शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

सिंधुुदुर्ग : सोनवडे घाटमार्गासाठी आत्मदहनाचा इशारा, प्रशासनाला निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2018 14:25 IST

गेली चाळीस वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही घाटमार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नसेल तर जगण्यातही काहीही अर्थ नाही. नैराश्याने आम्हाला घेरले आहे. म्हणून ३१ मे रोजी सोनवडे घाटमार्गाच्या पायथ्याशी आत्मदहन करणार असल्याचा इशारा पत्रकाद्वारे प्रा. महेंद्र नाटेकर यांनी प्रशासनाला दिला.

ठळक मुद्देसोनवडे घाटमार्गासाठी आत्मदहनाचा इशारा, प्रशासनाला निवेदन  ३१ मे पर्यंतची मुदत; महेंद्र नाटेकर आक्रमक

सिंधुुदुर्ग : गेली चाळीस वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही घाटमार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होत नसेल तर जगण्यातही काहीही अर्थ नाही. नैराश्याने आम्हाला घेरले आहे. म्हणून ३१ मे रोजी सोनवडे घाटमार्गाच्या पायथ्याशी आत्मदहन करणार असल्याचा इशारा पत्रकाद्वारे प्रा. महेंद्र नाटेकर यांनी प्रशासनाला दिला. यावेळी उपस्थित राहून आमच्या आत्मदहनातील आसुरी आनंद घ्यावा असे आवाहनही त्यांनी प्रशासनाला केले आहे.जिल्ह्यातून कोल्हापूरला जाण्यासाठी फोंडा, करुळ, भुईबावडा, आंबोली, आंबा आदी घाटमार्ग आहेत. परंतु हे सर्व घाटमार्ग दुर्गम आहेत. या प्रत्येकाची १००१५ किलोमीटर्स लांबी, उंची जास्त आहे. पावसाळ्यात दरडी कोसळून अपघात होतात. या अपघातात आतापर्यंत हजारो प्रवासी अपंग झाले असून शेकडो प्रवासी मरण पावले आहेत.१९७० च्या दशकात एस. एन. देसाई यांनी सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. घाटमार्गाचे सर्वेक्षण करुन हिरवा कंदील दिल्याने वेंगुर्ले मठ-पणदूर-घोटगे-सोनवडे-कडगाव-पाटगांव-गारगोटी असा महामार्ग मंजूर केला.

घाटमार्ग मंजूर केल्याने आता शासन घाटमार्ग सुरु करील म्हणून आम्ही चार-पाच वर्षे वाट पाहिली. आणि नंतर आमरण उपोषणे, रस्ता रोको, घेराओ, धरणे आदी आंदोलने केली. तेव्हा घाटमार्गाचे काम करण्याच्यादृष्टीने शासनाच्या हालचाली सुरु झाल्या.

ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे घाटमार्गासाठी जमिनी दिल्या. घाटमार्गाच्या दोन्ही बाजूस दोन -दोन किलोमीटर्स पक्के रस्ते करण्यात आले. वन व वनसंज्ञा जमिनीला पर्यायी जमिनी देण्यात आल्या. वन्यप्राणी सर्वेक्षण व जन सुनावणी झाले. कोणतीही तक्रार न करता घाटमार्ग त्वरीत व्हावा म्हणून सहकार्य केले.

डेहराडून पर्यावरणासाठी हिरवा कंदिल दाखविण्यात आलाा. घाटमार्गासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला. एक महिन्याच्या आत सोनवडे घाटमार्गाचे काम सुरु न केल्यास आत्मदहन करण्याची नोटीस दिली. पण शासनाने घाटमार्गाचे काम प्रत्यक्षात सुरु केले नाही. त्यामुळे सिंधुदुर्ग व कोल्हापूरमधील कार्यकर्ते व जनता संतप्त झाली आहेत.इंधन, वेळेची बचतया पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असताना एस. एन. देसाई यांच्याकडे सोनवडे घाटमार्गाची मागणी केली. या घाटमार्गाची लांबी सहा-सात किलोमीटर आहे. हा घाटमार्ग नसून ही एक टेकडी मार्ग आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. महाराष्ट्राएवढा सोपा व सुरक्षित दुसरा घाटमार्ग नाही. कोल्हापूरचे अंतर सुमारे २० किलोमीटरर्सने कमी होते. इंधन व वेळेची बचत होते.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गpwdसार्वजनिक बांधकाम विभागforestजंगलArchaeological Survey of Indiaभारतीय पुरातत्व सर्वेक्षण