शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

सिंधुदुर्ग : घरबांधणी परवानगीचे अधिकार आता ग्रामपंचायतींना, वैभव नाईक यांचा पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 17:16 IST

राज्य शासनाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खास बाब म्हणून घरबांधणी, घर दुरूस्ती परवानगीचे अधिकार आता पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतींनाच देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने यासाठी आमदार वैभव नाईक हे राज्य शासनाकडे पाठपुरावा करत होते. त्याला यश आले आहे. त्यामुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देघरबांधणी परवानगीचे अधिकार आता ग्रामपंचायतींनाकोकणवासीयांना मोठा दिलासा, वैभव नाईक यांचा पाठपुरावा

सिंधुदुर्ग : राज्य शासनाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खास बाब म्हणून घरबांधणी, घर दुरूस्ती परवानगीचे अधिकार आता पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतींनाच देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने यासाठी आमदार वैभव नाईक हे राज्य शासनाकडे पाठपुरावा करत होते. त्याला यश आले आहे. त्यामुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.२0१४ सालापूर्वी कोकणात घरबांधणी आणि घरदुरूस्तीच्या परवानगीचे अधिकार ग्रामपंचायतींना होते. मात्र त्यानंतर हे अधिकार ग्रापंचायतकडून काढून घेऊन तालुकास्तरावर तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले होते. त्यासाठी काही जाचक अटींची पूर्तताही करावी लागत होती. मात्र कोकणवासियांसाठी हा निर्णयच जाचक ठरत होता. याबाबत आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने राज्यशासनाकडे पाठपुरावा करत घरबांधणी परवानगीचे अधिकार पूर्ववत ग्रामपंचायतकडे देण्याची मागणी केली होती.

राज्याच्या इतर भागात गावठाण क्षेत्र आहे. मात्र रत्नागिरी, सिंधुदुर्गात गावठाण क्षेत्र नाही. ज्याप्रमाणे कुळवहिवाटीच्या जमिनींकरीता रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी वेगळा निर्णय घेण्यात आला होता, तोच आधार घेऊन ग्रामपंचायतींना पूर्ववत घरबांधणी परवानगीचे अधिकार देण्यात आले आहेत.आमदार वैभव नाईक यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याशी बैठक घेऊन पाठपुरावा केला होता. या बैठकीला महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता हे ही उपस्थित होते.प्राधिकरण ग्रामपंचायत सोडून निर्णय लागूरत्नागिरी, सिंधुदुर्गातील लोकांना ग्रामपंचायत स्तरावरच घरबांधणीची परवानगी मिळणे कसे आवश्यक आहे ही बाब आमदार नाईक यांनी मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना पटवून दिली होती. कोकणवासियांची ही महत्त्वपूर्ण मागणी लक्षात घेऊन आता पूर्ववत ग्रामपंचायतना घरबांधणी परवानगीचे अधिकार देण्यात आले आहेत. प्राधिकरण ग्रामपंचायत सोडून अन्य ग्रापंचायतींना हा निर्णय लागू होणार आहे. या निर्णयाची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

टॅग्स :Homeघरsindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक