शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

आचरा-चिंदर गावचा सुपुत्र सुब्रमण्यमची भारतीय पोलीस सेवा दलात निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 14:18 IST

sindhudurg, upscexam, educationsector यूपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणारा आचरा-चिंदर गावचा सुपुत्र सुब्रमण्यम केळकर याची भारतीय पोलीस सेवा (आयपीएस)साठी निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

ठळक मुद्देआचरा-चिंदर गावचा सुपुत्र सुब्रमण्यमची भारतीय पोलीस सेवा दलात निवड हैदराबाद येथे जाणार प्रशिक्षणासाठी, सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

आचरा : यूपीएससी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणारा आचरा-चिंदर गावचा सुपुत्र सुब्रमण्यम केळकर याची भारतीय पोलीस सेवा (आयपीएस)साठी निवड झाली आहे. त्याच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.आचरा-चिंदर गावचा सुपुत्र असलेल्या सुब्रमण्यम केळकर याने यूपीएससी परीक्षेत देशस्तरावर ४९७वा क्रमांक मिळवित उज्ज्वल यश संपादन केले होते. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत होते. दरम्यान, सुब्रमण्यम केळकर याची भारतीय पोलीस सेवेसाठी निवड झाली असल्याबाबतचा आदेश प्राप्त झाला आहे. तो लवकरच सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी हैदराबाद येथे प्रशिक्षणासाठी जाणार आहे.मालवण तालुक्यातील एका छोट्या गावात राहणारा, लोकमान्य टिळकांचा आदर्श डोळ््यासमोर ठेवून ध्येय निश्चित करून आपली वाटचाल करणारा आणि घराला आपल्याकडूनही थोडासा आर्थिक हातभार लागावा म्हणून वडिलांसोबत पौरोहित्य करून आर्थिक अडचणींवर मात करीत आपले शिक्षण पूर्ण करणारा सुब्रमण्यम केळकर हा आयपीएस झाला आहे.

आई वडिलांचे आशीर्वाद, अपार मेहनत, प्रचंड कष्ट, राष्ट्रसेवा करण्याचे ध्येय आणि महापुरूषांचा आदर्श या सगळ््याच्या जोरावर सुब्रमण्यम आज इथपर्यंत पोहोचला आहे. पोलीस दलात सुब्रमण्यमसारखे राष्ट्रभक्त युवक जात आहेत. ही सर्व सिंधुदुर्गवासीयांसाठी अभिमानाची बाब आहे.सुब्रमण्यम आयपीएस झाल्याची बातमी झळकताच सोशल मीडियावरून त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. सुब्रमण्यम याने मालवण तालुक्यातील चिंदरसारख्या ग्रामीण भागात राहून अडचणींना सामोरे जात रात्रीचा दिवस करून हे यश मिळविल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी ते मोलाचे ठरले आहे. चिंदरसारख्या ग्रामीण भागात अजूनही धड मोबाईलचे नेटवर्कही व्यवस्थित मिळत नाही. मात्र या सर्वावर सुब्रमण्यमने मात केली आहे.१० ते १२ तास अभ्यास करीत त्याने मिळविले यशसुब्रमण्यम केळकर हा यूपीएससी परीक्षेत भारत देशातून ४९७ वा आला. ही परीक्षा त्याने मराठी माध्यमातून दिली होती. त्याने यूपीएससीसाठी वैकल्पिक विषय हा राजकीय विज्ञान निवडला होता. एका वसतिगृहात राहून त्याने परीक्षेची तयारी केली होती. यासाठी तो पुण्यातील चाणक्य मंडल परिवारमध्ये शिक्षण घेत होता. अविनाश धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षेचा अभ्यास त्याने केला होता. १० ते १२ तास अभ्यास करीत त्याने यश संपादन केले होते. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगsindhudurgसिंधुदुर्गEducationशिक्षण