शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : माकडतापाचे सर्वाधिक १0९ रुग्ण, रेश्मा सावंत यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 15:00 IST

जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत माकडतापाचे सर्वाधिक १०९ रुग्ण आढळले असून त्यात तीन रुग्ण दगावले आहेत. त्याखालोखाल मलेरियाचे ४१ व डेंग्यूचे १३ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी दिली.

ठळक मुद्देमाकडतापाचे सर्वाधिक १0९ रुग्ण, रेश्मा सावंत यांची माहिती जिल्ह्यात मलेरियाचे ४१ तर डेंग्यूचे १३ रुग्ण आढळले

सिंधुदुर्गनगरी : जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत माकडतापाचे सर्वाधिक १०९ रुग्ण आढळले असून त्यात तीन रुग्ण दगावले आहेत. त्याखालोखाल मलेरियाचे ४१ व डेंग्यूचे १३ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी दिली.

जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंतयावर्षीपासून डेंग्यू व लेप्टोच्या स्पॉट टेस्ट घेणे बंद केले असून अशा रुग्णांची जिल्हा रुग्णालयात तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत सावंत व खलिपे बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एच. टी. जगताप, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.कीटकजन्य आजारांसाठी पावसाळी हंगाम जोखमीचा आहे. कीटकजन्य आजारात वाढ होऊ नये यासाठी जनतेमध्ये जागृती निर्माण केली जाते. मात्र, तरीही जिल्ह्यात डेंग्यूचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे समोर आले आहे. जानेवारी ते अद्यापपर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचे १३ रूग्ण आढळून आले आहेत तर माकडतापाचे १०९ रूग्ण आढळून आले आहेत. त्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. मलेरियाचे ४१ रुग्ण आढळून आले आहेत.क्षयरोग रुग्णांना मिळणार संधीराष्ट्रीय सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्ण शोधण्यासाठी शोध मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. योग्य उपचाराबरोबर सकस व प्रोटीनयुक्त आहार मिळावा म्हणून नि-क्षय पोषण योजनेंतर्गत प्रत्येक क्षयरूग्णास दरमहा ५०० रूपये सकस आहार निधी रूग्णाच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.

यामध्ये पहिल्या टप्प्यात १ हजार रुपये रूग्णास उपचार सुरू करताना, दुसरा हप्ता १ हजार रुपये दोन महिने पूर्ण केल्यावर, तर शेवटचा हप्ता उपचार पूर्ण झाल्यावर एक हजार रुपये दिला जाणार आहे., अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी वाय. बी. कांबळे यांनी दिली.स्पॉट टेस्ट बंदपूर्वी डेंग्यू किंवा लेप्टोची लक्षणे एखाद्या रुग्णास आढळल्यास त्यांची स्पॉट टेस्ट केली जात होती. मात्र, शासनाने आता स्पॉट टेस्टवर बंदी घातली आहे. या दोन आजारांच्या रूग्णांची आता यापुढे जिल्हा रूग्णालयात ब्लड टेस्ट होणार असल्याचे सांगण्यात आले.जिल्हा रुग्णालयात लॅब सुरू होणारसावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ व दोडामार्ग या चार तालुक्यातील रूग्णांची मनिपाल या संस्थेत मोफत तपासणी केली जाते. तर उर्वरित चार तालुक्यांसाठी जिल्हा रूग्णालयात लॅब सुरू करण्यात येणार आहे. यासाठी इमारत व सर्व यंत्रणा उपलब्ध झाली असून मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास लवकरच या लॅबचा शुभारंभ करता येईल, असे डॉ. खलिपे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Healthआरोग्यsindhudurgसिंधुदुर्ग