शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सिंधुदुर्ग : नाटळ शाळेचा भाग कोसळला, संततधार पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 15:07 IST

सतत तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे केंद्रशाळा नाटळ राजवाडीच्या खोलीचा काही भाग रात्री अचानक कोसळला. परंतु, कुठलीही जीवितहानी झाली नाही. रात्रीची वेळ असल्याने अनर्थ टळला. 

ठळक मुद्दे नाटळ शाळेचा भाग कोसळला, संततधार पावसाचा फटका रात्रीची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला

कनेडी : सतत तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे केंद्रशाळा नाटळ राजवाडीच्या खोलीचा काही भाग रात्री अचानक कोसळला. परंतु, कुठलीही जीवितहानी झाली नाही. रात्रीची वेळ असल्याने अनर्थ टळला. या शाळेत प्राथमिकचे पहिली ते चौथी व अंगणवाडीचे वर्ग चालविले जातात. शाळा रस्त्याच्या बाजूलाच असल्याने रहदारी जास्त आहे. केंद्रप्रमुख, दोन शिक्षक येथे कार्यरत आहेत. पूर्वी सातवीपर्यंत असलेल्या या शाळेमध्ये सात वर्ग होते. सध्या विद्यार्थी संख्या कमी झाल्याने या शाळेत पहिली ते चौथीचेच वर्ग सुरू आहेत.

बाकीचे वर्ग नादुरूस्त आहेत. हे नादुरूस्त वर्ग पडण्याच्या स्थितीत आहेत. शाळा व्यवस्थापन समितीने हे वर्ग निर्लेखित करण्यासंदर्भात बांधकाम तसेच शिक्षण विभागाला गेल्यावर्षी ठराव दिला होता. परंतु, सुशेगात असणाऱ्या शासनाने दखल न घेतल्याने ही घटना घडली असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.गावाच्या मध्यभागी असलेल्या या शाळेच्या तीन वर्गखोल्यांचे दोन वर्षांपूर्वी नूतनीकरण करण्यात आले आहे. सध्या याच वर्गात विद्यार्थ्यांना बसविण्यात येते. केंद्रबलाचे केंद्रप्रमुख याच शाळेमध्ये बसतात. शाळेच्या आवारात अंगणवाडी असल्याने विद्यार्थ्यांबरोबरच पालकांची रेलचेल येथे असते. विद्यार्थी शाळेत जेथून प्रवेश करतात त्या प्रवेशद्वारावरच हा अपघात घडला आहे.शासन बेफिकीरही घटना रात्रीच्या वेळी घडल्याने मोठा अनर्थ टळला. सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी याची पाहणी केली. शासनाच्या बेफिकीरीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. संभाव्य अपघाताची शक्यता ओळखून गेल्यावर्षी या खोल्यांचे निर्लेखन करण्यासंदर्भाचे पत्र संबंधित खात्याला देण्यात आले होते. परंतु, बेफिकीर राहिलेल्या शासनाने त्याची दखल घेतली नाही.

शासनाच्या निष्काळजीपणामुळेच ही घटना घडली आहे. अपघात रात्रीच्यावेळी घडल्याने जीवितहानी झाली नाही. मोठा अनर्थ टळला. नादुरूस्त वर्ग तत्काळ निर्लेखित न केल्यास आपल्या मुलांना शाळेत पाठविणार नसल्याचा इशारा पालकांनी दिला आहे. 

टॅग्स :monsoon 2018मान्सून 2018Schoolशाळाsindhudurgसिंधुदुर्ग