शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

सिंधुदुर्ग : वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी भागवत वेळेत उपस्थित नसल्याचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 15:40 IST

राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नियुक्त केलेले डॉ. तुषार भागवत कधीही वेळेत उपलब्ध नसतात. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात तासन्तास रुग्ण ताटकळत बसल्याचे चित्र नेहमी पहायला मिळते. वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी रुग्णांच्या सुरू असलेल्या हेळसांडीकडे लक्ष द्यायला तालुक्यातील लोकप्रतिनिधींना वेळ नसल्याचे या प्रकारातून स्पष्ट होऊ लागले आहे.

ठळक मुद्दे वैभववाडी ग्रामीण रुग्णालयातील चित्र डॉ. तुषार भागवत वेळेत उपस्थित नसल्याचा परिणामलोकप्रतिनिधींचे दुर्लक्षतक्रारींकडे दुर्लक्ष, गोरगरीब रुग्णांना डॉक्टरची प्रतीक्षा!

प्रकाश काळे 

वैभववाडी : राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नियुक्त केलेले डॉ. तुषार भागवत कधीही वेळेत उपलब्ध नसतात. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयात तासन्तास रुग्ण ताटकळत बसल्याचे चित्र नेहमी पहायला मिळते. वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी रुग्णांच्या सुरू असलेल्या हेळसांडीकडे लक्ष द्यायला तालुक्यातील लोकप्रतिनिधींना वेळ नसल्याचे या प्रकारातून स्पष्ट होऊ लागले आहे.शासनाने राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यातील सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यांची प्रायोगिक तत्त्वावर निवड केली आहे. त्यानुसार गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामीण रुग्णालयांमधील नियमित वैद्यकीय अधिकाऱ्यांव्यतिरिक्त या कार्यक्रमांतर्गत तज्ज्ञ खासगी वैद्यकीय अधिकारी नियुक्त केले असून त्यांना बाह्यरुग्ण तपासणीसाठी दरमहा सुमारे ४५ रुपये शासन मोबदला देत आहे.

त्यांचा बाह्यरुग्ण तपासणीचा कालावधी सकाळी १० ते सायंकाळी ५ आहे. परंतु, गेल्या दोन महिन्यांत डॉ. भागवत एकदाही पूर्णवेळ रुग्णालयात थांबले नसल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे. डॉ. भागवत वेळेवर रुग्णालयात उपलब्ध होत नसल्याने त्यांच्या रुग्णांची हेळसांड टाळण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नवनाथ कांबळे सर्व रुग्ण तपासत होते.

परंतु, डॉ. भागवत नेहमीच ११ च्या सुमारास रुग्णालयात येऊ लागल्यामुळे डॉ. कांबळे यांनी डॉ. भागवत यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना तपासणे बंद केले आहे. त्यामुळे गेल्या १५ ते २० दिवसांपासून सकाळी ९ वाजता रुग्णालयात येणारे गोरगरीब रुग्ण डॉ. भागवत यांच्या प्रतीक्षेत ताटकळत बसल्याचे चित्र दररोज पहायला मिळत आहे.राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांनी त्रस्त रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करणे शासनाला अपेक्षित आहे. परंतु, डॉ. भागवत यांची रुग्णालयात सोयीने जेमतेम तासभर उपस्थिती दिसते. मात्र, त्यांच्या कार्यपद्धतीकडे कुणीही लोकप्रतिनिधी गांभिर्याने लक्ष द्यायला तयार नसल्याने रुग्णांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याबाबत योग्य उपाययोजना करण्याची मागणीही होत आहे.जमादारांवर आरोग्य खाते मेहेरबानवैभववाडी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदाची सूत्रे डॉ. मौलाना जमादार यांनी जानेवारी २०१७ मध्ये हाती घेतली. तेव्हापासून ते एकदाही तालुक्यातील रुग्णांच्या किंवा अन्य जनतेच्या नजरेस पडलेले नाहीत. नाही म्हणायला पगारासाठी किंवा कार्यालयीन सभेसाठी ग्रामीण रुग्णालयात नाहीतर ओरोसला ते हजेरी लावतात. त्यांचे वर्षभर नेमणुकीच्या ठिकाणी नसणे जिल्हा शल्य चिकित्सकांनाही माहीत आहे. तरीही रुग्णालयातून आॅनड्युटी वर्षभर गायब असलेल्या डॉ. जमादार यांच्यावर आरोग्य खाते मेहेरबान असल्याने त्यांचा पगार त्यांना वेळच्यावेळी मिळत आहे.

तक्रारींकडे दुर्लक्षडॉ. तुषार भागवत शासनाने नेमून दिलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत नसल्याबद्दल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नवनाथ कांबळे यांनी रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मौलाना जमादार यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. परंतु, व्यक्तिगत हितसंबंधांमुळे डॉ. भागवत यांच्याबाबतीत कारवाईचे पाऊल उचलण्यास डॉ. जमादार टाळाटाळ करीत असल्याची रुग्णालय प्रशासनात कुजबुज आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhospitalहॉस्पिटल