शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

सिंधुदुर्ग : माकडतापाचे सर्वाधिक १0९ रुग्ण, रेश्मा सावंत यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 15:00 IST

जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत माकडतापाचे सर्वाधिक १०९ रुग्ण आढळले असून त्यात तीन रुग्ण दगावले आहेत. त्याखालोखाल मलेरियाचे ४१ व डेंग्यूचे १३ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी दिली.

ठळक मुद्देमाकडतापाचे सर्वाधिक १0९ रुग्ण, रेश्मा सावंत यांची माहिती जिल्ह्यात मलेरियाचे ४१ तर डेंग्यूचे १३ रुग्ण आढळले

सिंधुदुर्गनगरी : जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत माकडतापाचे सर्वाधिक १०९ रुग्ण आढळले असून त्यात तीन रुग्ण दगावले आहेत. त्याखालोखाल मलेरियाचे ४१ व डेंग्यूचे १३ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात डेंग्यूचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी दिली.

जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्मा सावंतयावर्षीपासून डेंग्यू व लेप्टोच्या स्पॉट टेस्ट घेणे बंद केले असून अशा रुग्णांची जिल्हा रुग्णालयात तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी दिली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत सावंत व खलिपे बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एच. टी. जगताप, आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.कीटकजन्य आजारांसाठी पावसाळी हंगाम जोखमीचा आहे. कीटकजन्य आजारात वाढ होऊ नये यासाठी जनतेमध्ये जागृती निर्माण केली जाते. मात्र, तरीही जिल्ह्यात डेंग्यूचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत असल्याचे समोर आले आहे. जानेवारी ते अद्यापपर्यंत जिल्ह्यात डेंग्यूचे १३ रूग्ण आढळून आले आहेत तर माकडतापाचे १०९ रूग्ण आढळून आले आहेत. त्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. मलेरियाचे ४१ रुग्ण आढळून आले आहेत.क्षयरोग रुग्णांना मिळणार संधीराष्ट्रीय सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्ण शोधण्यासाठी शोध मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. योग्य उपचाराबरोबर सकस व प्रोटीनयुक्त आहार मिळावा म्हणून नि-क्षय पोषण योजनेंतर्गत प्रत्येक क्षयरूग्णास दरमहा ५०० रूपये सकस आहार निधी रूग्णाच्या खात्यावर जमा केला जाणार आहे.

यामध्ये पहिल्या टप्प्यात १ हजार रुपये रूग्णास उपचार सुरू करताना, दुसरा हप्ता १ हजार रुपये दोन महिने पूर्ण केल्यावर, तर शेवटचा हप्ता उपचार पूर्ण झाल्यावर एक हजार रुपये दिला जाणार आहे., अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी वाय. बी. कांबळे यांनी दिली.स्पॉट टेस्ट बंदपूर्वी डेंग्यू किंवा लेप्टोची लक्षणे एखाद्या रुग्णास आढळल्यास त्यांची स्पॉट टेस्ट केली जात होती. मात्र, शासनाने आता स्पॉट टेस्टवर बंदी घातली आहे. या दोन आजारांच्या रूग्णांची आता यापुढे जिल्हा रूग्णालयात ब्लड टेस्ट होणार असल्याचे सांगण्यात आले.जिल्हा रुग्णालयात लॅब सुरू होणारसावंतवाडी, वेंगुर्ला, कुडाळ व दोडामार्ग या चार तालुक्यातील रूग्णांची मनिपाल या संस्थेत मोफत तपासणी केली जाते. तर उर्वरित चार तालुक्यांसाठी जिल्हा रूग्णालयात लॅब सुरू करण्यात येणार आहे. यासाठी इमारत व सर्व यंत्रणा उपलब्ध झाली असून मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास लवकरच या लॅबचा शुभारंभ करता येईल, असे डॉ. खलिपे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Healthआरोग्यsindhudurgसिंधुदुर्ग