शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

..म्हणून काँग्रेसकडून लोकसभेसाठी स्वबळावर लढण्याचा सर्व्हे - नितेश राणे 

By सुधीर राणे | Updated: January 5, 2024 18:41 IST

..त्यासाठीच प्रंतप्रधान मोदींना टार्गेट 

कणकवली: ठाकरे सेना आपल्या पक्षामध्ये विलीन करावा असा प्रस्ताव काँग्रेसच्या वरिष्ठांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेसने  ठाकरे सेना संपविण्याचा घाट घातला आहे. असा खळबळजनक आरोप करतानाच, त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा काँग्रेस पक्ष स्वबळावर लढण्याचा सर्व्हे करत आहे. असे आमदार नितेश राणे यांनी येथे सांगितले.कणकवली येथे शुक्रवारी प्रसिद्धी माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, अदानी समूहाबाबत सर्वोच्च न्यायालयाने अतिशय महत्वाचा निकाल दिला आहे. त्यांच्या उद्योगामुळे आपला देश प्रगती पथावर आहे. असे असताना विरोधक हिंडनबर्ग रिपोर्टच्या नावाखाली देशाची बदनामी करत होते. तो प्रकार न्यायालयाने हाणून पाडला आहे. त्यामुळे मिर्ची झोंबल्याने  आणि १० जनपथची मर्जी सांभाळण्यासाठी संजय राऊत यांनी गरळ ओकली आहे. मात्र, त्यांचे महागुरू शरद पवार हे अदानींना का भेटतात? हे प्रथम संजय राऊत यांनी जाणून घ्यावे. अदानीवर बोलण्यापूर्वी सिल्वर ओकमध्ये अदानीबाबत काय मत आहे, हे विचारून नंतरच बोलावे, असा सल्ला आमदार नितेश राणे यांनी दिला.त्यासाठीच प्रंतप्रधान मोदींना टार्गेट काँग्रेस आणि त्यांच्या मित्र पक्षांना देशातील सनातन हिंदू धर्म संपवायचा आहे. त्यासाठीच प्रंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केले जात आहे. मात्र त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ते यात यशस्वी होणार नाहीत. सातत्याने संजय राऊत न्यायालयाचा अपमान करत आहेत. त्यामुळे राऊत यांच्यावर 'सुमोटो' कारवाई न्यायालयाने करून त्यांना अटक करावी. प्रभू श्री राम यांचा अपमान झाल्यानंतर तो कुठलाही हिंदू सहन करणार नाही. जितेंद्र आव्हाड हे पाकिस्तानमध्ये राहत नाहीत. भारतातच राहतात, त्यामुळे त्यांनी बोलताना दक्षता घ्यायला हवी असेही राणे म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcongressकाँग्रेसNitesh Raneनीतेश राणे