शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

सिंधुदुर्गनगरी : थेट सरपंच निवडीचा निर्णय यशस्वी, पंकजा मुंडे, ग्रामपंचायतींना निधी देण्यासाठी प्रयत्न करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 10:16 IST

थेट सरपंच निवड हा या सरकारने घेतलेला निर्णय यशस्वी ठरला आहे. या निर्णयामुळे सर्व ग्रामपंचायतींना शिक्षित सरपंच मिळाले आहेत. या सरपंचांवर गावांचा विकास करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात निधी देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देग्रामपंचायतींना निधी देण्यासाठी प्रयत्न करणारथेट सरपंच निवडीचा निर्णय यशस्वी, पंकजा मुंडे१00 टक्के शाळांमध्ये पोषण आहार सुरू

सिंधुदुर्गनगरी : थेट सरपंच निवड हा या सरकारने घेतलेला निर्णय यशस्वी ठरला आहे. या निर्णयामुळे सर्व ग्रामपंचायतींना शिक्षित सरपंच मिळाले आहेत. या सरपंचांवर गावांचा विकास करण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात निधी देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.प्राथमिक शिक्षक समितीचे त्रैवार्षिक अधिवेशन संपल्यानंतर मंत्री पंकजा मुंडे पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी पालकमंत्री दीपक केसरकर, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी उदय चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आदी उपस्थित होते.यावेळी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, ग्रामपंचायत सदस्यांमधून सरपंच न निवडता थेट जनतेतून सरपंच निवडीचा घेतलेला या युती सरकारचा निर्णय चांगला ठरला आहे. या निर्णयामुळे प्रत्येक ग्रामपंचायतीला सुशिक्षित सरपंच मिळाला आहे.या सुशिक्षित सरपंचांच्या माध्यमातून गावांचा विकास केला जाणार आहे. काही ठिकाणी पक्षाचे तर काही ठिकाणी गांवविकास पॅनेलचे सरपंच आहेत. या सरपंचांना गावचा विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता लागणार आहे आणि हा निधी ग्रामपंचायतींना देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.तसेच ग्रामीण भागातील अनधिकृत घरे नियमित करण्याचा एक धाडसी निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार ग्रामीण भागातील २०११ नंतरच्या घरांना रेडी रेकनरचा जो दर असेल तो भरून घेऊन तर त्यापूर्वीच्या घरांना विना मोबदला नियमित केले जाणार आहे. याशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत २०२२ पर्यंत सर्वांना स्वत:ची घरे दिली जाणार असल्याचेही पंकजा मुंडे यांनी सांगितले.१00 टक्के शाळांमध्ये पोषण आहार सुरूपोषण आहार काही शाळांमध्ये मिळाला नसल्याबबत पत्रकारांनी विचारले असता शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले की, पोषण आहार पुरविण्याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे पोषण आहार शाळांना मिळाला नव्हता. मात्र आता ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून सर्व शाळांमध्ये पोषण आहार सुरु झाला आहे. जर कोणत्या शाळेमध्ये अद्यापही पोषण आहार सुरु झाला नसेल तर आपण त्याबाबतचा लवकरच आढावा घेऊ व त्या शाळेला पोषण आहार मिळेल अशी व्यवस्था करू, अशी ग्वाहीही विनोद तावडे यांनी दिली.

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेsarpanchसरपंच