शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : सुभाष आरोसकर यांचा भाजपमध्ये प्रवेश, तिसऱ्या इनिंगला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 15:39 IST

सदगुरू वामराव पै यांच्या जीवनविद्या मिशनमध्ये आरोसकरांनी झपाटून केलेले काम पाहता भाजपमध्ये त्यांची राजकीय नौका किनाऱ्यावर विजयापर्यंत पोहोचेल असा आत्मविश्वास भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष सुहास आडिवरेकर यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देराजकीय नौका विजयापर्यंत पोहोचेल : सुहास आडिवरेकरसुभाष आरोसकर यांचा भाजपमध्ये प्रवेश, तिसऱ्या इनिंगला प्रारंभ

सिंधुदुर्ग : सुभाष आरोसकर हे अष्टपैलू, अभ्यासू आणि झपाटलेले नेतृत्व आहे. प्रथम नोकरी, त्यानंतर जीवनविद्या मिशन आणि आता त्यांनी भाजपासारख्या राष्ट्रहित जपणाऱ्या पक्षात अधिकृत प्रवेश करून तिसऱ्या ईनिंगला सुरुवात केली आहे. पहिल्या दोन प्रमाणे ही देखील बहारदार असेल.

सदगुरू वामराव पै यांच्या जीवनविद्या मिशनमध्ये आरोसकरांनी झपाटून केलेले काम पाहता भाजपमध्ये त्यांची राजकीय नौका किनाऱ्यावर विजयापर्यंत पोहोचेल असा आत्मविश्वास भाजपचे उत्तर मध्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष सुहास आडिवरेकर यांनी व्यक्त केला.जीवनविद्या मिशनचे अनुयायी वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावचे सुपूत्र आणि शिक्षण महर्षी अ‍ॅड. डॉ. सुभाष आरोसकर आणि त्यांच्या पत्नी सुप्रिया आरोसकर यांनी खार मुंबई येथील अनुयोग प्रशालेत दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर भाजप पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आडिवरेकर यांनी त्यांचे स्वागत केले.यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध उद्योगपती दादासाहेब परूळकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक महेश पारकर, विधानसभा अध्यक्ष गुलाब दुबे, अनुयोग संस्थेचे अध्यक्ष सतीश चिंदरकर, प्रसाद मर्गज आदी उपस्थित होते. यावेळी रमाकांत पै, विनायक कारभाटकर, पुण्यातील विभावरी येवले, चंद्रकांत जळगावकर, विक्रम सातारडेकर, अरूण घाडी, विलास देऊलकर, दिनेश आस्वाल आदी उपस्थित होते. पक्षप्रवेश कार्यक्रमापूर्वी सांताक्रूझ येथील संगीत जीवनविद्याच्या टीमने दोन तास आपली कला सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजीत धावडे यांनी केले.आरक्षण बाजूला ठेऊन गोरगरिबांना मदत कराउद्योगपती दादासाहेब परूळकर म्हणाले, मी अगदी लहानपणापासून सुभाषला जवळून पाहतोय. तो भाजपमध्ये प्रवेश करून नुसता गप्प बसणार नाही. त्याच्यात काहीतरी करून दाखविण्याची धमक आहे. भाजपच्या रूपाने आपण लोकांचे चांगले करेन अशी प्रतिज्ञा त्याने करावी. सध्या सर्वत्र गाजत असलेला आरक्षणाचा विषय बाजूला ठेऊन गोरगरिबांची शोध मोहीम राबवून त्यांना मदत करावी. त्यामुळे समाजात वाढत चाललेली दरी कमी होईल. 

टॅग्स :Politicsराजकारणsindhudurgसिंधुदुर्ग