शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

सिंधुदुर्ग  : पाळये, घोटगेवाडीत हत्तींचा थरार, ग्रामस्थांनी ढोल वाजवत वन्य प्राण्यांना पिटाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 15:50 IST

गेल्या दोन दिवसांपासून पाळये व घोटगेवाडीत हैदोस घालणाऱ्या जंगली हत्तींना सोमवारी रात्री पाळये व घोटगेवाडी ग्रामस्थांनी जीवावर उदार होत तिलारीच्या जलाशयातून पिटाळून लावण्यात यश मिळविले. हत्तींना पिटाळण्यासाठी ढोल वाजविणारे ग्रामस्थ आणि त्यांच्या अंगावर अधूनमधून धावून जाणारा हत्तींचा कळप असा थरार सोमवारी रात्रभर सुरू होता.

ठळक मुद्देतिलारी खोऱ्यात पाळये, घोटगेवाडीत हत्तींचा थरार ग्रामस्थांनी ढोल वाजवत वन्य प्राण्यांना पिटाळले

दोडामार्ग : गेल्या दोन दिवसांपासून पाळये व घोटगेवाडीत हैदोस घालणाऱ्या जंगली हत्तींना सोमवारी रात्री पाळये व घोटगेवाडी ग्रामस्थांनी जीवावर उदार होत तिलारीच्या जलाशयातून पिटाळून लावण्यात यश मिळविले. हत्तींना पिटाळण्यासाठी ढोल वाजविणारे ग्रामस्थ आणि त्यांच्या अंगावर अधूनमधून धावून जाणारा हत्तींचा कळप असा थरार सोमवारी रात्रभर सुरू होता.तिलारी खोऱ्यात गेल्या वर्षभरापासून नुकसान करणाऱ्या जंगली हत्तींचा कळप दोन दिवसांपासून घोटगेवाडी व पाळये येथे ठाण मांडून आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

वनविभाग हत्तींचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरल्याने ग्रामस्थ व शेतकरी रात्रीच्यावेळी हत्तींना पिटाळण्यासाठी गस्त घालत आहेत. सोमवारी रात्री दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर हत्तींना तिलारीच्या जलाशयातून पिटाळण्यात ग्रामस्थांना यश आले.तिलारीतून पाळये व तेथून पुढे घोटगेवाडी असा हत्तींचा नेहमीचा प्रवास असल्याने पाळयेतील ग्रामस्थ शिवराम गवस, संदेश वरक, लिंंगाजी गवस, गोपाळ पंडित, देवजी सावंत, विनायक सावंत, वैभव गवस, मायकल लोबो, वनकर्मचारी लोकरे यांनी पाळये गावाच्या सीमेवर, तर घोटगेवाडीच्या सीमेवर उपसरपंच भालचंद्र कुडव, संतोष दळवी, सिध्दार्थ चव्हाण, गुरूदास दळवी, कमलेश पर्येकर, अतुल कर्पे, परेश धुरी आदी ग्रामस्थांनी जोरजोराने ढोल वाजविण्यास सुरूवात केली.

त्यामुळे बिथरलेल्या तीन हत्तींच्या कळपाने ग्रामस्थांच्या अंगावर धावून जाण्यास सुरूवात केली. बराच वेळ हा थरार सुरू होता. अखेर शेतकरी आणि हत्ती यांच्या या संघर्षात शेतकऱ्यांचा विजय झाला. मात्र पुन्हा हत्ती या भागात परतण्याची शक्यता असल्याने हत्तीपकड मोहीम राबविण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गforestजंगल