शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सिंधुदुर्ग : वेताळबांबर्डेतील डोंगर खचला, वीज वितरणचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 16:20 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी खणण्यात येत असलेल्या मातीमुळे तालुक्यातील वेताळबांबर्डे येथील डोंगर खचत आहे. या ठिकाणी उच्चदाबाची वीजवाहिनी असलेले चार खांब कोसळण्याच्या स्थितीत आहेत.

ठळक मुद्दे वेताळबांबर्डेतील डोंगर खचला, वीज वितरणचे दुर्लक्ष  महामार्गावरील चौपदरीकरणामुळे वीज खांब कोसळण्याची भीती

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी खणण्यात येत असलेल्या मातीमुळे तालुक्यातील वेताळबांबर्डे येथील डोंगर खचत आहे. या ठिकाणी उच्चदाबाची वीजवाहिनी असलेले चार खांब कोसळण्याच्या स्थितीत आहेत.

या समस्येकडे महामार्ग व वीज वितरण विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली असून याकडे वेळीच लक्ष देण्यात यावे, अशी मागणी परिसरातील जनतेसह, वाहनचालकांतून होत आहे.या चौपदरीकरणाचे काम सुरू असताना आणखी एक धोकादायक काम समोर येत आहे. वेताळबांबर्डे येथील महामार्गाच्या कडेला असलेल्या एका डोंगराच्या मातीचा भराव चौपदरीकरणासाठी मोठ्या प्रमाणात वापरला गेला. या डोंगराचा भराव काढताना मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेतली नसल्याचे या ठिकाणच्या भराव खोदलेल्या स्थितीमुळे दिसून येते.या डोंगराच्या मध्यभागी उच्चदाबाची वीजवाहिनी घेऊन जाणारे विद्युत खांब असून आता हा डोंगर पोखरल्याने या डोंगराची माती घसरण्यास सुरूवात झाली आहे. या घसरणाऱ्या मातीबरोबरच येथील विद्युत खांबही खाली कोसळण्याच्या स्थितीत आहेत.या कोसळणाऱ्या डोंगराकडे व येथील विद्युत खांबाच्या सुरक्षिततेकडे संबंधित प्रशासनाने तत्काळ लक्ष न दिल्यास भविष्यात येथील डोंगराची माती व विद्युत खांब कोसळून मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.धोकादायक स्थितीमुळे नागरिकांना होतोय त्रासकुडाळ तालुक्यात महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युध्द पातळीवर सुरू असून हे काम सुरू असताना काही ठिकाणी महामार्ग प्रशासनाने व दिलीप बिल्डकॉन कंपनीने सुरक्षिततेचा विचार न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असून काही ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे. याबाबत येथील नागरिक व लोकप्रतिनिधींनी अनेकवेळा आंदोलने केली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्ग