शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
5
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
6
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
7
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
8
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
9
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
10
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
11
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
12
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
13
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
14
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
15
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
16
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
18
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
19
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
20
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी

सिंधुदुर्गनगरी : कर्मचाऱ्यांकडून स्वच्छतेची शपथ

By admin | Updated: October 2, 2014 22:24 IST

जिल्हा परिषद : महिला बालविकास अधिकाऱ्यांनी केले मार्गदर्शन

सिंधुदुर्गनगरी : परिसराची स्वच्छता करताना प्रत्येकाने आपल्या मनाची स्वच्छता करणे गरजेचे आहे. शासनाच्या आदेशानुसार स्वच्छता करतानाच प्रत्येकाने आपल्या स्वत:पासून स्वच्छता करण्यास सुरूवात केल्यास स्वच्छ भारत संकल्पना दूर नाही, असे प्रतिपादन महिला बालविकास अधिकारी ज्ञानदेव रसाळ यांनी केले.महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात जयंती कार्यक्रम तसेच स्वच्छता शपथ कार्यक्रमाचे आयोजन गुरूवारी करण्यात आले होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. एन. रेडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी आठल्ये, पशुसंवर्धन अधिकारी चंदेल, मुख्य लेखा व वित्त अधिकारी कांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने तसेच प्रतिमांना पुष्पहार घालून करण्यात आली. यावेळी रसाळ म्हणाले, कुठलाही कार्यक्रम हाती घेताना अंतर्मुख होऊन काम करणे गरजेचे असते. त्यामुळे तो कार्यक्रम पूर्णत: यशस्वी होतो. शासनाच्या निर्णयाप्रमाणे स्वच्छतेची सवय लागावी यासाठी स्वच्छता शपथ कार्यक्रम जिल्ह्यात सर्वत्र घेण्यात येत आहे. मात्र, सर्वांनी या कार्यक्रमाची सुरूवात स्वत:पासून करणे गरजेचे आहे, असेही रसाळ म्हणाले.ते म्हणाले, राष्ट्रीय स्तरावरून ग्रामीण स्वच्छतेच्या निर्मल भारत अभियान या कार्यक्रमाची अंमलबजावणी २ आॅक्टोबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्यासाठी मिशन स्वच्छ भारत या नावाने महत्त्वाकांक्षी प्रकल्प आज सुरू होत आहे. या प्रकल्पाची सुरूवात प्रभावीपणे होण्यासाठी केंद्र सरकारने २५ सप्टेंबर ते २३ आॅक्टोबर या कालावधीमध्ये व्यापक जनजागृती अभियान राबविण्यासाठी निर्देशित केले आहेत. मागील १० वर्षाचा अनुभव पाहता महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेकडून स्वच्छतेच्या कार्यक्रमात सहभाग मिळविण्यासाठी विविध स्तरावर जनसंवाद उपक्रम राबविण्याबरोबरच आंतरव्यक्ती संवाद उपक्रम राबविण्यात आले आहेत. स्वच्छ भारत अभियानाला गती देण्यासाठी निर्मल भारत अभियान कक्षातील जिल्हा व तालुकास्तरावरील कर्मचारी दररोज किमान ५ गृहभेटी करून या कार्यक्रमाची जनजागृती करून या अभियान कालावधीमध्ये ग्रामीण भागातील जनतेला शौचालय बांधकाम व वापर, शाळांमध्ये पर्याप्त प्रमाणात मुला- मुलींसाठी स्वच्छतागृहांची उपलब्धी, हात धुण्याचे महत्त्व, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन व परिसर स्वच्छता, लहान मुलांच्या विष्ठेचे व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची सुरक्षित हाताळणी व साठा करणे याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. यावेळी स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. प्रास्ताविक व सूत्रसंचालन गायकवाड यांनी केले. यावेळी जिल्हा प्रशासनानेही स्वच्छतेची शपथ घेतली. (प्रतिनिधी)