव बुडीत क्षेत्रात जाणार असल्याने गावकऱ्यांचा त्यास विरोध होता. तरीही धरणाचे काम सुरू होते. ग्रामस्थांचा विरोध, निधीची कमतरता यामुळे २००७ मध्ये धरणाचे काम बंद पडले आहे.दरम्यान, वर्षभरापूर्वी दाखल करण्यात आलेल्या याचिकेत दाभिलच्या या धरणामुळे जंगल परिसर धोक्यात येणार असल्याने पर्यावरणाची हानी होणार आहे. तसेच या परिसरातील वन्यजिवांचे जीवनही धोक्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. यावर पर्यावरण मंत्रालय व वनविभागाला न्यायालयाने प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले होते; (पान ८ वर)आतापर्यंत १८५ कोटी रुपये खर्च धरणासाठी आतापर्यंत १८५ कोटी रुपये खर्च केला असून, त्याचा लाभ सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्यांतील तेरा गावांना होणार आहे. ६१९० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली तर २.५ मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे.धरणाची क्षमता २.०४५ टीएमसी असणार आहे. या प्रकल्पात ४० टक्के क्षेत्र हे वनखात्याच्या मालकीचे तसेच या धरणाचे आतापर्यंत केवळ वीस टक्केच काम पूर्णत्वास गेले आहे.