शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

सिंधुदुर्ग : पालकमंत्री नव्हे , हे तर फक्त घोषणामंत्री !. उपरकरांची दीपक केसरकरांवर टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 16:32 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे फक्त नवनवीन घोषणा करीत असतात. आपण केलेल्या जुन्या घोषणा पूर्ण झाल्या आहेत किंवा नाही याची काहीच माहीती त्याना नसते. त्यामुळे नुसत्या घोषणा करून ते जनतेची फसवणूक करीत आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्री नव्हे , हे तर फक्त घोषणामंत्री ! परशुराम उपरकरांची दीपक केसरकरांवर टिका

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर हे फक्त नवनवीन घोषणा करीत असतात. आपण केलेल्या जुन्या घोषणा पूर्ण झाल्या आहेत किंवा नाही याची काहीच माहीती त्याना नसते. त्यामुळे नुसत्या घोषणा करून ते जनतेची फसवणूक करीत आहेत. दिपक केसरकर हे पालकमंत्री नसून घोषणा मंत्री झाले असल्याची टिका मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे.येथील संपर्क कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले, पालकमंत्र्यानी जिल्ह्याच्या विकासाची वाट लावली आहे. पाहुणे असल्यासारखे ते जिल्ह्यात येतात आणि सावंतवाड़ी पुरते मर्यादित रहातात. त्यामुळे ते फक्त सावंतवाड़ी तालुक्याचे पालकमंत्री बनले आहेत. उर्वरित जिल्ह्यातील जनतेबाबत त्याना काही देणे घेणे नाही.दीपक केसरकर यांनी केलेल्या घोषणेबाबत माहितीच्या अधिकारात त्यांच्या कार्यालया जवळ माहिती मागितल्यास संबधित कार्यालया कडून ती उपलब्ध करून घ्या असे सांगितले जाते. याला काय म्हणायचे ?एखाद्या योजनेबद्दल माहिती जाहिर करायची. मात्र, त्या योजनेसाठी निधी वितरित झाला किंवा नाही याची माहिती घ्यायची नाही असे सध्या त्यांचे चालले आहे. त्यांच्या मतदार संघात चोऱ्या, दरोडे , अवैध उत्खनन सुरु आहे. जनतेकडून अर्ध नग्न स्थितीत उपोषण करण्यासारखे मार्ग अवलंबिले जात आहेत. मात्र, त्याचे त्यांना काहीच नाही.जिल्ह्याच्या विकासासाठी 2700 कोटींचा निधी आणला, फ़ूड पार्क उभारणार , चांदा ते बांदा योजना अंतर्गत विविध विकास कामे करणार , मुख्यालय विकासासाठी 25 कोटींचा निधी आणला , तिलारी पाईप लाईन साठी निधी 100 कोटींचा निधी दिला अशा अनेक घोषणा पालकमंत्री केसरकर यांनी केल्या आहेत.

यापैकी प्रत्यक्षात किती निधी उपलब्ध झाला ? याची काहीच माहिती त्यांच्या जवळ अथवा त्यांच्या कार्यालया जवळ नाही. त्यामुळे त्याना जर परिपूर्ण माहिती देता येत नसेल तर फक्त श्रेय घेण्यासाठी घोषणा करून जनतेची फसवणूक करु नये.त्याचबरोबर अशा फसव्य घोषणा करण्यापूर्वी त्यांनी हे लक्षात ठेवावे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही जागरूक लोकप्रतिनिधी आहेत. ते जनतेच्या हितासाठी विविध विषयांची माहिती घेत असतात आणि ती जनतेपुढे मांडत असतात. त्यामुळे पालकमंत्र्यानी नेमका कोणता विकास केला ते जनतेसमोर जाहिर करावे. असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.सर्वच पालकमंत्री फसवणूक करणारे !दीपक केसरकर यांच्या पूर्वी सिंधुदुर्गचे पालकमंत्री असणारेही जनतेची फसवणूक करणारेच होते. सावंतवाड़ी तहसील कार्यालयाच्या कामाची निविदा आठ वर्षापुर्वी काढण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री कोण होते? याची माहिती स्वाभिमान कार्यकर्त्यांनी घ्यावी आणि त्यानंतर आंदोलन करावे.

चीपी विमानतळाच्या कामाचे तिन वेळा उदघाट्न नारायण राणे यानी केले आहे. तरीही या विमानतळावरुन विमान अद्याप उड्डाण करु शकलेले नाही. त्यामुळे सिंधुदुर्गचे सर्वच पालकमंत्री जनतेची फसवणूक करणारे होते.असे स्पष्ट होत असल्याचे परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर Deepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग