शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

सिंधुदुर्ग : अन्यायाविरोधात नवीन पिढी घडवा  : राजेंद्र कोंढरे, मराठा समाज कर्मचारी बांधवांचा मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 17:17 IST

मराठा समाजाने मागचा इतिहास सांगत न बसता वर्तमानातील नावीन्यपूर्ण बदल स्वीकारून स्पर्धेत टिकणारी व अन्यायाविरोधात आवाज उठविणारी नवीन पिढी घडवावी, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राज्य सरचिटणीस राजेंद्र्र कोंढरे यांनी येथे आयोजित कुडाळ तालुका मराठा समाज कर्मचारी बांधवांच्या स्नेहमेळाव्यात केले.

ठळक मुद्दे अन्यायाविरोधात नवीन पिढी घडवा  : राजेंद्र कोंढरे कुडाळ तालुका मराठा समाज कर्मचारी बांधवांच्या मेळाव्यात प्रतिपादन

कुडाळ : मराठा समाजाने मागचा इतिहास सांगत न बसता वर्तमानातील नावीन्यपूर्ण बदल स्वीकारून स्पर्धेत टिकणारी व अन्यायाविरोधात आवाज उठविणारी नवीन पिढी घडवावी, असे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघाचे राज्य सरचिटणीस राजेंद्र्र कोंढरे यांनी येथे आयोजित कुडाळ तालुका मराठा समाज कर्मचारी बांधवांच्या स्नेहमेळाव्यात केले. शासकीय सेवेतील मराठा समाजाच्या कर्मचाऱ्यांवरील अन्यायाविरोधात संघटित होऊन आवाज उठविण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. अखिल भारतीय मराठा महासंघाच्यावतीने मराठा समाजातील शासकीय सेवेतील कर्मचारी बांधव-भगिनींचा स्नेहमेळावा येथील मराठा समाज सभागृहात आयोजित केला होता. यावेळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. सुहास सावंत, प्रा. अविनाश ताकवले, सूर्यकांत वारंग, धीरज परब, दादा साईल, रेखा राऊळ, वासुदेव नाईक आदी उपस्थित होते.यावेळी कोंढरे म्हणाले, कोपर्डी घटनेनंतर मराठा समाजबांधव एकत्र झाला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी तसेच इतर मागण्यांसाठी विविध आंदोलने सुरू आहेत. समाजाला आरक्षण मिळणे ही काळाची गरज आहे. समाजातील शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांच्या समस्या तसेच शासकीय सेवेत समाजाला यापुढे निर्माण होणारे प्रश्न व समस्यांविरोधात आवाज उठविण्यासाठी संघटित होण्याची गरज आहे. संघटन, ताकद, बुद्धी, तंत्रज्ञान, विज्ञान या सर्व गोष्टींचा वापर करून आपण या विरोधात आवाज उठविला पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने न्याय मिळेल.आज जो समाज संघटित होऊन आणि वस्तुस्थिती स्वीकारून नावीन्यपूर्ण शिक्षण घेत आहे, तो समाज सक्षम ठरत आहे. त्यामुळे आपणही याचा स्वीकार केला पाहिजे, असेही कोंढरे म्हणाले. मराठा समाजातील शासकीय सेवेतील कर्मचारी बांधवांना कोणताही त्रास होऊ नये तसेच शासन निर्णयाचा चुकीच्या पद्धतीने वापर होऊ नये, यासाठी शासनस्तरावर खुला प्रवर्ग कक्षाची स्थापना होण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. मराठा समाजातील प्रश्न आणि शासन निर्णयांवर अभ्यास करण्यासाठी समाजाचा निवृत्त कक्ष स्थापन केला पाहिजे, असे कोंढरे यांनी सांगितले.शासन यंत्रणेत बिंदू नामावली पदोन्नती प्रक्रियेत घोळ आहे. त्यामुळे शासकीय सेवेत काम करणाऱ्या समाज बांधवांना अनेक प्रश्न व समस्यांना सामोरे जावे लागत असून, काहीजण त्यांना नाहक त्रास देत आहेत. या विरोधात जागृत होऊन लढले पाहिजे.  बदलत्या तंत्रज्ञानानुसार आपल्या मुलांना नावीन्यपूर्ण शिक्षण दिले पाहिजे. एमपीएससी तसेच इतर स्पर्धा परीक्षा प्रणाली लक्षात घेतली पाहिजे. प्रशासकीय साक्षरतेचे ज्ञान आत्मसात करा. वेगवेगळ््या उपक्रमांमध्ये सहभाग घ्या,  आर्थिक सक्षम बना, असे आवाहन कोंढरे यांनी केले. आरक्षण नसल्यामुळे मराठा समाजाचे बरेच विद्यार्थी गुणवत्ता असूनही उच्च शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे आरक्षण मिळण्यासाठी व आपल्या समाजातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी लढत राहणार असल्याचे दादा साईल यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील मराठा समाजातील शासकीय कर्मचारी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्याम सावंत यांनी केले.संघटित होऊन लढा देणार : सुहास सावंतआता तलवारीची भाषा करून उपयोग नाही. आपण लोकशाही स्वीकारली आहे. त्यामुळे आपली लढाई संघटित होऊन ताकद व बुद्धीचा वापर करूनच लढली पाहिजे, असे अ‍ॅड. सुहास सावंत यांनी सांगितले. जिल्ह्यातील शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या मराठा  समाज बांधवांवर अन्याय झाल्यास संघटित होऊन लढा देणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. मराठा समाज आरक्षणाचा निर्णय होईल. मात्र आरक्षण देताना इतर कोणत्याच आरक्षित समाजावर अन्याय होता नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. तसेच घटनात्मक व चौकटीत टिकणारेच आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाज आग्रही आहे. तरच आरक्षणाचा उपयोग होणार आहे, असे राजेंद्र कोंढरे यांनी सांगितले. 

टॅग्स :marathaमराठाsindhudurgसिंधुदुर्ग