शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
3
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
4
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
5
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
6
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
7
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
8
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
9
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
10
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
11
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
12
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
13
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
14
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
15
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
16
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
17
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
18
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
19
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
20
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?

सिंधुदुर्ग : सुभाष आरोसकर यांचा भाजपमध्ये प्रवेश, तिसऱ्या इनिंगला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 15:39 IST

सदगुरू वामराव पै यांच्या जीवनविद्या मिशनमध्ये आरोसकरांनी झपाटून केलेले काम पाहता भाजपमध्ये त्यांची राजकीय नौका किनाऱ्यावर विजयापर्यंत पोहोचेल असा आत्मविश्वास भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष सुहास आडिवरेकर यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देराजकीय नौका विजयापर्यंत पोहोचेल : सुहास आडिवरेकरसुभाष आरोसकर यांचा भाजपमध्ये प्रवेश, तिसऱ्या इनिंगला प्रारंभ

सिंधुदुर्ग : सुभाष आरोसकर हे अष्टपैलू, अभ्यासू आणि झपाटलेले नेतृत्व आहे. प्रथम नोकरी, त्यानंतर जीवनविद्या मिशन आणि आता त्यांनी भाजपासारख्या राष्ट्रहित जपणाऱ्या पक्षात अधिकृत प्रवेश करून तिसऱ्या ईनिंगला सुरुवात केली आहे. पहिल्या दोन प्रमाणे ही देखील बहारदार असेल.

सदगुरू वामराव पै यांच्या जीवनविद्या मिशनमध्ये आरोसकरांनी झपाटून केलेले काम पाहता भाजपमध्ये त्यांची राजकीय नौका किनाऱ्यावर विजयापर्यंत पोहोचेल असा आत्मविश्वास भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष सुहास आडिवरेकर यांनी व्यक्त केला.जीवनविद्या मिशनचे अनुयायी वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावचे सुपूत्र आणि शिक्षण महर्षी अ‍ॅड. डॉ. सुभाष आरोसकर आणि त्यांच्या पत्नी सुप्रिया आरोसकर यांनी खार मुंबई येथील अनुयोग प्रशालेत दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर भाजप पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आडिवरेकर यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध उद्योगपती दादासाहेब परूळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक महेश पारकर, विधानसभा अध्यक्ष गुलाब दुबे, अनुयोग संस्थेचे अध्यक्ष सतीश चिंदरकर, प्रसाद मर्गज आदी उपस्थित होते. यावेळी रमाकांत पै, विनायक कारभाटकर, पुण्यातील विभावरी येवले, चंद्रकांत जळगावकर, विक्रम सातारडेकर, अरूण घाडी, विलास देऊलकर, दिनेश आस्वाल आदी उपस्थित होते. पक्षप्रवेश कार्यक्रमापूर्वी सांताक्रूझ येथील संगीत जीवनविद्याच्या टीमने दोन तास आपली कला सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजीत धावडे यांनी केले.आरक्षण बाजूला ठेऊन गोरगरिबांना मदत कराउद्योगपती दादासाहेब परूळकर म्हणाले, मी अगदी लहानपणापासून सुभाषला जवळून पाहतोय. तो भाजपमध्ये प्रवेश करून नुसता गप्प बसणार नाही. त्याच्यात काहीतरी करून दाखविण्याची धमक आहे. भाजपच्या रूपाने आपण लोकांचे चांगले करेन अशी प्रतिज्ञा त्याने करावी. सध्या सर्वत्र गाजत असलेला आरक्षणाचा विषय बाजूला ठेऊन गोरगरिबांची शोध मोहीम राबवून त्यांना मदत करावी. त्यामुळे समाजात वाढत चाललेली दरी कमी होईल. 

टॅग्स :Politicsराजकारणsindhudurgसिंधुदुर्ग