शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

आचरा-चिंदर गावचा सुपुत्र सुब्रमण्यमची भारतीय पोलीस सेवा दलात निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 14:18 IST

sindhudurg, upscexam, educationsector यूपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणारा आचरा-चिंदर गावचा सुपुत्र सुब्रमण्यम केळकर याची भारतीय पोलीस सेवा (आयपीएस)साठी निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

ठळक मुद्देआचरा-चिंदर गावचा सुपुत्र सुब्रमण्यमची भारतीय पोलीस सेवा दलात निवड हैदराबाद येथे जाणार प्रशिक्षणासाठी, सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

आचरा : यूपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणारा आचरा-चिंदर गावचा सुपुत्र सुब्रमण्यम केळकर याची भारतीय पोलीस सेवा (आयपीएस)साठी निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.आचरा-चिंदर गावचा सुपुत्र असलेल्या सुब्रमण्यम केळकर याने यूपीएससी परीक्षेत देशस्तरावर ४९७वा क्रमांक मिळवित उज्ज्वल यश संपादन केले होते. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत होते. दरम्यान, सुब्रमण्यम केळकर याची भारतीय पोलीस सेवेसाठी निवड झाली असल्याबाबतचा आदेश प्राप्त झाला आहे. तो लवकरच सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद येथे प्रशिक्षणासाठी जाणार आहे.मालवण तालुक्यातील एका छोट्या गावात राहणारा, लोकमान्य टिळकांचा आदर्श डोळ््यासमोर ठेवून ध्येय निश्चित करून आपली वाटचाल करणारा आणि घराला आपल्याकडूनही थोडासा आर्थिक हातभार लागावा म्हणून वडिलांसोबत पौरोहित्य करून आर्थिक अडचणींवर मात करीत आपले शिक्षण पूर्ण करणारा सुब्रमण्यम केळकर हा आयपीएस झाला आहे.

आई वडिलांचे आशीर्वाद, अपार मेहनत, प्रचंड कष्ट, राष्ट्रसेवा करण्याचे ध्येय आणि महापुरूषांचा आदर्श या सगळ््याच्या जोरावर सुब्रमण्यम आज इथपर्यंत पोहोचला आहे. पोलीस दलात सुब्रमण्यमसारखे राष्ट्रभक्त युवक जात आहेत. ही सर्व सिंधुदुर्गवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे.सुब्रमण्यम आयपीएस झाल्याची बातमी झळकताच सोशल मीडियावरून त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. सुब्रमण्यम याने मालवण तालुक्यातील चिंदरसारख्या ग्रामीण भागात राहून अडचणींना सामोरे जात रात्रीचा दिवस करून हे यश मिळविल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ते मोलाचे ठरले आहे. चिंदरसारख्या ग्रामीण भागात अजूनही धड मोबाईलचे नेटवर्कही व्यवस्थित मिळत नाही. मात्र या सर्वावर सुब्रमण्यमने मात केली आहे.१० ते १२ तास अभ्यास करीत त्याने मिळविले यशसुब्रमण्यम केळकर हा यूपीएससी परीक्षेत भारत देशातून ४९७ वा आला. ही परीक्षा त्याने मराठी माध्यमातून दिली होती. त्याने यूपीएससीसाठी वैकल्पिक विषय हा राजकीय विज्ञान निवडला होता. एका वसतिगृहात राहून त्याने परीक्षेची तयारी केली होती. यासाठी तो पुण्यातील चाणक्य मंडल परिवारमध्ये शिक्षण घेत होता. अविनाश धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेचा अभ्यास त्याने केला होता. १० ते १२ तास अभ्यास करीत त्याने यश संपादन केले होते. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगsindhudurgसिंधुदुर्गEducationशिक्षण