शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

खरीप हंगामात आतापर्यंत ८२ हजार क्विंटल भात खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 16:17 IST

Kudal Sindhdurg : खरीप पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८२ हजार २५९ क्विंटल भात खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये कुडाळ तालुक्यात सर्वाधिक भात खरेदी झाली आहे. कुडाळमध्ये ११ भात खरेदी केंद्रांमधून एकूण २६ हजार ६३२ क्विंटल भात खरेदी झाली आहे.

ठळक मुद्देखरीप हंगामात आतापर्यंत ८२ हजार क्विंटल भात खरेदीसिंधुदुर्गबरोबरच कुडाळ तालुक्यात उच्चांकी भात खरेदी

कुडाळ : खरीप पणन हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८२ हजार २५९ क्विंटल भात खरेदी करण्यात आली आहे. यामध्ये कुडाळ तालुक्यात सर्वाधिक भात खरेदी झाली आहे. कुडाळमध्ये ११ भात खरेदी केंद्रांमधून एकूण २६ हजार ६३२ क्विंटल भात खरेदी झाली आहे.जिल्ह्यात गतवर्षी ३६ हजार ८८२ क्विंटल भात खरेदी करण्यात आली होती. मात्र, यावर्षी भात पिकाचे उत्पन्न वाढवून जास्तीत जास्त भात खरेदी होऊन शेतकऱ्यांना याचा लाभ होण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून सिंधुदुर्गबरोबरच कुडाळ तालुक्यात उच्चांकी भात खरेदी झाली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात पीक हे प्रमुख पीक असून यांत्रिकीकरणाद्वारे भात लावणी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले. शेतकऱ्यांना भात पिकातून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी आणलेल्या चांदा ते बांदा योजनेतून कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत शेतकऱ्यांना शेती अवजारे सबसिडीतून मिळवून देण्यासाठी वैभव नाईक यांनी प्रयत्न केले होते.शेती अवजारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भात लागवड करून उत्पादन घेतले. या भात उत्पादनासाठी खरेदी केंद्रे निश्चित करून लवकरात लवकर भात खरेदी केंद्रे सुरू करणे तसेच शासनाकडून भात पिकाला जास्तीत जास्त हमीभाव व बोनस मिळवून देणे यासाठी वैभव नाईक यांनी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी व शासनस्तरावर पाठपुरावा केला.त्यामुळे २०२०-२१ मध्ये ऑक्टोबर महिन्यापासून भात खरेदीला सुरुवात करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भात खरेदीसाठी प्रत्येक तालुक्यात शेतकरी संघ आणि सोसायटीच्या ठिकाणी एकूण ३५ भात खरेदी केंद्रे निश्चित केली होती. शासनाने हमीभावात ५३ रुपयांची वाढ केली असून १८६८ रु हमीभाव देण्यात येत आहे. तसेच बोनस स्वरूपात ७०० रुपये देण्यात येणार असून एकूण २५६८ रुपये दर शेतकऱ्यांना दिला जात आहे. जिल्ह्यात एकूण १५ कोटी ३६ लाख ६० हजार रुपयांच्या भात खरेदीची नोंद झाली आहे. त्यातील ११ कोटी रुपये शासनाकडून जमा झाले आहेत. याव्यतिरिक्त बोनसची रक्कम मिळणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ हजार ८९० तर कुडाळ तालुक्यातील १ हजार ८८९ शेतकऱ्यांनी भात विक्री केली आहे. कुडाळ शहरातील भात खरेदी केंद्रावर ९ हजार ६३ क्विंटल भात खरेदी झाली तर निवजेसारख्या ग्रामीण भागातील भात खरेदी केंद्रावर ३ हजार ९०५ क्विंटल भात खरेदी झाली. आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नांमुळे कुडाळ येथे साकारलेल्या राईस मिल मार्फतही भाताची खरेदी करण्यात आली.

बजाज राईस मिलने थेट शेतकऱ्यांमार्फत भात खरेदी करण्यासाठी आमदार वैभव नाईक यांनी प्रयत्न केले होते. त्याला देखील पालकमंत्र्यांकडून मान्यता देण्यात आल्याने राईस मिलमार्फत खरेदी केंद्रे निश्चित करून थेट शेतकऱ्यांकडून भाताची उचल करण्यात आली. अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी एन. जी. गवळी यांनी दिली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्गkudal-acकुडाळ