शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सिंधुदुर्ग : पालकमंत्री नव्हे , हे तर फक्त घोषणामंत्री !. उपरकरांची दीपक केसरकरांवर टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 16:32 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे फक्त नवनवीन घोषणा करीत असतात. आपण केलेल्या जुन्या घोषणा पूर्ण झाल्या आहेत किंवा नाही याची काहीच माहीती त्याना नसते. त्यामुळे नुसत्या घोषणा करून ते जनतेची फसवणूक करीत आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्री नव्हे , हे तर फक्त घोषणामंत्री ! परशुराम उपरकरांची दीपक केसरकरांवर टिका

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे फक्त नवनवीन घोषणा करीत असतात. आपण केलेल्या जुन्या घोषणा पूर्ण झाल्या आहेत किंवा नाही याची काहीच माहीती त्याना नसते. त्यामुळे नुसत्या घोषणा करून ते जनतेची फसवणूक करीत आहेत. दिपक केसरकर हे पालकमंत्री नसून घोषणा मंत्री झाले असल्याची टिका मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे.येथील संपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, पालकमंत्र्यानी जिल्ह्याच्या विकासाची वाट लावली आहे. पाहुणे असल्यासारखे ते जिल्ह्यात येतात आणि सावंतवाड़ी पुरते मर्यादित रहातात. त्यामुळे ते फक्त सावंतवाड़ी तालुक्याचे पालकमंत्री बनले आहेत. उर्वरित जिल्ह्यातील जनतेबाबत त्याना काही देणे घेणे नाही.दीपक केसरकर यांनी केलेल्या घोषणेबाबत माहितीच्या अधिकारात त्यांच्या कार्यालया जवळ माहिती मागितल्यास संबधित कार्यालया कडून ती उपलब्ध करून घ्या असे सांगितले जाते. याला काय म्हणायचे ?एखाद्या योजनेबद्दल माहिती जाहिर करायची. मात्र, त्या योजनेसाठी निधी वितरित झाला किंवा नाही याची माहिती घ्यायची नाही असे सध्या त्यांचे चालले आहे. त्यांच्या मतदार संघात चोऱ्या, दरोडे , अवैध उत्खनन सुरु आहे. जनतेकडून अर्ध नग्न स्थितीत उपोषण करण्यासारखे मार्ग अवलंबिले जात आहेत. मात्र, त्याचे त्यांना काहीच नाही.जिल्ह्याच्या विकासासाठी 2700 कोटींचा निधी आणला, फ़ूड पार्क उभारणार , चांदा ते बांदा योजना अंतर्गत विविध विकास कामे करणार , मुख्यालय विकासासाठी 25 कोटींचा निधी आणला , तिलारी पाईप लाईन साठी निधी 100 कोटींचा निधी दिला अशा अनेक घोषणा पालकमंत्री केसरकर यांनी केल्या आहेत.

यापैकी प्रत्यक्षात किती निधी उपलब्ध झाला ? याची काहीच माहिती त्यांच्या जवळ अथवा त्यांच्या कार्यालया जवळ नाही. त्यामुळे त्याना जर परिपूर्ण माहिती देता येत नसेल तर फक्त श्रेय घेण्यासाठी घोषणा करून जनतेची फसवणूक करु नये.त्याचबरोबर अशा फसव्य घोषणा करण्यापूर्वी त्यांनी हे लक्षात ठेवावे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही जागरूक लोकप्रतिनिधी आहेत. ते जनतेच्या हितासाठी विविध विषयांची माहिती घेत असतात आणि ती जनतेपुढे मांडत असतात. त्यामुळे पालकमंत्र्यानी नेमका कोणता विकास केला ते जनतेसमोर जाहिर करावे. असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.सर्वच पालकमंत्री फसवणूक करणारे !दीपक केसरकर यांच्या पूर्वी सिंधुदुर्गचे पालकमंत्री असणारेही जनतेची फसवणूक करणारेच होते. सावंतवाड़ी तहसील कार्यालयाच्या कामाची निविदा आठ वर्षापुर्वी काढण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री कोण होते? याची माहिती स्वाभिमान कार्यकर्त्यांनी घ्यावी आणि त्यानंतर आंदोलन करावे.

चीपी विमानतळाच्या कामाचे तिन वेळा उदघाट्न नारायण राणे यानी केले आहे. तरीही या विमानतळावरुन विमान अद्याप उड्डाण करु शकलेले नाही. त्यामुळे सिंधुदुर्गचे सर्वच पालकमंत्री जनतेची फसवणूक करणारे होते.असे स्पष्ट होत असल्याचे परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग