शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दुरूस्तीच्या नावावर निकृष्ट काम, झाराप पत्रादेवी मार्गाचे काम बंद पाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 18:24 IST

झाराप-पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्तीच्या नावावर निकृष्ट दर्जाचे सुरू असलेले डांबरीकरणाचे काम तेथील जागृत ग्रामस्थांनी बंद पाडले. जोपर्यंत कामाच्या दर्जा बाबत आम्हाला माहिती देत नाहीत तोपर्यंत काम सुरु करु देणार नाही, अशी भुमिका वेत्ये ग्रामपंचायत उपसरपंच गुणाची गावडे यांनी घेतली.

ठळक मुद्देदुरूस्तीच्या नावावर निकृष्ट काम झाराप पत्रादेवी मार्गाचे काम बंद पाडले

सावंतवाडी : झाराप-पत्रादेवी राष्ट्रीय महामार्गावर दुरुस्तीच्या नावावर निकृष्ट दर्जाचे सुरू असलेले डांबरीकरणाचे काम तेथील जागृत ग्रामस्थांनी बंद पाडले. जोपर्यंत कामाच्या दर्जा बाबत आम्हाला माहिती देत नाहीत तोपर्यंत काम सुरु करु देणार नाही, अशी भुमिका वेत्ये ग्रामपंचायत उपसरपंच गुणाची गावडे यांनी घेतली.झाराप-पत्रादेवी या चौपदरीकरण महामार्गावर डीआर कंपनीकडून डांबरीकरणाचे काम सुरू होते. ज्या ठिकाणी रस्ता खराब झाला अशाच ठिकाणी हे काम करण्यात येत होते. वेत्ये सर्कल येते गुरूवारी सकाळी डांबरीकरण सुरू असताना हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे ग्रामस्थांच्या उघडकीस आले.

डांबरीकरण झालेल्या रस्त्यावरून वाहने गेल्यावर हे डांबर उखडू लागले. त्यामुळे वेत्ये उपसरपंच गुणाजी गावडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र गावकर, गुरुदास गावकर, विजय गावकर, राजन आंबेकर, हरिश्चंद्र गावकर, मनोज पाटकर, अजय पाटकर, राजेश भैरे आदी ग्रामस्थांनी दुरुस्तीचे काम रोखले.दरम्यान, याबाबतची माहिती राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी साई मेठकरी, राजेभाऊ कोळी यांना देत घटनास्थळी पाचारण केले. घटनास्थळी आलेल्या या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी धारेवर धरत रस्त्याच्या निकृष्ट कामास डी. आर कंपनी जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. जोपर्यंत या कामाचा दर्जा काय आहे याबाबतची माहिती मिळत नाही तोपर्यंत काम सुरु करु देणार नाही, असे उपसरपंच गुणाजी गावडे यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग