शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
4
चीनने पाकिस्तानला भेट दिली रस्त्यावरून धावणारी मेट्रो, रुळांची गरजच नाही, अशी आहेत आणखी वैशिष्ट्ये
5
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
6
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
7
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
8
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
10
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
11
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
12
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
13
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
14
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
15
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
16
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
17
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
18
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
19
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
20
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील

सिंधुदुर्ग : स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग दर्शविण्यासाठी मुंबई ते कन्याकुमारी सायकलने प्रवास : प्लास्टिक बंदीसाठी आयकर अधिकाऱ्यांचे समाजप्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 13:11 IST

स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग दर्शविण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी समाजप्रबोधन करण्यासाठी मुंबई येथील आयकर अधिकारी संजय सावंत व त्यांचे मित्र ललित आकुटकर हे दोघेजण मुंबई ते कन्याकुमारी हा १७६० किमीचा प्रवास सायकलवरून करत आहेत.

ठळक मुद्देआयकर अधिकारी संजय सावंत, मित्र ललित आकुटकर यांचे सायकलने समाजप्रबोधनस्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग, प्लास्टिक बंदीसाठी मुंबई ते कन्याकुमारी प्रवास सायकलवरून १७६० किमीचा मुंबई ते कन्याकुमारी प्रवास पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी करण्याचे आवाहन

चौके : स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग दर्शविण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी समाजप्रबोधन करण्यासाठी मुंबई येथील आयकर अधिकारी संजय सावंत व त्यांचे मित्र ललित आकुटकर हे दोघेजण मुंबई ते कन्याकुमारी हा १७६० किमीचा प्रवास सायकलवरून करत आहेत.

९ डिसेंबर रोजी मुंबई येथून त्यांनी आपल्या प्रवासाची सुरूवात केली. बुधवार सायंकाळी त्यांचे कुडाळ येथे आगमन झाले. त्या रात्री सावंत आणि त्यांचे सहकारी आकुटकर यांनी कुडाळ येथे वास्तव केले.

कुडाळमधील संत राऊळ महाराज महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी मार्गदर्शन केले. प्लास्टिकचा वापर टाळण्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी विद्यार्थ्यांना आवाहन केले.मुंबई ते कन्याकुमारी सायकल प्रवासादरम्यान मार्गातील महत्त्वाच्या शहरांमध्ये थांबून येथील शाळा, महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांना पत्रके वाटून आणि मार्गदर्शन करून स्वच्छ भारत अभियानाचा प्रसार करणार असल्याचे संजय सावंत यांनी सांगितले.

प्लास्टिकच्या पिशव्या व बाटल्यांचा वापर टाळला पाहिजे. तरच आपला परीसर स्वच्छ व हिरवागार ठेवता येईल. येणाऱ्या नवीन पिढीला प्रदुषण विरहीत वातावरण देणे ही आपलीच जबाबदारी आहे.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर दोघांनी गोव्याच्या दिशेने मार्गक्रमण केले. त्यापैकी ललित आकुटकर हे मुंबई ते कोचीपर्यंत सायकल प्रवास करणार असून पुढील प्रवास संजय सावंत एकटेच करणार आहेत. त्यांच्या या सायकल प्रवासाला संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य आणि प्राध्यापकांनी शुभेच्छा दिल्या.पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी करासंत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संजय सावंत यांनी सांगितले की, आपल्या सभोवतालचा परिसर प्रदुषणाच्या विळख्यात सापडत आहे. काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे प्रदुषित धुक्यामुळे शाळा बंद ठेवण्यात आल्या. हे सर्व कशामुळे? तर पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा व प्लास्टिकचा अतिवापर, आपले समुद्र किनारेही प्लास्टिक व पाण्यात सोडण्यात येणाऱ्या केमिकल्समुळे प्रदुषित होत आहेत.

भविष्यात आपल्याला जर आपल्या मुलांचे भविष्य सुरक्षित ठेवायचे असेल तसेच त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पहायचे असेल तर आपण सर्वांनी एकत्र येऊन पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वाहनांचा वापर कमी करणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान