शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

कणकवलीतील स्टॉल हटाव मोहीम तूर्तास स्थगित, विक्रेत्यांना दिली एक महिन्याची मुदत

By सुधीर राणे | Updated: April 29, 2023 17:18 IST

महामार्ग प्राधिकरणची कारवाई थांबल्यानंतर उड्डाणपूलाखाली पुन्हा एकदा स्टॉल धारकांनी बस्तान मांडले होते

कणकवली : मुंबई -गोवा महामार्गावरील कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकातील उड्डाणपुलाखाली अनधिकृत बसलेल्या स्टॉल धारकांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पोलीस बंदोबस्तात मार्च महिन्यात हटविले होते. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणची कारवाई थांबल्यानंतर उड्डाणपूलाखाली पुन्हा एकदा स्टॉल धारकांनी बस्तान मांडले होते. याच पार्श्वभूमीवर महामार्ग प्राधिकरणने शनिवारी दुपारच्या सुमारास पुन्हा  स्टॉल हटाव मोहिमेला सुरुवात केली. मात्र, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्यामध्यस्थीने आणि स्टॉल धारकांच्या सलोख्याने स्टॉल हटाव मोहीम तूर्तास थांबवण्यात आली आहे.शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कणकवली येथे उड्डाणपुलाखाली अनधिकृत रित्या बसलेल्या स्टॉल धारकांना हटविण्यासाठी महामार्ग प्राधिकरणने पोलिसांच्या बंदोबस्तात मोहीम  सुरु केली होती. त्यामुळे काही वेळ शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी सहकाऱ्यांसह या मोहिमेला अटकाव केला. गोरगरीब जनता या ठिकाणी स्वतःचे पोट भरत असल्याचे सांगत ही स्टॉल हटाव मोहीम थांबविण्याची मागणी केली. तसेच उड्डाणपुलाखाली उद्यान अथवा इतर कोणत्या गोष्टी तुम्ही करणार आहात ते सांगा असे अधिकाऱ्यांना सांगितले.  त्यानंतर महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी स्टॉल धारकांशी चर्चा केली. यात स्टॉल धारकांनी सध्या हंगामाचा कालावधी असल्यामुळे आम्हाला या ठिकाणी स्टॉल लावू द्या असे सांगितले असता, महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना एक महिन्याचा कालावधी दिला आहे. परंतु एक महिन्यानंतर जर स्टॉल धारकांनी स्वतःहून स्टॉल न हटवल्यास महामार्ग प्राधिकरण पुन्हा एकदा स्टॉल हटाव मोहीम राबवणार असल्याचे सांगितले.

तसेच स्टॉल धारकांनी एक महिन्यानंतर स्वतःहून स्टॉल हटवणार असे लेखी पत्र महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले. त्यामुळे स्टॉल हटाव मोहीम तूर्तास थांबविण्यात आली आहे. यावेळी  महामार्ग प्राधिकरणचे कनिष्ठ अभियंता रुपेश कांबळे, पोलिस उपनिरीक्षक बापू खरात,अनिल हाडळ यांच्यासह दंगल नियंत्रण पथक तसेच पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली