शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

खरीप हंगामात आतापर्यंत ८२ हजार क्विंटल भात खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 16:17 IST

Kudal Sindhdurg : खरीप पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८२ हजार २५९ क्विंटल भात खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये कुडाळ तालुक्यात सर्वाधिक भात खरेदी झाली आहे. कुडाळमध्ये ११ भात खरेदी केंद्रांमधून एकूण २६ हजार ६३२ क्विंटल भात खरेदी झाली आहे.

ठळक मुद्देखरीप हंगामात आतापर्यंत ८२ हजार क्विंटल भात खरेदीसिंधुदुर्गबरोबरच कुडाळ तालुक्यात उच्चांकी भात खरेदी

कुडाळ : खरीप पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८२ हजार २५९ क्विंटल भात खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये कुडाळ तालुक्यात सर्वाधिक भात खरेदी झाली आहे. कुडाळमध्ये ११ भात खरेदी केंद्रांमधून एकूण २६ हजार ६३२ क्विंटल भात खरेदी झाली आहे.जिल्ह्यात गतवर्षी ३६ हजार ८८२ क्विंटल भात खरेदी करण्यात आली होती. मात्र, यावर्षी भात पिकाचे उत्पन्न वाढवून जास्तीत जास्त भात खरेदी होऊन शेतकऱ्यांना याचा लाभ होण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून सिंधुदुर्गबरोबरच कुडाळ तालुक्यात उच्चांकी भात खरेदी झाली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात पीक हे प्रमुख पीक असून यांत्रिकीकरणाद्वारे भात लावणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. शेतकऱ्यांना भात पिकातून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी आणलेल्या चांदा ते बांदा योजनेतून कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत शेतकऱ्यांना शेती अवजारे सबसिडीतून मिळवून देण्यासाठी वैभव नाईक यांनी प्रयत्न केले होते.शेती अवजारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भात लागवड करून उत्पादन घेतले. या भात उत्पादनासाठी खरेदी केंद्रे निश्चित करून लवकरात लवकर भात खरेदी केंद्रे सुरू करणे तसेच शासनाकडून भात पिकाला जास्तीत जास्त हमीभाव व बोनस मिळवून देणे यासाठी वैभव नाईक यांनी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व शासनस्तरावर पाठपुरावा केला.त्यामुळे २०२०-२१ मध्ये ऑक्टोबर महिन्यापासून भात खरेदीला सुरुवात करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात खरेदीसाठी प्रत्येक तालुक्यात शेतकरी संघ आणि सोसायटीच्या ठिकाणी एकूण ३५ भात खरेदी केंद्रे निश्चित केली होती. शासनाने हमीभावात ५३ रुपयांची वाढ केली असून १८६८ रु हमीभाव देण्यात येत आहे. तसेच बोनस स्वरूपात ७०० रुपये देण्यात येणार असून एकूण २५६८ रुपये दर शेतकऱ्यांना दिला जात आहे. जिल्ह्यात एकूण १५ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांच्या भात खरेदीची नोंद झाली आहे. त्यातील ११ कोटी रुपये शासनाकडून जमा झाले आहेत. याव्यतिरिक्त बोनसची रक्कम मिळणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ हजार ८९० तर कुडाळ तालुक्यातील १ हजार ८८९ शेतकऱ्यांनी भात विक्री केली आहे. कुडाळ शहरातील भात खरेदी केंद्रावर ९ हजार ६३ क्विंटल भात खरेदी झाली तर निवजेसारख्या ग्रामीण भागातील भात खरेदी केंद्रावर ३ हजार ९०५ क्विंटल भात खरेदी झाली. आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांमुळे कुडाळ येथे साकारलेल्या राईस मिल मार्फतही भाताची खरेदी करण्यात आली.

बजाज राईस मिलने थेट शेतकऱ्यांमार्फत भात खरेदी करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी प्रयत्न केले होते. त्याला देखील पालकमंत्र्यांकडून मान्यता देण्यात आल्याने राईस मिलमार्फत खरेदी केंद्रे निश्चित करून थेट शेतकऱ्यांकडून भाताची उचल करण्यात आली. अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी एन. जी. गवळी यांनी दिली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्गkudal-acकुडाळ