शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

सिंधुदुर्ग : वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी भागवत वेळेत उपस्थित नसल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 15:40 IST

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नियुक्त केलेले डॉ. तुषार भागवत कधीही वेळेत उपलब्ध नसतात. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात तासन्तास रुग्ण ताटकळत बसल्याचे चित्र नेहमी पहायला मिळते. वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी रुग्णांच्या सुरू असलेल्या हेळसांडीकडे लक्ष द्यायला तालुक्यातील लोकप्रतिनिधींना वेळ नसल्याचे या प्रकारातून स्पष्ट होऊ लागले आहे.

ठळक मुद्दे वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील चित्र डॉ. तुषार भागवत वेळेत उपस्थित नसल्याचा परिणामलोकप्रतिनिधींचे दुर्लक्षतक्रारींकडे दुर्लक्ष, गोरगरीब रुग्णांना डॉक्टरची प्रतीक्षा!

प्रकाश काळे 

वैभववाडी : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नियुक्त केलेले डॉ. तुषार भागवत कधीही वेळेत उपलब्ध नसतात. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात तासन्तास रुग्ण ताटकळत बसल्याचे चित्र नेहमी पहायला मिळते. वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी रुग्णांच्या सुरू असलेल्या हेळसांडीकडे लक्ष द्यायला तालुक्यातील लोकप्रतिनिधींना वेळ नसल्याचे या प्रकारातून स्पष्ट होऊ लागले आहे.शासनाने राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यातील सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यांची प्रायोगिक तत्त्वावर निवड केली आहे. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामीण रुग्णालयांमधील नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यांव्यतिरिक्त या कार्यक्रमांतर्गत तज्ज्ञ खासगी वैद्यकीय अधिकारी नियुक्त केले असून त्यांना बाह्यरुग्ण तपासणीसाठी दरमहा सुमारे ४५ रुपये शासन मोबदला देत आहे.

त्यांचा बाह्यरुग्ण तपासणीचा कालावधी सकाळी १० ते सायंकाळी ५ आहे. परंतु, गेल्या दोन महिन्यांत डॉ. भागवत एकदाही पूर्णवेळ रुग्णालयात थांबले नसल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. डॉ. भागवत वेळेवर रुग्णालयात उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या रुग्णांची हेळसांड टाळण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नवनाथ कांबळे सर्व रुग्ण तपासत होते.

परंतु, डॉ. भागवत नेहमीच ११ च्या सुमारास रुग्णालयात येऊ लागल्यामुळे डॉ. कांबळे यांनी डॉ. भागवत यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना तपासणे बंद केले आहे. त्यामुळे गेल्या १५ ते २० दिवसांपासून सकाळी ९ वाजता रुग्णालयात येणारे गोरगरीब रुग्ण डॉ. भागवत यांच्या प्रतीक्षेत ताटकळत बसल्याचे चित्र दररोज पहायला मिळत आहे.राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांनी त्रस्त रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करणे शासनाला अपेक्षित आहे. परंतु, डॉ. भागवत यांची रुग्णालयात सोयीने जेमतेम तासभर उपस्थिती दिसते. मात्र, त्यांच्या कार्यपद्धतीकडे कुणीही लोकप्रतिनिधी गांभिर्याने लक्ष द्यायला तयार नसल्याने रुग्णांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याबाबत योग्य उपाययोजना करण्याची मागणीही होत आहे.जमादारांवर आरोग्य खाते मेहेरबानवैभववाडी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदाची सूत्रे डॉ. मौलाना जमादार यांनी जानेवारी २०१७ मध्ये हाती घेतली. तेव्हापासून ते एकदाही तालुक्यातील रुग्णांच्या किंवा अन्य जनतेच्या नजरेस पडलेले नाहीत. नाही म्हणायला पगारासाठी किंवा कार्यालयीन सभेसाठी ग्रामीण रुग्णालयात नाहीतर ओरोसला ते हजेरी लावतात. त्यांचे वर्षभर नेमणुकीच्या ठिकाणी नसणे जिल्हा शल्य चिकित्सकांनाही माहीत आहे. तरीही रुग्णालयातून आॅनड्युटी वर्षभर गायब असलेल्या डॉ. जमादार यांच्यावर आरोग्य खाते मेहेरबान असल्याने त्यांचा पगार त्यांना वेळच्यावेळी मिळत आहे.

तक्रारींकडे दुर्लक्षडॉ. तुषार भागवत शासनाने नेमून दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत नसल्याबद्दल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नवनाथ कांबळे यांनी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मौलाना जमादार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. परंतु, व्यक्तिगत हितसंबंधांमुळे डॉ. भागवत यांच्याबाबतीत कारवाईचे पाऊल उचलण्यास डॉ. जमादार टाळाटाळ करीत असल्याची रुग्णालय प्रशासनात कुजबुज आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhospitalहॉस्पिटल