शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग  : सौरकुंपणाचे काम रखडले, मळगाव ग्रामस्थ आक्रमक, वनक्षेत्रपालांची घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 16:01 IST

वन्यप्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणाकरिता मळगाव गावासाठी मंजूर झालेले सौरकुंपणाचे काम वर्क आॅर्डर मिळूनही तीन महिने उलटले तरी सुरू करण्यात आले नसल्याने मंगळवारी मळगाव ग्रामस्थांनी वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे यांची भेट घेतली. यावेळी काम तत्काळ सुरू करा, अन्यथा शेतकऱ्यांना त्यांचा वैयक्तिक लाभ द्या, अशी मागणी केली.

ठळक मुद्देसौरकुंपणाचे काम रखडले, मळगाव ग्रामस्थ आक्रमकवनक्षेत्रपालांची घेतली भेट

सावंतवाडी : वन्यप्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणाकरिता मळगाव गावासाठी मंजूर झालेले सौरकुंपणाचे काम वर्क आॅर्डर मिळूनही तीन महिने उलटले तरी सुरू करण्यात आले नसल्याने मंगळवारी मळगाव ग्रामस्थांनी वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे यांची भेट घेतली. यावेळी काम तत्काळ सुरू करा, अन्यथा शेतकऱ्यांना त्यांचा वैयक्तिक लाभ द्या, अशी मागणी केली.

दरम्यान, सौरकुंपणाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, हे काम चांगले दर्जेदार व्हावे, यासाठी ते रोखण्यात येऊन बंद केले होते. त्यानंतर चांगले काम करण्याबाबत संबंधित कंत्राटदाराला नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. हे काम पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत, असे वनक्षेत्रपाल पाणपट्टे यांनी सांगितले.

तालुक्यात मळगाव गावासाठी पंचवीस लाखांचे सौरकुंपण जाहीर करण्यात आले आहे. ते वेत्ये-नेमळे या सीमेवर बसविण्यात येणार आहे. वर्कआॅर्डर काढून तीन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी अद्यापपर्यंत काम पूर्ण झालेले नाही. आता आणखी काही महिन्यांनी पुन्हा शेती सुरू होणार आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय घ्या, अशी मागणी तेथील ग्रामस्थांकडून करण्यात आली.यावेळी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य गजानन सातार्डेकर, संतोष सामंत, वनसमिती सदस्य मिलिंद पंत, अजित सातार्डेकर, बाबू मांगरकर, बाळा सातार्डेकर, महेश पंत, विजय नाईक, पंढरी नाईक, बाबल राणे आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी पाणपट्टे यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केली. सौरकुंपण घालणे गरजेचे आहे. सद्यस्थिती लक्षात घेता मोठ्या प्रमाणात गवे शेती-बागायतीत घुसून नुकसान करीत आहेत. त्याचबरोबर ग्रामस्थांच्या पाठी लागण्याचा प्रकार वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी पंढरीनाथ नाईक या शेतकऱ्यांचा गव्याने पाठलाग केला. सुदैवाने यात ते बचावले आहेत.कामाची योग्य दखल घ्यासौरकुंपणाचे काम घेऊन ठेकेदाराला तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. सामान निकृ ष्ट दर्जाचे असल्याने आपणाकडून काम बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. मात्र, सद्यस्थितीत त्याठिकाणी निकृष्ट दर्जाचे साहित्य टाकण्यात आले आहे.

त्याची योग्य दखल घ्या अन्यथा २५ लाख रूपये खर्च करूनही काहीच फायदा होणार नाही, असे सरपंच गणेश पेडणेकर यांनी सांगितले. सौरकुंपणाबाबत वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे यांच्याशी मळगाव ग्रामस्थांनी चर्चा केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गwildlifeवन्यजीव