शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई : उदय सामंत यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 12:07 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर सुरू केलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या नावीन्यपूर्ण मोहिमेत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांनी महाराष्ट्रात आघाडी घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३४ टक्के तर रत्नागिरी जिल्ह्यात ३८ टक्के एवढे प्रभावी काम प्रशासनाने केले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मास्क हे एकमेव साधन आहे. त्यामुळे मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर सोमवारपासून पोलिसांमार्फत कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.

ठळक मुद्दे मास्क न वापरणाऱ्यांवर कडक कारवाई : उदय सामंत यांचा इशारा लॉकडाऊनचा विचार नाही, जनता कर्फ्यू लावल्यास माझा विरोधही नसेल

सिंधुदुर्गनगरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर सुरू केलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या नावीन्यपूर्ण मोहिमेत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांनी महाराष्ट्रात आघाडी घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३४ टक्के तर रत्नागिरी जिल्ह्यात ३८ टक्के एवढे प्रभावी काम प्रशासनाने केले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मास्क हे एकमेव साधन आहे. त्यामुळे मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर सोमवारपासून पोलिसांमार्फत कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिला.पालकमंत्री उदय सामंत यांनी आॅनलाईन पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्याचा शासनाचा कोणताही विचार नाही. परंतु जनतेने पुढाकार घेतला तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनता कर्फ्यू लावल्यास माझा विरोधही नसेल.पालकमंत्री सामंत म्हणाले, सकाळच्या सत्रात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, प्रभारी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांच्याशी कोविड-१९ संदर्भात आढावा बैठक झाली.मी जनतेला दिलेल्या आश्वासनासंदर्भात कोणती कार्यवाही झाली या संदर्भातही चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात आॅक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी ७२ लाख रुपये खर्च करून आॅक्सिजन प्लांट तयार करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे. ५८ मोठ्या बॉटल्स तयार होतील एवढी या प्लांटची क्षमता आहे. त्यामुळे कोविड रुग्णांना भविष्यात लस येईपर्यंत आॅक्सिजनची कमतरता भासणार नाही, असे ते म्हणाले.जिल्ह्यात अद्यापपर्यंत ३ हजार ५५० कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर सत्त्यात्तर जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८ ते ७० टक्क्यांपर्यंत आहे. तर मृत्यूचे प्रमाण दोन टक्के एवढे आहे. टेस्टिंग क्षमता वाढविल्यास रिकव्हरी रेट ८० टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो व मृत्यूचे प्रमाण एक टक्क्यापर्यंत खाली येऊ शकते असा विश्वासही पालकमंत्री सामंत यांनी व्यक्त केला.कोरोना साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात लॉकडाऊन होणार का? या प्रश्नावर उत्तर देताना पालकमंत्री म्हणाले, व्यापाऱ्यांचा विचार करता सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॉकडाऊन होणार नाही. मात्र, जिल्ह्यातील जनता एकत्र येऊन जनता कर्फ्यू लागू करू शकते. जनतेच्या निर्णयाला माझा पूर्ण पाठिंबा असेल असे ते म्हणाले.टीकेला उत्तर द्यावे असे वाटत नाहीआमदार नीतेश राणे यांनी आपल्यावर सडकून टीका केली आहे याबाबत पत्रकारांनी छेडले असता पालकमंत्री सामंत म्हणाले, त्यांच्या टीकेला उत्तर द्यावे असे वाटत नाही. आमदार राणे यांना माझी भरपूर काळजी असल्याने ते माझी चौकशी करीत असतात. कोरोनाला हरविण्यासाठी एकत्र येऊन काम करूया, असे नीतेश राणे यांनाउदय सांमत यांनी यावेळी आवाहन केले.मास्कबाबत पोलिसांना आदेश दिलेसध्या कोरोनावर कोणत्याही प्रकारचे ठोस औषध सापडलेले नाही. इतर औषधोपचारांवर व रोगप्रतिकार शक्तीच्या जोरावर रुग्ण बरे होत आहेत. कोरोनाची साखळी पूर्णपणे तोडायची असेल तर सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझर या गोष्टींचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी माक्स लावूनच बाहेर कामानिमित्त फिरावे. मास्क न वापरणाºया नागरिकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश आपण पोलीस प्रशासनाला दिले आहेत, अशी माहिती पालकमंत्री सामंत यांनी दिली.पुढच्या वर्षी सिंधुदुर्गात अ‍ॅडमिशन होतीलसिंधुदुर्गात शासकीय मेडिकल कॉलेज व्हावे यासाठी जिल्ह्यातील काही तरुण रक्तदान करून आगळेवेगळे आंदोलन छेडणार आहेत. त्यासाठी आपली भूमिका काय राहील? असा प्रश्न केला असता सामंत म्हणाले, तरुणांनी रक्तदान करावे. परंतु आंदोलन करू नये. कारण पुढच्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेडिकल कॉलेज करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतलेला आहे आणि तो पूर्णत्वास जाईल. पुढील वर्षी या कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन सुरू होतील, असा दावा पालकमंत्री सामंत यांनी केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUday Samantउदय सामंतsindhudurgसिंधुदुर्ग