शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : बहुजन क्रांती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 16:46 IST

कोरेगाव-भीमा येथील दंगलीस कारणीभूत असलेल्यांना पोलीस व राज्य शासनाकड़ून संरक्षण देऊन जातीय वैमनस्य निर्माण करणाऱ्या राज्य सरकार व पोलीस प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.

ठळक मुद्देबहुजन क्रांती मोर्चातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनचुकीच्या धोरणाविरोधात आंदोलन राज्यशासन जातीय वैमनस्य निर्माण करतेय....

सिंधुदुर्गनगरी : कोरेगाव-भीमा येथील दंगलीस कारणीभूत असलेल्यांना पोलीस व राज्य शासनाकड़ून संरक्षण देऊन जातीय वैमनस्य निर्माण करणाऱ्या राज्य सरकार व पोलीस प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना सादर करण्यात आले. यावेळी बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीचे अ‍ॅड. एस. व्ही. कांबळे, व्ही. बी. जाधव, प्रसाद जळवी, चेतन जाधव, शैलेश कदम, मनोज जाधव, सचिन जाधव आदी समाज बांधव उपस्थित होते.राज्य शासनाच्या आणि पोलीस प्रशासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीच्यावतीने धरणे आंदोलन छेडण्यात आले. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते.राज्यशासन जातीय वैमनस्य निर्माण करतेय....द्विशताब्दी वर्षानिमित्त १ जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा रणसंग्रामातील शहिदांना सलामी देण्यासाठी जमलेल्या जमावावर भ्याड हल्ला झाला होता. मात्र हल्ल्याला कारणीभूत असणाऱ्यांना पोलीस अटक करत नाहीत, उलट त्यांना संरक्षण दिले जात आहे.

शांततापूर्वक निषेधार्थ बंद पाळणाऱ्या लोकांवर खोटे गुन्हे दाखल करणे, कोंम्बिंग आॅपरेशनच्याद्वारे पोलीस व राज्य शासनातर्फे निरपराध तरुणांवर अटक सत्र चालविणे, या भ्याड हल्ल्यात बळी ठरलेल्या लोकांच्या तक्रारी पोलिसांकडून दाखल करून न घेणे तसेच या हल्ल्यास कारणीभूत असलेल्या व्यक्तींना राज्य शासन व पोलीस यंत्रणा संरक्षण देऊन जातीय वैमनस्य निर्माण करत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गcollectorतहसीलदार