शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

सिंधुदुर्ग  : सौरकुंपणाचे काम रखडले, मळगाव ग्रामस्थ आक्रमक, वनक्षेत्रपालांची घेतली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 16:01 IST

वन्यप्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणाकरिता मळगाव गावासाठी मंजूर झालेले सौरकुंपणाचे काम वर्क आॅर्डर मिळूनही तीन महिने उलटले तरी सुरू करण्यात आले नसल्याने मंगळवारी मळगाव ग्रामस्थांनी वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे यांची भेट घेतली. यावेळी काम तत्काळ सुरू करा, अन्यथा शेतकऱ्यांना त्यांचा वैयक्तिक लाभ द्या, अशी मागणी केली.

ठळक मुद्देसौरकुंपणाचे काम रखडले, मळगाव ग्रामस्थ आक्रमकवनक्षेत्रपालांची घेतली भेट

सावंतवाडी : वन्यप्राण्यांपासून शेतीच्या संरक्षणाकरिता मळगाव गावासाठी मंजूर झालेले सौरकुंपणाचे काम वर्क आॅर्डर मिळूनही तीन महिने उलटले तरी सुरू करण्यात आले नसल्याने मंगळवारी मळगाव ग्रामस्थांनी वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे यांची भेट घेतली. यावेळी काम तत्काळ सुरू करा, अन्यथा शेतकऱ्यांना त्यांचा वैयक्तिक लाभ द्या, अशी मागणी केली.

दरम्यान, सौरकुंपणाचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, हे काम चांगले दर्जेदार व्हावे, यासाठी ते रोखण्यात येऊन बंद केले होते. त्यानंतर चांगले काम करण्याबाबत संबंधित कंत्राटदाराला नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. हे काम पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत, असे वनक्षेत्रपाल पाणपट्टे यांनी सांगितले.

तालुक्यात मळगाव गावासाठी पंचवीस लाखांचे सौरकुंपण जाहीर करण्यात आले आहे. ते वेत्ये-नेमळे या सीमेवर बसविण्यात येणार आहे. वर्कआॅर्डर काढून तीन महिन्यांचा कालावधी उलटला असला तरी अद्यापपर्यंत काम पूर्ण झालेले नाही. आता आणखी काही महिन्यांनी पुन्हा शेती सुरू होणार आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय घ्या, अशी मागणी तेथील ग्रामस्थांकडून करण्यात आली.यावेळी सरपंच गणेशप्रसाद पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य गजानन सातार्डेकर, संतोष सामंत, वनसमिती सदस्य मिलिंद पंत, अजित सातार्डेकर, बाबू मांगरकर, बाळा सातार्डेकर, महेश पंत, विजय नाईक, पंढरी नाईक, बाबल राणे आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी पाणपट्टे यांच्याशी ग्रामस्थांनी चर्चा केली. सौरकुंपण घालणे गरजेचे आहे. सद्यस्थिती लक्षात घेता मोठ्या प्रमाणात गवे शेती-बागायतीत घुसून नुकसान करीत आहेत. त्याचबरोबर ग्रामस्थांच्या पाठी लागण्याचा प्रकार वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी पंढरीनाथ नाईक या शेतकऱ्यांचा गव्याने पाठलाग केला. सुदैवाने यात ते बचावले आहेत.कामाची योग्य दखल घ्यासौरकुंपणाचे काम घेऊन ठेकेदाराला तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. सामान निकृ ष्ट दर्जाचे असल्याने आपणाकडून काम बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. मात्र, सद्यस्थितीत त्याठिकाणी निकृष्ट दर्जाचे साहित्य टाकण्यात आले आहे.

त्याची योग्य दखल घ्या अन्यथा २५ लाख रूपये खर्च करूनही काहीच फायदा होणार नाही, असे सरपंच गणेश पेडणेकर यांनी सांगितले. सौरकुंपणाबाबत वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे यांच्याशी मळगाव ग्रामस्थांनी चर्चा केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गwildlifeवन्यजीव