शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सिंधुदुर्ग : वेंगुर्लेतील मच्छिमार्केटचे रखडलेले काम केव्हा सुरू होणार ?, आश्वासनांची खैरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 19:21 IST

वेंगुर्ले नगरपरिषदेचा अद्ययावत मच्छिमार्केटचा रखडलेला प्रश्न आता आठवडा बाजारादिवशी मच्छी विक्रेत्यांबरोबरच प्रवासी व पादचारी वर्गासही त्रासदायक ठरू लागला आहे. अद्ययावत मच्छिमार्केट बांधण्यास आपण समर्थ आहोत असे सांगणाऱ्या लोकप्रतिनिधी व प्रशासनास वारंवार निवेदने दिली जातात. यावर महिनाभरात काम सुरू होणार असल्याची आश्वासने मिळतात; मात्र अद्ययावत मच्छिमार्केटच्या भूमिपूजनानंतर रखडलेल्या कामाला मूर्त स्वरूप कधी येते, याची आस सर्वांनाच लागली आहे.

ठळक मुद्देवेंगुर्लेतील मच्छिमार्केट : रखडलेले काम केव्हा सुरू होणार ? आश्वासनांची खैरात, प्रत्यक्षात कामाचा पत्ता नाही

सावळाराम भराडकर 

वेंगुर्ले : वेंगुर्ले नगरपरिषदेचा अद्ययावत मच्छिमार्केटचा रखडलेला प्रश्न आता आठवडा बाजारादिवशी मच्छी विक्रेत्यांबरोबरच प्रवासी व पादचारी वर्गासही त्रासदायक ठरू लागला आहे. अद्ययावत मच्छिमार्केट बांधण्यास आपण समर्थ आहोत असे सांगणाऱ्या लोकप्रतिनिधी व प्रशासनास वारंवार निवेदने दिली जातात. यावर महिनाभरात काम सुरू होणार असल्याची आश्वासने मिळतात; मात्र अद्ययावत मच्छिमार्केटच्या भूमिपूजनानंतर रखडलेल्या कामाला मूर्त स्वरूप कधी येते, याची आस सर्वांनाच लागली आहे.

आठवडा बाजारादिवशी मच्छी विक्रेते रस्त्यानजीक बसल्याने वाहनचालकांना अशी कसरत करावी लागते.

स्वच्छतेत अग्रेसर म्हणून नावलौकिक मिळविलेल्या वेंगुर्ले नगरपरिषदेसमोर अजूनही अद्ययावत मच्छिमार्केट, वाहनतळ, अरूंद रस्ते आदींसारखे ज्वलंत प्रश्न सोडविण्याचा पेच आहे. त्यात व्यक्तिगत हेवेदावे, राजकारण अशा विविध अंतर्गत कारणांनी वेंगुर्लेच्या विकासाला नेहमीच खीळ बसली आहे.

विकासात्मक उपक्रम राबविताना नागरिकांना विचारात न घेता काम सुरू करणे, काम सुरू असताना अर्धवट अवस्थेत ते काम नागरिकांकडून बंद पाडणे, ही नेहमीचीच समीकरणे बनली आहेत. याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो.

अद्ययावत मच्छिमार्केटचा बऱ्याच वर्षांचा प्रश्न अजूनही सुटत नसल्याने व मच्छी विक्रेत्यांना पर्यायी जागा मिळत नसल्याने वाहनतळ, वाहतूक कोंडीसारखे प्रश्न नगरपरिषदेसमोर आ वासून उभे आहेत. विशेषत: रविवारच्या आठवडा बाजारादिवशी याचा फटका सर्वांनाच बसतो.सद्यस्थितीत पर्यायी जागा म्हणून मच्छी विक्रेते बसत असलेल्या जागेचा रविवारच्या आठवडा बाजारात बाहेरील व्यापारी आश्रय घेतात. आधीच पर्यायी जागा कमी पडत असलेले मच्छी विक्रेते मग हॉटेल लौकिक समोरील रस्त्याच्या कडेलाच व्यवसाय थाटतात.त्यामुळे मुळातच अरुंद असलेला हा मार्ग मच्छी विक्रेत्यांमुळे वाहतूक कोंडीस निमंत्रण देतो. जोपर्यंत मच्छिमार्केट अद्ययावत होत नाही, तोपर्यंत वाहनतळ तसेच वाढती वाहतूक कोंडी यासारखे प्रश्न अनुत्तरित राहणार आहेत.वाहतूक पोलिसांची वानवावाहनतळाची कमतरता असलेल्या बाजारपेठेत वाहतूक पोलीसही नसल्याने वाहनचालक तसेच बाजारहाट करणाऱ्यांची मार्ग काढताना पुरती दमछाक होते. यातून काहीवेळा वाहनचालकात शाब्दिक बाचाबाचीचे प्रकारही होतात. असे प्रकार टाळण्यासाठी येथे वाहतूक पोलीस ठेवणे अत्यावश्यक आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfishermanमच्छीमार