शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

सिंधुदुर्ग : नीतेश राणे माझ्यामुळे आमदार झाले, संदेश पारकर यांचा गौप्यस्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 13:27 IST

नीतेश राणे हे माझ्यामुळे आमदार झाले. पुढील निवडणुकीत ते आमदार म्हणून दिसणार नाहीत. वाल्याचा वाल्मिकी करायला गेलो पण सुधारणा काहीच झाली नाही, असा आरोप शिवसेना-भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी केला.

ठळक मुद्देनीतेश राणे माझ्यामुळे आमदार झाले, संदेश पारकर यांचा गौप्यस्फोट कणकवलीतील सुज्ञ नागरिक शिवसेना-भाजपलाच विजयी करतील

कणकवली : नीतेश राणे हे माझ्यामुळे आमदार झाले. पुढील निवडणुकीत ते आमदार म्हणून दिसणार नाहीत. वाल्याचा वाल्मिकी करायला गेलो पण सुधारणा काहीच झाली नाही, असा आरोप शिवसेना-भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश पारकर यांनी केला.

खंडणीबहाद्दर नीतेश राणे यांच्या सर्टीफिकेटची आम्हांला गरज नाही. कणकवलीतील जनता सुज्ञ असून ती शिवसेना-भाजपला नक्कीच विजयी करील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. येथील वैभव भवन येथे शिवसेना-भाजपच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक उपस्थित होते.संदेश पारकर पुढे म्हणाले, नगरपंचायतीत काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांचे फोटो लावण्यात आलेले होते. ते आपण उतरविले व त्या ठिकाणी परमपूज्य भालचंद्र महाराज व अप्पासाहेब पटवर्धन यांचे फोटो लावले. अशा गुंडगिरी प्रवृत्तीच्या लोकांना कणकवलीतील जनता मत देणार नाही, असा विश्वासही पारकर यांनी व्यक्त केला.स्वाभिमानच्या आयात उमेदवारांना कुठलाही मतदार मत देणार नाही. कणकवलीतील जनता ६ एप्रिलला आपले मत मतपेटीत बंद करेल. मात्र हे मत शिवसेना-भाजपच्या बाजूने निश्चित असेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. आज राणे कुटुंब कुठल्या पक्षात आहे हेच माहीत नाही. त्यांनी स्वत:चा राजकीय इतिहास ओळखावा.

पैशाच्या आमिषाला कणकवलीतील जनता भीक घालणार नाही. मी माझी मते दिली म्हणून नीतेश राणे आमदार झाले. आता ते पुढील निवडणुकीत आमदार म्हणून दिसणारही नाहीत. त्यांनी आमदारकीची स्वप्ने पाहू नयेत, असे संदेश पारकर यांनी सांगितले.पारकर पुढे म्हणाले, माझ्याकडे बघून मते द्या, असे आवाहन नारायण राणे करीत आहेत. आपल्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाºयांना वेळेवर पगार मिळतो का ते राणे कुटुंबीयांनी पहावे. कणकवलीतील मूळ प्रश्नाकडे स्वाभिमानने लक्ष दिलेला नाही. गेली ५ वर्षे राणे कणकवलीचा विकास का करू शकले नाहीत. राणे यांनी मागे वळून आपला इतिहास पहावा. अशा प्रवृत्तीच्या लोकांकडे कणकवलीतील जनता ढुंकूनही पाहणार नाही, असे संदेश पारकर म्हणाले.स्वाभिमानकडे उमेदवारसुद्धा नाहीत. एकाच घरात दोन दोन उमेदवार दिले आहेत. कणकवलीकरांना गुंडगिरी नको आहे. श्रीधर नाईक हत्या कोणी केली हे कणकवलीकरांना माहीत आहे. गाड्या कुणी जाळल्या हे सुद्धा कणकवलीवासीयांना माहीत आहे. त्यामुळे कणकवलीतील सुज्ञ जनता आता फसणार नाही.कणकवलीवासीय शिवसेना-भाजपवरच विश्वास ठेवतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. राणे कुटुंबीयांबद्दल संदेश पारकर यांनी संताप व्यक्त केला. यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले, नीतेश राणे यांच्यावर कणकवलीतील जनतेचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे जनता त्यांना स्वीकारणार नाही. या निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवारांनाच जनता निवडून देईल, असा आशावाद व्यक्त केला.

उमेदवार आयात करण्याची वेळ!आमदार नीतेश राणे यांनी ज्या योजना आणल्या त्या सर्व योजना बंद पडल्या. एकही योजना चालू राहिली नाही. त्यामुळे जनतेचा त्यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. कणकवलीतील आरक्षणे शिवसेना-भाजप विकसित करेल.स्वाभिमान पक्षाला उमेदवारच मिळत नव्हते. त्यांना उमेदवार आयात करावे लागले. ज्या जनतेचा नीतेश राणे यांच्यावरील विश्वास उडाला आहे त्या पक्षाला जनता कशाला मत देईल, असा सवालही वैभव नाईक यांनी केला. शिवसेना-भाजपचा कणकवलीत विजय निश्चित आहे, असा असा विश्वासही वैभव नाईक यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Sandesh Parkarसंदेश पारकरNitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग