शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

सिंधुदुर्ग : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आठ हजार निवेदन सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 18:27 IST

मराठा आरक्षणासंदर्भात जाहीर सुनावणी घेण्यासाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या समितीला अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सिंधुदुर्ग शाखेच्यावतीने बुधवारी सुमारे आठ हजारच्यावर निवेदने देण्यात आली. कुणबी-मराठा समाजाला इतर मागासवर्गात आरक्षण देण्यात आले आहे. त्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे मराठा समाजाला आरक्षण द्यावे, आठ हजार निवेदन सादर  महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या समितीकडे मागणी

सिंधुदुर्गनगरी : मराठा आरक्षणासंदर्भात जाहीर सुनावणी घेण्यासाठी जिल्ह्यात दाखल झालेल्या महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या समितीला अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सिंधुदुर्ग शाखेच्यावतीने बुधवारी सुमारे आठ हजारच्यावर निवेदने देण्यात आली. कुणबी-मराठा समाजाला इतर मागासवर्गात आरक्षण देण्यात आले आहे. त्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक मागासलेपणाची माहिती घेऊन मराठा समाजाचा इतर मागास प्रवर्गात समावेश करण्यासाठी शासनाने राज्य मागास आयोगाचे गठन केले आहे. यामार्फत प्रत्येक जिल्ह्यात आयोगाच्या समितीमार्फत सुनावणी घेण्यात येत आहे. बुधवारी जिल्ह्यात सुनावणी घेण्यात आली. सिंधुदुर्गनगरी येथील विश्रामगृहावर सकाळपासून या समितीमार्फत निवेदने घेण्यास सुरुवात केली होती.

सेवानिवृत्त न्यायाधीश एम. जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अकरा सदस्यांची समिती जिल्ह्यात दाखल झाली असून यात सचिव डी. डी. देशमुख, सर्जेराव निमसे, डॉ. दत्तात्रय बाळसराफ, चंद्रशेखर देशपांडे, प्रमोद येवले, रोहिदास जाधव, सुधीर ठाकरे, डॉ. सुवर्णा रावळ, राजाभाऊ कर्पे, डॉ. भूषण कार्डिले, संशोधन अधिकारी कैलास ओढे व एन. व्ही. जोशी यांचा समावेश आहे. या समितीने मराठा आरक्षण का मिळावे, ते का गरजेचे आहे याबाबतची निवेदने स्वीकारली.यावेळी सिंधुदुर्ग मराठा समाजाच्यावतीने निवेदने देण्यात आली. या निवेदनात मराठा समाज पूर्वापारपासून कसा मागास राहिला याचे सोदाहरण स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

सिंधुदुर्गात पारंपरिक पद्धतीने शेती करणाऱ्या मराठ्यांची संख्या मोठी आहे. तसेच त्यांनी व्यापारी तत्त्वावर शेती केली नाही. सिंधुदुर्गात मराठा समाजात शैक्षणिक दुरवस्थाही होती. त्याचे मूळ कारण आर्थिक मागासलेपणातच आहे. गरिबीमुळे मराठा समाजाची मुले शिक्षणही घेऊ शकलेली नाहीत. आजही अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत.

जिल्ह्यातील अनेक मराठा पुरुष माणसे ही कामासाठी मुंबई, पुण्यात आहेत. त्यामुळे त्यांच्या पत्नी येथे घरकाम करून उपजीविका करतात. पूर्वापारपासून मराठा व कुणबी यांनी एकत्र काम केले आहे. कुणबी समाजाला इतर मागास वर्गात आरक्षण दिले आहे. आतापर्यंत कुणबी-मराठा अशी जातच इतर मागास प्रवर्गासाठी गृहीत धरली आहे. त्याप्रमाणेच मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात आली.बुधवारी सकाळपासूनच निवेदने देण्यासाठी सिंधुदुर्गनगरीतील विश्रामगृहावर मराठा समाजाच्या लोकांनी गर्दी केली होती. मराठा महासंघाचे सुरेंद्र पवार, आमदार वैभव नाईक यांच्यासह मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुहास सावंत, प्रभाकर सावंत, सुशांत नाईक, बंड्या सावंत, जयभारत पालव, संजय लाड आदी शेकडो मराठा बांधव उपस्थित होते.आरक्षण न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा४१९०६ च्या इतिहास दस्तऐवजात मराठा समाज ३.८ टक्के, भंडारी समाज ३.७ टक्के आणि वाणी समाज ११.४ टक्के अशी नोंद आहे. वाणी समाजाची टक्केवारी जास्त असतानाही हा समाज इतर मागास प्रवर्गात मोडतो आणि आरक्षण मिळते. मग मराठा समाजाची टक्केवारी कमी असतानाही या समाजाला आरक्षण का मिळत नाही? असा प्रश्नही या आयोगाला सकल मराठा समाजाच्यावतीने अ‍ॅड. सुहास सावंत यांनी केला.मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा संघटना प्रयत्न करीत असताना आपणही शासन स्तरावर प्रयत्न करीत आहोत. मात्र शासन आरक्षण देण्यासंदर्भात कोणतीही दखल घेत नाही. त्यामुळे आपण मानसिकदृष्ट्या हतबल झालो असून १९ फेब्रुवारी २0१९ पूर्वी मराठा समाजाला २५ टक्के आरक्षण न मिळाल्यास आपण १९ फेब्रुवारी २0१९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा कणकवली तालुक्यातील लवू महादेव वारंग यांनी संबंधित आयोग जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गmarathaमराठा