शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
3
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
4
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
5
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
6
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
7
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
8
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
9
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
10
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."
11
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
12
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
13
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
14
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
16
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
17
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
18
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
19
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
20
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले

सिंधुदुर्ग : सुभाष आरोसकर यांचा भाजपमध्ये प्रवेश, तिसऱ्या इनिंगला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 15:39 IST

सदगुरू वामराव पै यांच्या जीवनविद्या मिशनमध्ये आरोसकरांनी झपाटून केलेले काम पाहता भाजपमध्ये त्यांची राजकीय नौका किनाऱ्यावर विजयापर्यंत पोहोचेल असा आत्मविश्वास भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष सुहास आडिवरेकर यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देराजकीय नौका विजयापर्यंत पोहोचेल : सुहास आडिवरेकरसुभाष आरोसकर यांचा भाजपमध्ये प्रवेश, तिसऱ्या इनिंगला प्रारंभ

सिंधुदुर्ग : सुभाष आरोसकर हे अष्टपैलू, अभ्यासू आणि झपाटलेले नेतृत्व आहे. प्रथम नोकरी, त्यानंतर जीवनविद्या मिशन आणि आता त्यांनी भाजपासारख्या राष्ट्रहित जपणाऱ्या पक्षात अधिकृत प्रवेश करून तिसऱ्या ईनिंगला सुरुवात केली आहे. पहिल्या दोन प्रमाणे ही देखील बहारदार असेल.

सदगुरू वामराव पै यांच्या जीवनविद्या मिशनमध्ये आरोसकरांनी झपाटून केलेले काम पाहता भाजपमध्ये त्यांची राजकीय नौका किनाऱ्यावर विजयापर्यंत पोहोचेल असा आत्मविश्वास भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष सुहास आडिवरेकर यांनी व्यक्त केला.जीवनविद्या मिशनचे अनुयायी वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावचे सुपूत्र आणि शिक्षण महर्षी अ‍ॅड. डॉ. सुभाष आरोसकर आणि त्यांच्या पत्नी सुप्रिया आरोसकर यांनी खार मुंबई येथील अनुयोग प्रशालेत दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर भाजप पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आडिवरेकर यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध उद्योगपती दादासाहेब परूळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक महेश पारकर, विधानसभा अध्यक्ष गुलाब दुबे, अनुयोग संस्थेचे अध्यक्ष सतीश चिंदरकर, प्रसाद मर्गज आदी उपस्थित होते. यावेळी रमाकांत पै, विनायक कारभाटकर, पुण्यातील विभावरी येवले, चंद्रकांत जळगावकर, विक्रम सातारडेकर, अरूण घाडी, विलास देऊलकर, दिनेश आस्वाल आदी उपस्थित होते. पक्षप्रवेश कार्यक्रमापूर्वी सांताक्रूझ येथील संगीत जीवनविद्याच्या टीमने दोन तास आपली कला सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजीत धावडे यांनी केले.आरक्षण बाजूला ठेऊन गोरगरिबांना मदत कराउद्योगपती दादासाहेब परूळकर म्हणाले, मी अगदी लहानपणापासून सुभाषला जवळून पाहतोय. तो भाजपमध्ये प्रवेश करून नुसता गप्प बसणार नाही. त्याच्यात काहीतरी करून दाखविण्याची धमक आहे. भाजपच्या रूपाने आपण लोकांचे चांगले करेन अशी प्रतिज्ञा त्याने करावी. सध्या सर्वत्र गाजत असलेला आरक्षणाचा विषय बाजूला ठेऊन गोरगरिबांची शोध मोहीम राबवून त्यांना मदत करावी. त्यामुळे समाजात वाढत चाललेली दरी कमी होईल. 

टॅग्स :Politicsराजकारणsindhudurgसिंधुदुर्ग