शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

कणकवलीतील स्टॉल हटाव मोहीम तूर्तास स्थगित, विक्रेत्यांना दिली एक महिन्याची मुदत

By सुधीर राणे | Updated: April 29, 2023 17:18 IST

महामार्ग प्राधिकरणची कारवाई थांबल्यानंतर उड्डाणपूलाखाली पुन्हा एकदा स्टॉल धारकांनी बस्तान मांडले होते

कणकवली : मुंबई -गोवा महामार्गावरील कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकातील उड्डाणपुलाखाली अनधिकृत बसलेल्या स्टॉल धारकांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने पोलीस बंदोबस्तात मार्च महिन्यात हटविले होते. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणची कारवाई थांबल्यानंतर उड्डाणपूलाखाली पुन्हा एकदा स्टॉल धारकांनी बस्तान मांडले होते. याच पार्श्वभूमीवर महामार्ग प्राधिकरणने शनिवारी दुपारच्या सुमारास पुन्हा  स्टॉल हटाव मोहिमेला सुरुवात केली. मात्र, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांच्यामध्यस्थीने आणि स्टॉल धारकांच्या सलोख्याने स्टॉल हटाव मोहीम तूर्तास थांबवण्यात आली आहे.शनिवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कणकवली येथे उड्डाणपुलाखाली अनधिकृत रित्या बसलेल्या स्टॉल धारकांना हटविण्यासाठी महामार्ग प्राधिकरणने पोलिसांच्या बंदोबस्तात मोहीम  सुरु केली होती. त्यामुळे काही वेळ शहरातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. मात्र, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी सहकाऱ्यांसह या मोहिमेला अटकाव केला. गोरगरीब जनता या ठिकाणी स्वतःचे पोट भरत असल्याचे सांगत ही स्टॉल हटाव मोहीम थांबविण्याची मागणी केली. तसेच उड्डाणपुलाखाली उद्यान अथवा इतर कोणत्या गोष्टी तुम्ही करणार आहात ते सांगा असे अधिकाऱ्यांना सांगितले.  त्यानंतर महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी स्टॉल धारकांशी चर्चा केली. यात स्टॉल धारकांनी सध्या हंगामाचा कालावधी असल्यामुळे आम्हाला या ठिकाणी स्टॉल लावू द्या असे सांगितले असता, महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना एक महिन्याचा कालावधी दिला आहे. परंतु एक महिन्यानंतर जर स्टॉल धारकांनी स्वतःहून स्टॉल न हटवल्यास महामार्ग प्राधिकरण पुन्हा एकदा स्टॉल हटाव मोहीम राबवणार असल्याचे सांगितले.

तसेच स्टॉल धारकांनी एक महिन्यानंतर स्वतःहून स्टॉल हटवणार असे लेखी पत्र महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले. त्यामुळे स्टॉल हटाव मोहीम तूर्तास थांबविण्यात आली आहे. यावेळी  महामार्ग प्राधिकरणचे कनिष्ठ अभियंता रुपेश कांबळे, पोलिस उपनिरीक्षक बापू खरात,अनिल हाडळ यांच्यासह दंगल नियंत्रण पथक तसेच पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली