शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

सिंधुदुर्ग : अन्यथा जिल्ह्याच्या राजकारणातून संन्यास घेणार : प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 17:14 IST

आमदार नीतेश राणे यांनी दिलेले आव्हान आम्ही स्वीकारले असून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून न आल्यास जिल्ह्यातील राजकारणातून मी संन्यास घेईन.असे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यानी येथे जाहिर केले.

ठळक मुद्देअन्यथा जिल्ह्याच्या राजकारणातून संन्यास घेणार  प्रमोद जठार यांचे प्रतिपादन

कणकवली : आगामी विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदार संघातून भाजपकडून संदेश पारकर यानाच उमेदवारी द्यावी.अशी मागणी पक्षाजवळ मी केली आहे. पारकर यांना निवडून आणण्याची जबाबदारी मी घ्यायला तयार असल्याचेही सांगितले आहे. यानिमित्ताने आमदार नीतेश राणे यांनी दिलेले आव्हान आम्ही स्वीकारले असून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून न आल्यास जिल्ह्यातील राजकारणातून मी संन्यास घेईन, असे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यानी येथे जाहिर केले.येथील भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा चिटणीस रविंद्र शेट्ये, समर्थ राणे उपस्थित होते. प्रमोद जठार पुढे म्हणाले, कणकवली नगरपंचायत निवडणुकीबाबत नगरविकास मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपची चिंतन बैठक झाली.

यावेळी निवडणुकी दरम्यान झालेल्या चुका, त्रुटी दूर करून जोमाने ' कमबॅक' करण्याचा निर्धार सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यानी केला. यावेळी कार्यकर्त्यांच्यावतीने मंत्री रविंद्र चव्हाण यांना मी विनंती केली की, संदेश पारकर यांनाच कणकवली विधानसभा मतदार संघातून भाजपच्यावतीने उमेदवारी देण्यात यावी.

ही विनंती मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मान्य केली आहे. तसेच याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी बोलतो असे सांगितले आहे. त्याचबरोबर निवडणुकीच्या अनुषंगाने कणकवली- वैभववाडी- देवगड या विधानसभा मतदार संघाच्या प्रभारीपदी संदेश पारकर यांची नियुक्ती त्यांनी केली आहे. तसेच त्याना काम करण्यास सांगितले आहे.कणकवली विधानसभा निवडणुकीत माझा 34 मतानी ज्यावेळी विजय झाला होता.त्यावेळी अपघाताने झालेला आमदार असे मला विरोधक संबोधत होते. मात्र असे संबोधणारे नेते आता स्वाभिमान मध्ये असून या नेत्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्ही तुमच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार माधुरी गायकवाड़ यांचा विश्वासघात करून अवघ्या 37 मतानी नगराध्यक्ष निवडून आणला आहे. याचा विचार करावा, असे विश्वासघातकी राजकारण करण्यापेक्षा आम्हाला कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवून सन्मानपूर्वक झालेला कणकवली नगराध्यक्ष पद निवडणुकीतील पराभव मान्य आहे.भाजप पदाधिकारी तसेच कार्यकर्त्याना या पराभवाचा बदला घ्यायचा असेल तर 2019 मध्ये भाजपचाच आमदार कणकवली विधानसभा मतदार संघात निवडून येईल यासाठी आतापासूनच त्यानी कामाला लागावे. असे माझे त्याना सांगणे आहे.नेत्यांच्या भूल थापाना बळी पडू नका !नाणार येथील शासकीय रिफायनरी प्रकल्प पूर्ण झाल्यास लोकांना पेट्रोल तसेच डिझेल सारख्या पेट्रोकेमिकल उत्पादनांसाठी खासगी उत्पादकांवर अवलंबून रहावे लागणार नाही. त्यामुळे या खासगी उत्पादकांचे मोठे नुकसान होणार आहे.

त्यासाठीच या खासगी लोकांनी दिलेली सुपारी घेवुन विनायक राऊत तसेच नारायण राणे यांच्यासारखे नेते या प्रकल्पाच्या विरोधात आदळ आपट करीत आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून बेरोजगाराना रोजगार मिळाला तर या विरोध करणाऱ्या नेत्यांच्या पक्षाला कार्यकर्तेच मिळणार नाहीत. त्यामुळेच हे नेते विरोधाचे राजकारण करीत आहेत.हा प्रकल्प झाल्यास कोकणातील लोक समृध्द होतील , त्याना पैसे मिळतील त्यामुळे हे लोक धास्तावले आहेत. त्यासाठी कोकणातील लोकांना आमचे आवाहन आहे की, या नेत्यांच्या भूलथापाना बळी पडू नका. तुम्ही स्वतः या प्रकल्पा बाबतची सत्य माहिती समजून घ्या आणि त्यानंतर निर्णय घ्या.असे ही प्रमोद जठार यानी यावेळी सांगितले.किंग अथवा किंगमेकर आम्हाला नको !आम्हाला 'किंग' अथवा 'किंग मेकर 'नको आहेत. सच्चे लोकप्रतिनिधी हवे आहेत. फक्त स्वतःचाच विकास करून स्वतःच्याच मालमत्तेत भर घालणारे लोकप्रतिनिधी नको आहेत. त्यामुळे कणकवलीतील जनतेने आता सावध रहावे. कारण नगरपंचायतीच्या सत्तेत 'किंग' आणि 'किंगमेकर 'आलेले आहेत. शिवसेना - भाजपच्या सहाही नगरसेवकांनी डोळ्यात तेल घालून कणकवली नगरपंचायतीच्या कारभारावर अंकुश ठेवावा.असेही प्रमोद जठार यांनी यावेळी आवाहन केले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारण