शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सिंधुदुर्ग : पाण्यासाठी विद्यार्थ्यांनी चुकविली तासिका, मालवण शासकीय तंत्रनिकेतनमधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 17:16 IST

शिक्षण घेत असताना मुलभूत गरजा वेळच्या वेळी मिळाल्यास विद्यार्थ्यांना अभ्यास किंवा अध्ययन करणे सोपे जाते. मात्र, मालवण शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांवर तासिका चुकवून दुसऱ्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी रांगेत उभे राहण्याची नामुष्की ओढवली आहे.

ठळक मुद्दे समस्येवर कार्यवाही न झाल्यास आंदोलन करणारतासिका चुकवून दुसऱ्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी रांगेत उभे राहण्याची नामुष्की पाईपलाईनवर खासगी नळजोडणी देण्यात आल्याने अपुरा पाणीपुरवठा

मालवण : शिक्षण घेत असताना मुलभूत गरजा वेळच्या वेळी मिळाल्यास विद्यार्थ्यांना अभ्यास किंवा अध्ययन करणे सोपे जाते. मात्र, शासकीय तंत्रनिकेतनमधील विद्यार्थ्यांवर तासिका चुकवून दुसऱ्या ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी रांगेत उभे राहण्याची नामुष्की ओढवली आहे.

गेले काही महिने अपुऱ्या पाण्याची समस्या असतानाच आता आठ दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होतो. त्यामुळे मालवण पालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या पाणी प्रश्नावर दोन दिवसांत कार्यवाही न झाल्यास विद्यार्थ्यांनी २ जानेवारी रोजी पाण्यासाठी पालिकेवर धडक देऊन आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.मालवण कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे अकराशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. तर येथील वसतिगृहात १५० विद्यार्थी व १०० विद्यार्थिनी राहतात.

शिक्षक व कर्मचारी दीडशेच्या आसपास आहेत. तंत्रनिकेतनला पालिकेच्या धामापूर नळपाणी योजनेवरून पाणीपुरवठा केला जातो. तंत्रनिकेतनच्या मुख्य पाईपलाईनवर खासगी नळजोडणी देण्यात आल्याने अपुरा पाणीपुरवठा गेल्या अनेक माहिन्यांपासून सुरु आहे.गेले काही दिवस आठवड्यातून एकदाच पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी व शिक्षकांना पुरेसे पाणी मिळत नाही. तंत्रनिकेतन येथे असलेल्या पाच बोअरवेल पैकी तीन बोअरवेल बंद असून दोन बोअरवेलमधून अवघ्या एक ते दोन तासासाठीच पाणीपुरवठा होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत.शासकीय तंत्रनिकेतन येथे ४ ते ६ जानेवारी या कालावधीत विभागस्तरीय क्रीडा स्पर्धा होणार असून स्पर्धेसाठी हजारो विद्यार्थी सहभागी होणार आहेत. त्यामुळे पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर स्पर्धेतील खेळाडू तसेच विद्यार्थ्यांचे पाण्याअभावी मोठ्या प्रमाणावर हाल होणार आहेत. क्रीडा महोत्सवापूर्वी पाण्याचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा २ जानेवारी रोजी मालवण पालिकेवर धडक आंदोलनाचा इशारा संतप्त विद्यार्थ्यांनी दिला आहे.पाण्यासाठी भटकंतीदिवसाला ८० हजार लिटर पाण्याची आवश्यकता असताना आठवड्यातून केवळ एकदाच ५० ते ६० हजार लिटर पाणी उपलब्ध होते. मात्र, तेही अशुद्ध असल्याने मालवण शासकीय तंत्रनिकेतन वसतिगृहातील विद्यार्थ्यांसह शिक्षक व कर्मचाऱ्यांनाही पाण्यासाठी भटकावे लागत आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcollegeमहाविद्यालयWaterपाणी