शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

सिंधुदुर्ग : सातवा वेतन : असंवेदनशील सरकारवर विश्वास नाही : विश्वास काटकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 16:30 IST

आॅगस्टच्या संपाची शासनाने दखल न घेतल्यास आॅक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी शिक्षक यांच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष विश्वास काटकर यांनी दिली.

ठळक मुद्देसातवा वेतन : असंवेदनशील सरकारवर विश्वास नाही : विश्वास काटकर आॅगस्टच्या संपाची दखल न घेतल्यास आॅक्टोबरपासून बेमुदत संप

सिंधुदुर्गनगरी : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे आदी प्रमुख मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत आहे. कर्मचाऱ्यांना काही देण्यासाठी हे शासन संवेदनशील नाही. त्यामुळे आपला या सरकारवर विश्वास नसल्याचा आरोप करीत ७ ते ९ आॅगस्टच्या संपाची शासनाने दखल न घेतल्यास आॅक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी शिक्षक यांच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष विश्वास काटकर यांनी दिली.आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारलेल्या ७ ते ९ आॅगस्ट या तीन दिवसांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर संघटनेचे राज्याध्यक्ष बुधवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौºयावर आले होते. यावेळी कर्मचाऱ्यांची जिल्हा नियोजन समिती सभागृहात बैठक झाली. या बैठकीनंतर विश्वास काटकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किसन धनराज, एस. एल. सपकाळ, एस. बी. माळवे, सचिन माने, एस. व्ही. घाडीगावकर आदी उपस्थित होते.यावेळी विश्वास काटकर म्हणाले की, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी, महागाई भत्ता मिळावा, मागील दोन वाढीव भत्ते द्यावेत, खासगीकरण व कंत्राटीकरण रद्द करावे, अतिरिक्त शिक्षक व कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे आदी विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनेकवेळा आंदोलने करण्यात आली.संपाची नोटीस देण्यात आली. त्यावेळी १६ जानेवारी व ७ जुलै २०१७ रोजी मुख्यमंत्र्यांसोबत संघटनेची चर्चा झाली. यावेळी मागण्या मान्य करण्याबाबत आश्वासने देण्यात आली. मात्र ही आश्वासने पूर्ण करण्यात आली नाहीत. त्यामुळे सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये शासनाच्या वेळकाढू धोरणामुळे असंतोष पसरला होता. त्यामुळे ११ डिसेंबर २०१७ रोजी निषेध दिन, २२ फेब्रुवारी रोजी मोर्चा आणि १२ जून रोजी निदर्शने आंदोलन करण्यात आली होती.

परंतु त्याचीही शासनाने दखल न घेतल्याने ७ ते ९ आॅगस्ट २०१८ या कालावधीत संपावर जाण्याच्या निर्णय राज्य सरकारी कर्मचारी संघटना व सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या सभेत घेण्यात आला आहे.७ ते ९ आॅगस्ट या तीन दिवसांचा संप यशस्वी करण्याबाबत चर्चा करण्यासाठी आपण सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलो होतो. या बैठकीत चर्चा करून आॅगस्ट महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या संपाची शासनाने दखल न घेतल्यास आॅक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याच्या निर्णय घेण्यात आला असल्याचे विश्वास काटकर यांनी स्पष्ट केले. 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे आदी प्रमुख्य मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत आहे. कर्मचाऱ्यांना काही देण्यासाठी हे शासन संवेदनशील नाही. त्यामुळे या सरकारवर आपला विश्वास नाही.- विश्वास काटकर, कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष

टॅग्स :Governmentसरकारsindhudurgसिंधुदुर्ग