शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : घरबांधणी परवानगीचे अधिकार आता ग्रामपंचायतींना, वैभव नाईक यांचा पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 17:16 IST

राज्य शासनाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खास बाब म्हणून घरबांधणी, घर दुरूस्ती परवानगीचे अधिकार आता पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतींनाच देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने यासाठी आमदार वैभव नाईक हे राज्य शासनाकडे पाठपुरावा करत होते. त्याला यश आले आहे. त्यामुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देघरबांधणी परवानगीचे अधिकार आता ग्रामपंचायतींनाकोकणवासीयांना मोठा दिलासा, वैभव नाईक यांचा पाठपुरावा

सिंधुदुर्ग : राज्य शासनाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी खास बाब म्हणून घरबांधणी, घर दुरूस्ती परवानगीचे अधिकार आता पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतींनाच देण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने यासाठी आमदार वैभव नाईक हे राज्य शासनाकडे पाठपुरावा करत होते. त्याला यश आले आहे. त्यामुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.२0१४ सालापूर्वी कोकणात घरबांधणी आणि घरदुरूस्तीच्या परवानगीचे अधिकार ग्रामपंचायतींना होते. मात्र त्यानंतर हे अधिकार ग्रापंचायतकडून काढून घेऊन तालुकास्तरावर तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले होते. त्यासाठी काही जाचक अटींची पूर्तताही करावी लागत होती. मात्र कोकणवासियांसाठी हा निर्णयच जाचक ठरत होता. याबाबत आमदार वैभव नाईक यांनी सातत्याने राज्यशासनाकडे पाठपुरावा करत घरबांधणी परवानगीचे अधिकार पूर्ववत ग्रामपंचायतकडे देण्याची मागणी केली होती.

राज्याच्या इतर भागात गावठाण क्षेत्र आहे. मात्र रत्नागिरी, सिंधुदुर्गात गावठाण क्षेत्र नाही. ज्याप्रमाणे कुळवहिवाटीच्या जमिनींकरीता रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी वेगळा निर्णय घेण्यात आला होता, तोच आधार घेऊन ग्रामपंचायतींना पूर्ववत घरबांधणी परवानगीचे अधिकार देण्यात आले आहेत.आमदार वैभव नाईक यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्याशी बैठक घेऊन पाठपुरावा केला होता. या बैठकीला महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता हे ही उपस्थित होते.प्राधिकरण ग्रामपंचायत सोडून निर्णय लागूरत्नागिरी, सिंधुदुर्गातील लोकांना ग्रामपंचायत स्तरावरच घरबांधणीची परवानगी मिळणे कसे आवश्यक आहे ही बाब आमदार नाईक यांनी मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना पटवून दिली होती. कोकणवासियांची ही महत्त्वपूर्ण मागणी लक्षात घेऊन आता पूर्ववत ग्रामपंचायतना घरबांधणी परवानगीचे अधिकार देण्यात आले आहेत. प्राधिकरण ग्रामपंचायत सोडून अन्य ग्रापंचायतींना हा निर्णय लागू होणार आहे. या निर्णयाची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.

टॅग्स :Homeघरsindhudurgसिंधुदुर्गVaibhav Naikवैभव नाईक