शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सिंधुदुर्ग : नाटळ शाळेचा भाग कोसळला, संततधार पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 15:07 IST

सतत तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे केंद्रशाळा नाटळ राजवाडीच्या खोलीचा काही भाग रात्री अचानक कोसळला. परंतु, कुठलीही जीवितहानी झाली नाही. रात्रीची वेळ असल्याने अनर्थ टळला. 

ठळक मुद्दे नाटळ शाळेचा भाग कोसळला, संततधार पावसाचा फटका रात्रीची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला

कनेडी : सतत तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे केंद्रशाळा नाटळ राजवाडीच्या खोलीचा काही भाग रात्री अचानक कोसळला. परंतु, कुठलीही जीवितहानी झाली नाही. रात्रीची वेळ असल्याने अनर्थ टळला. या शाळेत प्राथमिकचे पहिली ते चौथी व अंगणवाडीचे वर्ग चालविले जातात. शाळा रस्त्याच्या बाजूलाच असल्याने रहदारी जास्त आहे. केंद्रप्रमुख, दोन शिक्षक येथे कार्यरत आहेत. पूर्वी सातवीपर्यंत असलेल्या या शाळेमध्ये सात वर्ग होते. सध्या विद्यार्थी संख्या कमी झाल्याने या शाळेत पहिली ते चौथीचेच वर्ग सुरू आहेत.

बाकीचे वर्ग नादुरूस्त आहेत. हे नादुरूस्त वर्ग पडण्याच्या स्थितीत आहेत. शाळा व्यवस्थापन समितीने हे वर्ग निर्लेखित करण्यासंदर्भात बांधकाम तसेच शिक्षण विभागाला गेल्यावर्षी ठराव दिला होता. परंतु, सुशेगात असणाऱ्या शासनाने दखल न घेतल्याने ही घटना घडली असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.गावाच्या मध्यभागी असलेल्या या शाळेच्या तीन वर्गखोल्यांचे दोन वर्षांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले आहे. सध्या याच वर्गात विद्यार्थ्यांना बसविण्यात येते. केंद्रबलाचे केंद्रप्रमुख याच शाळेमध्ये बसतात. शाळेच्या आवारात अंगणवाडी असल्याने विद्यार्थ्यांबरोबरच पालकांची रेलचेल येथे असते. विद्यार्थी शाळेत जेथून प्रवेश करतात त्या प्रवेशद्वारावरच हा अपघात घडला आहे.शासन बेफिकीरही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने मोठा अनर्थ टळला. सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी याची पाहणी केली. शासनाच्या बेफिकीरीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. संभाव्य अपघाताची शक्यता ओळखून गेल्यावर्षी या खोल्यांचे निर्लेखन करण्यासंदर्भाचे पत्र संबंधित खात्याला देण्यात आले होते. परंतु, बेफिकीर राहिलेल्या शासनाने त्याची दखल घेतली नाही.

शासनाच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडली आहे. अपघात रात्रीच्यावेळी घडल्याने जीवितहानी झाली नाही. मोठा अनर्थ टळला. नादुरूस्त वर्ग तत्काळ निर्लेखित न केल्यास आपल्या मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचा इशारा पालकांनी दिला आहे. 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Schoolशाळाsindhudurgसिंधुदुर्ग