शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

सिंधुदुर्गनगरी : कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेची शपथ

By admin | Updated: October 2, 2014 22:24 IST

जिल्हा परिषद : महिला बालविकास अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी : परिसराची स्वच्छता करताना प्रत्येकाने आपल्या मनाची स्वच्छता करणे गरजेचे आहे. शासनाच्या आदेशानुसार स्वच्छता करतानाच प्रत्येकाने आपल्या स्वत:पासून स्वच्छता करण्यास सुरूवात केल्यास स्वच्छ भारत संकल्पना दूर नाही, असे प्रतिपादन महिला बालविकास अधिकारी ज्ञानदेव रसाळ यांनी केले.महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात जयंती कार्यक्रम तसेच स्वच्छता शपथ कार्यक्रमाचे आयोजन गुरूवारी करण्यात आले होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. एन. रेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी आठल्ये, पशुसंवर्धन अधिकारी चंदेल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी कांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने तसेच प्रतिमांना पुष्पहार घालून करण्यात आली. यावेळी रसाळ म्हणाले, कुठलाही कार्यक्रम हाती घेताना अंतर्मुख होऊन काम करणे गरजेचे असते. त्यामुळे तो कार्यक्रम पूर्णत: यशस्वी होतो. शासनाच्या निर्णयाप्रमाणे स्वच्छतेची सवय लागावी यासाठी स्वच्छता शपथ कार्यक्रम जिल्ह्यात सर्वत्र घेण्यात येत आहे. मात्र, सर्वांनी या कार्यक्रमाची सुरूवात स्वत:पासून करणे गरजेचे आहे, असेही रसाळ म्हणाले.ते म्हणाले, राष्ट्रीय स्तरावरून ग्रामीण स्वच्छतेच्या निर्मल भारत अभियान या कार्यक्रमाची अंमलबजावणी २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्यासाठी मिशन स्वच्छ भारत या नावाने महत्त्वाकांक्षी प्रकल्प आज सुरू होत आहे. या प्रकल्पाची सुरूवात प्रभावीपणे होण्यासाठी केंद्र सरकारने २५ सप्टेंबर ते २३ आॅक्टोबर या कालावधीमध्ये व्यापक जनजागृती अभियान राबविण्यासाठी निर्देशित केले आहेत. मागील १० वर्षाचा अनुभव पाहता महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेकडून स्वच्छतेच्या कार्यक्रमात सहभाग मिळविण्यासाठी विविध स्तरावर जनसंवाद उपक्रम राबविण्याबरोबरच आंतरव्यक्ती संवाद उपक्रम राबविण्यात आले आहेत. स्वच्छ भारत अभियानाला गती देण्यासाठी निर्मल भारत अभियान कक्षातील जिल्हा व तालुकास्तरावरील कर्मचारी दररोज किमान ५ गृहभेटी करून या कार्यक्रमाची जनजागृती करून या अभियान कालावधीमध्ये ग्रामीण भागातील जनतेला शौचालय बांधकाम व वापर, शाळांमध्ये पर्याप्त प्रमाणात मुला- मुलींसाठी स्वच्छतागृहांची उपलब्धी, हात धुण्याचे महत्त्व, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन व परिसर स्वच्छता, लहान मुलांच्या विष्ठेचे व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची सुरक्षित हाताळणी व साठा करणे याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. यावेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन गायकवाड यांनी केले. यावेळी जिल्हा प्रशासनानेही स्वच्छतेची शपथ घेतली. (प्रतिनिधी)