शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सिंधुदुर्ग : स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग दर्शविण्यासाठी मुंबई ते कन्याकुमारी सायकलने प्रवास : प्लास्टिक बंदीसाठी आयकर अधिकाऱ्यांचे समाजप्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 13:11 IST

स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग दर्शविण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी समाजप्रबोधन करण्यासाठी मुंबई येथील आयकर अधिकारी संजय सावंत व त्यांचे मित्र ललित आकुटकर हे दोघेजण मुंबई ते कन्याकुमारी हा १७६० किमीचा प्रवास सायकलवरून करत आहेत.

ठळक मुद्देआयकर अधिकारी संजय सावंत, मित्र ललित आकुटकर यांचे सायकलने समाजप्रबोधनस्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग, प्लास्टिक बंदीसाठी मुंबई ते कन्याकुमारी प्रवास सायकलवरून १७६० किमीचा मुंबई ते कन्याकुमारी प्रवास पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी करण्याचे आवाहन

चौके : स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग दर्शविण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी समाजप्रबोधन करण्यासाठी मुंबई येथील आयकर अधिकारी संजय सावंत व त्यांचे मित्र ललित आकुटकर हे दोघेजण मुंबई ते कन्याकुमारी हा १७६० किमीचा प्रवास सायकलवरून करत आहेत.

९ डिसेंबर रोजी मुंबई येथून त्यांनी आपल्या प्रवासाची सुरूवात केली. बुधवार सायंकाळी त्यांचे कुडाळ येथे आगमन झाले. त्या रात्री सावंत आणि त्यांचे सहकारी आकुटकर यांनी कुडाळ येथे वास्तव केले.

कुडाळमधील संत राऊळ महाराज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी मार्गदर्शन केले. प्लास्टिकचा वापर टाळण्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले.मुंबई ते कन्याकुमारी सायकल प्रवासादरम्यान मार्गातील महत्त्वाच्या शहरांमध्ये थांबून येथील शाळा, महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना पत्रके वाटून आणि मार्गदर्शन करून स्वच्छ भारत अभियानाचा प्रसार करणार असल्याचे संजय सावंत यांनी सांगितले.

प्लास्टिकच्या पिशव्या व बाटल्यांचा वापर टाळला पाहिजे. तरच आपला परीसर स्वच्छ व हिरवागार ठेवता येईल. येणाऱ्या नवीन पिढीला प्रदुषण विरहीत वातावरण देणे ही आपलीच जबाबदारी आहे.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर दोघांनी गोव्याच्या दिशेने मार्गक्रमण केले. त्यापैकी ललित आकुटकर हे मुंबई ते कोचीपर्यंत सायकल प्रवास करणार असून पुढील प्रवास संजय सावंत एकटेच करणार आहेत. त्यांच्या या सायकल प्रवासाला संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापकांनी शुभेच्छा दिल्या.पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी करासंत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संजय सावंत यांनी सांगितले की, आपल्या सभोवतालचा परिसर प्रदुषणाच्या विळख्यात सापडत आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे प्रदुषित धुक्यामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या. हे सर्व कशामुळे? तर पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा व प्लास्टिकचा अतिवापर, आपले समुद्र किनारेही प्लास्टिक व पाण्यात सोडण्यात येणाऱ्या केमिकल्समुळे प्रदुषित होत आहेत.

भविष्यात आपल्याला जर आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित ठेवायचे असेल तसेच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पहायचे असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी करणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान