शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

सिंधुदुर्गनगरी : निरवडे येथे चोरट्यांनी पाच बंगले फोडले, रेल्वेस्थानक नजीक घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 17:53 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, कुडाळ, बांदा पाठोपाठ चोरट्यांनी निरवडे येथे मंगळवारी रात्री धुमाकूळ घालत रेल्वेस्थानक नजीकच्या विष्णुसृष्टी कॉलनीमधील पाच बंगले फोडले.

ठळक मुद्देनिरवडे येथे चोरट्यांनी पाच बंगले फोडले रेल्वेस्थानक नजीकच्या कॉलनीतील घटना  एका बंगल्यातील २२ हजार रूपयांची रोकड लंपास

तळवडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, कुडाळ, बांदा पाठोपाठ चोरट्यांनी निरवडे येथे मंगळवारी रात्री धुमाकूळ घालत रेल्वेस्थानक नजीकच्या विष्णुसृष्टी कॉलनीमधील पाच बंगले फोडले.

यात शाहिदा नाईक यांच्या बंगल्यातील २२ हजार रूपयांची रोख रक्कम चोरट्यांच्या हाती लागली, तर इतर चार बंगल्यातील चोरीचा प्रयत्न फसला. पाचही बंगले मालकांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार सायंकाळी उशिरा अज्ञाताविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.दरम्यान, चोरट्यांनी पोलिसांचे लक्ष विचलीत करण्यासाठी शहरी भाग सोडून आता ग्रामीण भागाकडे मोर्चा वळविल्याचे दिसत आहे. एकाच रात्रीत पाच बंगले फोडल्याने ग्रामस्थांसह पोलिसांचीही झोप उडाली आहे.निरवडे येथे मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी पाच बंगले फोडले. सर्व बंगल्यांचे मालक बाहेर गावी व अन्य ठिकाणी राहत असल्याचा चोरट्यांनी फायदा उचलला. कॉलनीतील माधव प्रभू, सचिन नाईक, नंदिनी प्रभू, हेमंत सोनवणे, शाहिदा नाईक या पाच जणांचे बंगले फोडले.

बांदा येथील चोरीच्या प्रकारानंतर आता निरवडे येथेही चोरट्यांनी हात साफ केल्याने पोलीस प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. याचा शोध पोलीस कशा पद्धतीने घेतात याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. या चोरांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आता उभे आहे.विष्णुसृष्टी कॉलनीला सुरक्षा रक्षक व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे संरक्षण असूनही मोठ्या चातुर्याने चोरट्यांनी हा चोरीचा प्रयत्न केला. यात शाहिदा नाईक यांच्या बंगल्यातील कपाटात असलेली २२ हजार रूपयांची रोख रक्कम लंपास केल्याचे त्यांनी पोलीस पंचनाम्यात सांगितले.दरवाज्याच्या कड्या-कुलपे तोडून चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला. यासाठी कोयता व इतर लोखंडी वस्तूंचा वापर केल्याचे दिसून आले. कपाटे फोडून आतील साहित्य आणि कपडे विस्कटून टाकले होते. बंगले मालकांपैकी शाहिदा नाईक यांचे नातेवाईक निरवडे येथे दाखल झाले होते. त्यांच्या बंगल्यातील सर्व सामान, साहित्य विस्कटून टाकले होते. कुलूप तोडून बंगल्याच्या बाहेर फेकले होते.

कपाटातील मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.घटनेची माहिती मिळताच निरवडे सरपंच प्रमोद गावडे, सोसायटी अध्यक्ष जयवंत शेट्ये, अंकुश दळवी, अमोल कदम आदींनी घटनास्थळी धाव घेतली.पोलीस पाटील अजित वैज यांनी पोलिसांना याची कल्पना दिली. त्यानुसार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अरूण सावंत, पोलीस हवालदार विक्रांत गवस, गुरूनाथ तेली यांनी घटनास्थळी धाव घेत चोरीचा रितसर पंचनामा केला.

त्या व्यक्ती कोण़?दोन दिवसांपूर्वी अज्ञात चार व्यक्ती कॉलनीच्या मुख्य दरवाजाकडे आल्या होत्या. येथे झोपण्यासाठी जागा मिळेल काय, असे त्यांनी विचारले. पण आम्ही त्यांना नकार दिला, अशी माहिती कॉलनीच्या सुरक्षा रक्षकाने दिली. या चार व्यक्ती कोण होत्या याचा पोलिसांनी शोध घेणे गरजेचे आहे.

 

पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावे!जिल्ह्यात चोरीचे सत्र वाढत असून ग्रामस्थांसह व्यावसायिक, दुकानदारांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, मालवण आदी भागात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी यात लक्ष घालणे गरजेचे आहे. पोलीस यंत्रणेवर पालकमंत्र्यांचा वचक पाहिजे. या सर्व चोºयांचा छडा लावून चोरट्यांवर कठोर कारवाई करावी, जेणे करुन चोरीचे सत्र थांबेल.- प्रमोद गावडे,निरवडे सरपंच 

पोलिसांनी गस्त वाढवावी!पोलीस यंत्रणेने योग्य तपास करून चोरट्यांना अटक करावी. चोरटे बिनधास्तपणे घरे फोडत असल्याने येथील रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. चोरट्यांंना वेळीस पकडून त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच पोलिसांनी सावंतवाडी-तळवडे-वेंगुर्ले मार्गावर गस्त वाढवावी.-जयवंत शेट्ये, अध्यक्ष,विष्णुसृष्टी कॉलनी

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrimeगुन्हाPoliceपोलिस