शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

सिंधुदुर्ग :नाचता येईना अंगण वाकडे अशी पालकमंत्र्यांची स्थिती :  सतीश सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 10:46 IST

केसरकर यांनाच प्रशासन चालवायला जमत नाही. त्यामुळे त्यांनी अधिकारी वर्गावर खापर फोडण्यापेक्षा आपली मानसिकता बदलावी. तसेच जिल्ह्यातील जनतेच्या भल्यासाठी आमदार व मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली.

ठळक मुद्देनाचता येईना अंगण वाकडे अशी पालकमंत्र्यांची स्थिती :  सतीश सावंतपूर्वी राणे, आता अधिकारी विकास करू देत नसल्याची मारत आहेत ओरड

सिंधुदुर्गनगरी : नाचता येईना अंगण वाकडे अशी स्थिती पालकमंत्र्यांची झाली आहे. त्यामुळे ते आपल्या अपयशाचे खापर फोडत आहेत. पूर्वी राणे विकास करायला देत नाहीत आणि आता अधिकारी विकास करायला देत नाहीत अशी ओरड मारत आहेत. आपल्याला अधिकारी ऐकत नाहीत. नकारात्मक आहेत असा आरोप खुद्द पालकमंत्री दीपक केसरकर यांनी करीत २०१४ पासून आम्ही ओरड मारीत असलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तब केले आहे. मुळात केसरकर यांनाच प्रशासन चालवायला जमत नाही. त्यामुळे त्यांनी अधिकारी वर्गावर खापर फोडण्यापेक्षा आपली मानसिकता बदलावी. तसेच जिल्ह्यातील जनतेच्या भल्यासाठी आमदार व मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषदेत केली.सतीश सावंत म्हणाले, जिल्हा नियोजन सभा होऊन तीन महिने उलटले तरी जिल्हा नियोजनच्या निधीचे वाटप करण्यात आलेले नाही. जिल्हा परिषदेच्या कामांची यादी दिलेली नाही. सभेच्या इतिवृतावर स्वाक्षरी घेण्यासाठी केसरकर यांच्याकडे अधिकारी हेलपाटे मारीत आहेत. यावरून पालकमंत्री केसरकर यांना प्रशासनातील काही समजत नाही, हे स्पष्ट होत आहे. त्यांच्या फक्त पोकळ घोषणा व ह्यमी निधी आणलाह्ण या वलग्नाच असतात, असाही आरोप सावंत यांनी केला.केसरकर यांच्या एवढा निष्क्रिय पालकमंत्री जिल्ह्याला आतापर्यंत लाभलेला नाही. त्यामुळे नारायण राणे व त्यांची तुलना होऊ शकत नाही. आतापर्यंत राणे काम करू देत नाहीत असा आरोप केला. आता अधिकारी यांचे नाव घेतात. मुळात जिल्ह्यातील अधिकारी सकारात्मक आहेत. त्यांच्या शिवाय जिल्ह्याचा विकास होऊ शकत नाही. आपली निष्क्रियता झाकण्यासाठी केसरकर यांनी सुरु केलेले दोषारोप जिल्ह्यातील जनतेपुढे झाकले जाणार नाहीत, असाही आरोप सावंत यांनी केला.चांदा ते बांदा योजना जिल्हा बँकेकडे द्याशासनाने चांदा ते बांदा ही महत्वाकांशी योजना सुरु केली आहे. मात्र पालकमंत्री केसरकर यांच्याकडे योग्य नियोजन नसल्याने ७८ बैठका घेवूनही योजना यशस्वी झालेली नाही. हे ही एक त्यांचे एक अपयश आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी ही योजना निधीसह जिल्हा बँकेकडे द्यावी आपण या योजनेची १५ दिवसात अंमलबजावणी करून दाखवू असे आव्हानही सतीश सावंत यांनी यावेळी दिले आहे.

टॅग्स :Satish Sawantसतीश सावंतDeepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग