शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

सिंधुदुर्ग : एनसीसीचे प्लास्टिकमुक्त किल्ला अभियान, मालवण पालिकेने घेतला पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 6:29 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतचा नारा दिल्यानंतर देशभरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण अभियानात मालवण पालिकेने सहभाग घेतला असून शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनी पुढाकार घेतला.

ठळक मुद्देएनसीसीचे प्लास्टिकमुक्त किल्ला अभियानमालवण पालिकेने घेतला शहर स्वच्छतेसाठी पुढाकार तळाशिल येथे निवासी शिबिर

मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारतचा नारा दिल्यानंतर देशभरात स्वच्छता अभियान राबविले जात आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण अभियानात मालवण पालिकेने सहभाग घेतला असून शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनी पुढाकार घेतला.

मोदी यांच्या स्वच्छ भारतच्या नाऱ्याला प्रतिसाद देताना मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनसीसी) विभागाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी एक दिवस किल्ले सिंधुदुर्गच्या स्वच्छतेसाठी देत प्लास्टिकमुक्त किल्ला हे अभियान राबविले.प्लास्टिकच्या विळख्यातून किल्ल्याला मुक्त करण्यासाठी एनसीसी विभागप्रमुख लेफ्टनंट डॉ. एम. आर. खोत यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान राबविण्यात आले.मालवणचा ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाचा मानबिंदू आहे. किल्ले दर्शनासाठी दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. एकीकडे पर्यटन वाढत असताना दुसरीकडे प्लास्टिकचा खच किल्ल्यात ठिकठिकाणी पहायला मिळत असतो. स्थानिक पातळीवरून आवाहन करूनही पर्यटकांकडून दुर्लक्ष होतो. त्यामुळे किल्ला प्लास्टिकच्या विळख्यात सापडला होता.ही बाब लक्षात घेऊन सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या एनसीसी विभागाच्या विद्यार्थ्यांनी किल्ल्याभोवती पसरलेला प्लास्टिक कचरा तसेच अन्य घनकचरा गोळा केला. यात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बाटल्या सापडून आल्या.यावेळी भूगोल विभागप्रमुख डॉ. आर. एन. काटकर, वायरी सरपंच घनश्याम ढोके, उपसरपंच तुकाराम तळगावकर, विद्यार्थी प्रतिनिधी वैभव खोबरेकर, किल्लेदार हरीश गुजराथी यांच्यासह एनसीसी विभागाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. किल्ल्यावर होडी नेण्यासाठी किल्ला होडी वाहतूक संस्थेचे प्रसाद सरकारे व माजी विद्यार्थी प्रतिनिधी अमेय देसाई व हेमंत रामाडे यांचे सहकार्य लाभले.

तळाशिल येथे निवासी शिबिरराष्ट्रीय सेवा योजना (एनसीसी) विभागाच्यावतीने तळाशिल-तोंडवळी येथे एक दिवसीय निवासी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरात मान्यवरांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.

यावेळी प्राचार्य डॉ. श्रीरंग मंडले, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर तसेच नगरसेवक उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी एनसीसी विभागातील विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत उपक्रमांचे कौतुक केले.

 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानsindhudurgसिंधुदुर्गMalvan beachमालवण समुद्र किनारा