शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : अन्यथा जिल्ह्याच्या राजकारणातून संन्यास घेणार : प्रमोद जठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 17:14 IST

आमदार नीतेश राणे यांनी दिलेले आव्हान आम्ही स्वीकारले असून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून न आल्यास जिल्ह्यातील राजकारणातून मी संन्यास घेईन.असे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यानी येथे जाहिर केले.

ठळक मुद्देअन्यथा जिल्ह्याच्या राजकारणातून संन्यास घेणार  प्रमोद जठार यांचे प्रतिपादन

कणकवली : आगामी विधानसभा निवडणुकीत कणकवली मतदार संघातून भाजपकडून संदेश पारकर यानाच उमेदवारी द्यावी.अशी मागणी पक्षाजवळ मी केली आहे. पारकर यांना निवडून आणण्याची जबाबदारी मी घ्यायला तयार असल्याचेही सांगितले आहे. यानिमित्ताने आमदार नीतेश राणे यांनी दिलेले आव्हान आम्ही स्वीकारले असून आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून न आल्यास जिल्ह्यातील राजकारणातून मी संन्यास घेईन, असे भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यानी येथे जाहिर केले.येथील भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा चिटणीस रविंद्र शेट्ये, समर्थ राणे उपस्थित होते. प्रमोद जठार पुढे म्हणाले, कणकवली नगरपंचायत निवडणुकीबाबत नगरविकास मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपची चिंतन बैठक झाली.

यावेळी निवडणुकी दरम्यान झालेल्या चुका, त्रुटी दूर करून जोमाने ' कमबॅक' करण्याचा निर्धार सर्व पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यानी केला. यावेळी कार्यकर्त्यांच्यावतीने मंत्री रविंद्र चव्हाण यांना मी विनंती केली की, संदेश पारकर यांनाच कणकवली विधानसभा मतदार संघातून भाजपच्यावतीने उमेदवारी देण्यात यावी.

ही विनंती मंत्री रविंद्र चव्हाण यांनी मान्य केली आहे. तसेच याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी बोलतो असे सांगितले आहे. त्याचबरोबर निवडणुकीच्या अनुषंगाने कणकवली- वैभववाडी- देवगड या विधानसभा मतदार संघाच्या प्रभारीपदी संदेश पारकर यांची नियुक्ती त्यांनी केली आहे. तसेच त्याना काम करण्यास सांगितले आहे.कणकवली विधानसभा निवडणुकीत माझा 34 मतानी ज्यावेळी विजय झाला होता.त्यावेळी अपघाताने झालेला आमदार असे मला विरोधक संबोधत होते. मात्र असे संबोधणारे नेते आता स्वाभिमान मध्ये असून या नेत्यांना मी सांगू इच्छितो की, तुम्ही तुमच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार माधुरी गायकवाड़ यांचा विश्वासघात करून अवघ्या 37 मतानी नगराध्यक्ष निवडून आणला आहे. याचा विचार करावा, असे विश्वासघातकी राजकारण करण्यापेक्षा आम्हाला कार्यकर्त्यांचा सन्मान ठेवून सन्मानपूर्वक झालेला कणकवली नगराध्यक्ष पद निवडणुकीतील पराभव मान्य आहे.भाजप पदाधिकारी तसेच कार्यकर्त्याना या पराभवाचा बदला घ्यायचा असेल तर 2019 मध्ये भाजपचाच आमदार कणकवली विधानसभा मतदार संघात निवडून येईल यासाठी आतापासूनच त्यानी कामाला लागावे. असे माझे त्याना सांगणे आहे.नेत्यांच्या भूल थापाना बळी पडू नका !नाणार येथील शासकीय रिफायनरी प्रकल्प पूर्ण झाल्यास लोकांना पेट्रोल तसेच डिझेल सारख्या पेट्रोकेमिकल उत्पादनांसाठी खासगी उत्पादकांवर अवलंबून रहावे लागणार नाही. त्यामुळे या खासगी उत्पादकांचे मोठे नुकसान होणार आहे.

त्यासाठीच या खासगी लोकांनी दिलेली सुपारी घेवुन विनायक राऊत तसेच नारायण राणे यांच्यासारखे नेते या प्रकल्पाच्या विरोधात आदळ आपट करीत आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून बेरोजगाराना रोजगार मिळाला तर या विरोध करणाऱ्या नेत्यांच्या पक्षाला कार्यकर्तेच मिळणार नाहीत. त्यामुळेच हे नेते विरोधाचे राजकारण करीत आहेत.हा प्रकल्प झाल्यास कोकणातील लोक समृध्द होतील , त्याना पैसे मिळतील त्यामुळे हे लोक धास्तावले आहेत. त्यासाठी कोकणातील लोकांना आमचे आवाहन आहे की, या नेत्यांच्या भूलथापाना बळी पडू नका. तुम्ही स्वतः या प्रकल्पा बाबतची सत्य माहिती समजून घ्या आणि त्यानंतर निर्णय घ्या.असे ही प्रमोद जठार यानी यावेळी सांगितले.किंग अथवा किंगमेकर आम्हाला नको !आम्हाला 'किंग' अथवा 'किंग मेकर 'नको आहेत. सच्चे लोकप्रतिनिधी हवे आहेत. फक्त स्वतःचाच विकास करून स्वतःच्याच मालमत्तेत भर घालणारे लोकप्रतिनिधी नको आहेत. त्यामुळे कणकवलीतील जनतेने आता सावध रहावे. कारण नगरपंचायतीच्या सत्तेत 'किंग' आणि 'किंगमेकर 'आलेले आहेत. शिवसेना - भाजपच्या सहाही नगरसेवकांनी डोळ्यात तेल घालून कणकवली नगरपंचायतीच्या कारभारावर अंकुश ठेवावा.असेही प्रमोद जठार यांनी यावेळी आवाहन केले.

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारण