शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

सिंधुुदुर्ग : सोनवडे घाटमार्गासाठी आत्मदहनाचा इशारा, प्रशासनाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 14:25 IST

गेली चाळीस वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही घाटमार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नसेल तर जगण्यातही काहीही अर्थ नाही. नैराश्याने आम्हाला घेरले आहे. म्हणून ३१ मे रोजी सोनवडे घाटमार्गाच्या पायथ्याशी आत्मदहन करणार असल्याचा इशारा पत्रकाद्वारे प्रा. महेंद्र नाटेकर यांनी प्रशासनाला दिला.

ठळक मुद्देसोनवडे घाटमार्गासाठी आत्मदहनाचा इशारा, प्रशासनाला निवेदन  ३१ मे पर्यंतची मुदत; महेंद्र नाटेकर आक्रमक

सिंधुुदुर्ग : गेली चाळीस वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही घाटमार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नसेल तर जगण्यातही काहीही अर्थ नाही. नैराश्याने आम्हाला घेरले आहे. म्हणून ३१ मे रोजी सोनवडे घाटमार्गाच्या पायथ्याशी आत्मदहन करणार असल्याचा इशारा पत्रकाद्वारे प्रा. महेंद्र नाटेकर यांनी प्रशासनाला दिला. यावेळी उपस्थित राहून आमच्या आत्मदहनातील आसुरी आनंद घ्यावा असे आवाहनही त्यांनी प्रशासनाला केले आहे.जिल्ह्यातून कोल्हापूरला जाण्यासाठी फोंडा, करुळ, भुईबावडा, आंबोली, आंबा आदी घाटमार्ग आहेत. परंतु हे सर्व घाटमार्ग दुर्गम आहेत. या प्रत्येकाची १००१५ किलोमीटर्स लांबी, उंची जास्त आहे. पावसाळ्यात दरडी कोसळून अपघात होतात. या अपघातात आतापर्यंत हजारो प्रवासी अपंग झाले असून शेकडो प्रवासी मरण पावले आहेत.१९७० च्या दशकात एस. एन. देसाई यांनी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. घाटमार्गाचे सर्वेक्षण करुन हिरवा कंदील दिल्याने वेंगुर्ले मठ-पणदूर-घोटगे-सोनवडे-कडगाव-पाटगांव-गारगोटी असा महामार्ग मंजूर केला.

घाटमार्ग मंजूर केल्याने आता शासन घाटमार्ग सुरु करील म्हणून आम्ही चार-पाच वर्षे वाट पाहिली. आणि नंतर आमरण उपोषणे, रस्ता रोको, घेराओ, धरणे आदी आंदोलने केली. तेव्हा घाटमार्गाचे काम करण्याच्यादृष्टीने शासनाच्या हालचाली सुरु झाल्या.

ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे घाटमार्गासाठी जमिनी दिल्या. घाटमार्गाच्या दोन्ही बाजूस दोन -दोन किलोमीटर्स पक्के रस्ते करण्यात आले. वन व वनसंज्ञा जमिनीला पर्यायी जमिनी देण्यात आल्या. वन्यप्राणी सर्वेक्षण व जन सुनावणी झाले. कोणतीही तक्रार न करता घाटमार्ग त्वरीत व्हावा म्हणून सहकार्य केले.

डेहराडून पर्यावरणासाठी हिरवा कंदिल दाखविण्यात आलाा. घाटमार्गासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला. एक महिन्याच्या आत सोनवडे घाटमार्गाचे काम सुरु न केल्यास आत्मदहन करण्याची नोटीस दिली. पण शासनाने घाटमार्गाचे काम प्रत्यक्षात सुरु केले नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग व कोल्हापूरमधील कार्यकर्ते व जनता संतप्त झाली आहेत.इंधन, वेळेची बचतया पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असताना एस. एन. देसाई यांच्याकडे सोनवडे घाटमार्गाची मागणी केली. या घाटमार्गाची लांबी सहा-सात किलोमीटर आहे. हा घाटमार्ग नसून ही एक टेकडी मार्ग आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. महाराष्ट्राएवढा सोपा व सुरक्षित दुसरा घाटमार्ग नाही. कोल्हापूरचे अंतर सुमारे २० किलोमीटरर्सने कमी होते. इंधन व वेळेची बचत होते.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गpwdसार्वजनिक बांधकाम विभागforestजंगलArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण